शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीकरांचं सारं काही हिरावलं -: महापुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:17 IST

आॅन दी स्पॉट नृसिंहवाडी --महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक मार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती.

ठळक मुद्देमिठाईच्या दुकानांतील साहित्य, अनेकांचा संसार नेला वाहून; आता उरला केवळ चिखल

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : नृसिंहवाडी हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत श्री दत्ताचं देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं क्षेत्र. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेल्या या तीर्थक्षेत्राला महापुराचा नेहमीच फटका बसतो. मात्र, यंदाच्या महापुराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. यावर्षी वाडी तब्बल १५ दिवस पाण्याखाली राहिली. त्यात कोट्यवधींचे नुकसान केले. महापुराने अनेकांचा संसार वाहून नेला, शिवाय गावाची अवस्था दयनीय करून टाकली. स्थलांतर झालेले नागरिक परतताच त्यांची अवस्था भेदरल्यासारखी झाली होती. कारण यंदाच्या महापुराने सारंच हिरावलं आहे.

यापूर्वी २००५ मध्ये आलेल्या महापुराने चांगलेच थैमान घातले होते. यातून नृसिंहवाडीकर थोडे थोडे सावरू लागले. २०१६ मध्ये आलेल्या कन्यागत महापर्वकाल सोहळ्यामुळे येथील व्यापारी तसेच ग्रामस्थांनी कंबर कसली आणि भाविकांच्या सोयीसाठी चांगल्या प्रकारची दुकाने थाटली. तसेच दत्तभक्त व भाविकांसाठी सोयीसुविधाही केल्या. सर्वकाही स्थिरस्थावर होत असतानाच यावर्षी आॅगस्ट महिन्यात आलेला महापूर नृसिंहवाडीसाठी मोठा धक्कादायक ठरला. सारं काही सजलेलं, नटलेलं नृसिंहवाडीसाठी नवी ओळख करून देणारं साम्राज्य महापुरात लयाला गेलं.

मेवा मिठाईबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, खेळणी, पूजा साहित्य याची सुमारे दीडशे ते दोनशे दुकानं महापुरात पार कोलमडली आणि उरला नुसता चिखलगाळ. तयार केलेले आकर्षक लाकडी फर्निचर, पीओपीसह श्रावण पौर्णिमेनिमित्त तयार केलेलं मालमटेरियल नाहीसं झालं. संसारोपयोगी वस्तू तसेच टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा महागड्या वस्तू वाहून गेल्या, तर काही पाणी जाऊन खराब झाल्या. अनेक घरांची पडझड झाली. काहींची घरं छपरासकट बुडाली, तर अनेक ग्रामस्थांचे अतोनात हाल आणि नुकसान झाले.

महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येकमार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती. ‘मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा’ या कुसुमाग्रजांच्या कवितेनुसार येथील ग्रामस्थांनी झालेल्या नुकसानीने दु:ख करत न बसता कंबर कसली आणि सावरण्यास सुरुवात केली.येथील दत्त देव संस्थान, ग्रामपंचायत नृसिंहवाडी, विविध सेवाभावी संस्था, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका रक्षक ग्रुप, स्वयंसेवक संघ, व्हाईट आर्मीअशा अनेक मुंबई-पुणे आदी ठिकाणांहूनसुद्धा लोक देवदूतसारखे मदतीला धावले.

सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने नृसिंहवाडी पुन्हा उभारत आहे. यावर्षी तब्बल २० दिवस बाहेरच्या भाविकांना श्रीचरणाची लागलेली आस गुरुवारी पूर्ण झाली. आता पुन्हा नृसिंहवाडी गजबजू लागली आहे.लवकरच गतवैभव प्राप्त होईलमहापुरानंतर सावरताना ग्रामपंचायत, पुजारी मंडळी, सेवेकरी मंडळी, ग्रामस्थ तसेच सेवाभावी संस्था यांच्या अथक प्रयत्नातून मंदिर व परिसरातील स्वच्छता पूर्ण झाली असून, मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. एवढ्या महापुरातसुद्धा दत्त महाराजांची त्रिकाळ पूजाअर्चा सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाली. देवस्थानमार्फत महाप्रसाद कायमच चालू ठेवला. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने वाडीला लवकरच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास श्री दत्त देव संस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी व सचिव अमोल विभूते यांनी व्यक्त केला. 

मुंबई मनपाकडून स्वच्छतामुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व आयुक्त यांनी सुमारे १५० स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज दत्त तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेसाठी पाठवली होती. या कार्यासाठी मुंबईचे सहायक कमिशनर या स्वच्छता कार्याच्या देखरेखीसाठी हजर होते. गेल्या तीन दिवसांपासून सलग मुंबई महापालिकेच्या या स्वच्छतादूतांनी आपले काम अव्याहतपणे सुरू ठेवले होते. महापालिकेने त्यांना आरोग्याच्या दृष्टीने केमिकल, पावडर, मुंबईच्या धरतीवर लागणारे सर्व स्वच्छतेचे साहित्य यांसह पाठविले आणि त्यांनी दत्त महाराजांची सेवा म्हणून स्वच्छतेचे काम अव्याहतपणे पार पाडले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMumbaiमुंबई