शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ । देशभरातील २४ राज्यांमधील कुस्तीपटूंचे संघ सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 01:04 IST

पन्हाळा : येथील संजीवन नॉलेज सिटीच्या प्रांगणात ६५ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. संजीवन शिक्षण समूहाचे ...

ठळक मुद्दे पन्हाळा येथील ‘संजीवन’ येथे आयोजन

पन्हाळा : येथील संजीवन नॉलेज सिटीच्या प्रांगणात ६५ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. संजीवन शिक्षण समूहाचे संस्थापक पी. आर. भोसले, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तमल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. देशभरातील २४ राज्यांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कुस्तीपटूंचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

उद्घाटनापूर्वीच मुलींच्या ५०, ५५, ५९, ६५ आणि ७२ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकासाठीच्या लढती शनिवारी झाल्या. यामध्ये ७२ किलो वजनी गटात पंजाबची अनू सरोज आणि लक्ष्मी पांडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्या कांस्यपदकासाठी लढतील. ६५ किलो वजनी गटात पंजाबच्या अमनप्रीत कौर आणि साक्षी दाबास यांनी रोमहर्षक लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ५९ किलो गटात तेलंगणाच्या करुणा सोनकू आणि सेहनम मंजिद्रपाल यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ५५ किलो वजनी गटात तेलंगणाच्या शाहेर कुमारी आणि हरियाणाच्या अंजू कुमारी यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित कांस्यपदकाची दावेदारी मजबूत केली. ५० किलो वजनी गटात भाविका पटेल (गुजरात), निलुकुमारी (उत्तर प्रदेश) यांनीही प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. मुलांच्या कांस्यपदकासाठीच्या लढती अद्याप सुरू आहेत.

यावेळी आॅलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, महादेवराव आडगुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, संजीवन समूहाचे सहसचिव एन. आर. भोसले, प्रशिक्षक संभाजी वरुटे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर