शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

आचार्य शांतिसागर महाराजांवर मंगळवारपासून राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मानवतेचे पुजारी म्हणून ओळख असलेले विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतिसागर महाराज यांच्या दीक्षा शताब्दीनिमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मानवतेचे पुजारी म्हणून ओळख असलेले विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतिसागर महाराज यांच्या दीक्षा शताब्दीनिमित्त कोल्हापुरात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रातर्फे येत्या मंगळवारी (दि. ८) व बुधवारी (दि. ९) दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये शांतिसागर महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. विजय ककडे, समितीचे प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, संजय शेटे, सुरेश रोटे, संदीप पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत त्याची घोषणा केली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या परिषदेत डॉ. डी. ए. पाटील लिखित ‘शांतिसागर चरित्र’ व भारती उपाध्ये लिखित ‘आत्मसंस्कार’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. परिषदेचा समारोप खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आचार्य शांतिसागर महाराजांनी मार्च १९२० मध्ये बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे परमपूज्य देवेंद्र कीर्ती महाराज यांच्याकडून निग्रंथ मुनिदीक्षा घेतली. त्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शताब्दी समिती स्थापन करून देशभर विविध सभा, समारंभ, विधी, विधाने, चरित्रनिर्मिती, ग्रंथनिर्मिती, यरनाळ येथे समाजोपयोगी प्रकल्प साकारले आहेत. विविध विद्यापीठे, शाळा, कॉलेजांमध्ये शांतिसागर महाराजांचे जीवनकार्य व्याख्यानांच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे.

---------------------------------

चौकट

- ८ डिसेंबर : उद्घाटन, नऊ वक्त्यांची भाषणे, काव्यसंमेलन : अध्यक्षस्थान : शाहीर कुंतीनाथ करके

- ९ डिसेंबर : लठ्ठे फौंडेशन उद्घाटन व समारोप : अध्यक्षस्थान - रावसाहेब पाटील.