शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

अरुंद रस्ते, तुडुंब वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 13:23 IST

तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा मार्ग पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडताना तो कोल्हापूर शहरातून जातो. त्यामुळे त्यावरील वाहतुकीचा प्रचंड भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. परिणामी, शहराला वाहतुकीच्या प्रचंड कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील आसपासच्या सुमारे २६ हून अधिक गावांतील बहुतांश नागरिकांचा राबता हा कोल्हापूर शहरात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताणही पडत आहे. शहरात प्रवेश करणारा मार्ग हा शिवाजी पुलावरून येतो. अरुंद पुलावरून एकाचवेळी मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गावरून प्रवेश करणे म्हणजे जीवावर संकट ओढविण्याचा प्रकार होय.शहरात प्रवेशणाºया प्रमुख १२ मार्गांपैकी कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रमुख राज्य महामार्ग होय. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला गोवा, कोकण व पूर्वेकडे कर्नाटक राज्याकडे जाणाºया सर्व अवजड वाहनांची वाहतूक कोल्हापूर शहरातूनच होते. याशिवाय रोज किमान २६ ते २८ हजार वेगवेगळ्या वाहनांची ये-जा शिवाजी पूल मार्गे कोल्हापूर शहरातून होते. पन्हाळा ते कोल्हापूर या मार्गाच्या परिसरातील सुमारे २५ हून अधिक गावांतील नागरिकांचा नोकरीसह विविध निमित्ताने कोल्हापूर शहरात रोजचा राबता आहे. त्यामुळे त्यांचा दैनंदिन भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. मलकापूर ते कोल्हापूरपर्यंतचा मार्ग अवघा १५ फूट रुंदीचा अरुंद असल्याने त्यामानाने त्यावर वाहतुकीचा भार अधिक असल्याने रस्ता रुंदीकरण होणे काळाची गरज बनली आहे.या मार्गावरील वाहतूक कोल्हापुरात प्रवेश केल्यानंतर तिचा परिणाम शहरातील वाहतुकीवर पावलोपावली वाहतुकीच्या कोंडीने दिसून येतो. शिवाजी पूल मार्गे शहरात वाहनांनी प्रवेश केल्यानंतर तोरस्कर चौक, शनिवार पेठ चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, तसेच गंगावेश चौकात त्याचा प्रमुख परिणाम दिसून येतो. अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे लोंढे यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.स्टेशन रोडवर अतिरिक्त भारकोकणची वाहतूक शहरात आल्यानंतर ताण पडणारे तोरस्कर चौक, गंगावेश चौक, सीपीआर चौक व दसरा चौक हे मोठे करून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. दसरा चौकात वाहने आल्यानंतर ती कसबा बावडामार्गे राष्टÑीय महामार्गाकडे वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील स्टेशन रोडवरील भारही कमी होण्यास मदत होईल. चौकाचौकांत दिशादर्शक फलकही लावल्यास वाहतूक रेंगाळून वाहतुकीची कोंडी होणार नाही.रस्ता चौपदरी हवारत्नागिरीहून येणारा मार्ग कोल्हापूर शहरापर्यंत, शिवाजी पूल ते तावडे हॉटेलपर्यंत (राष्टÑीय महामार्गापर्यंत) शहरांतर्गत मार्ग अत्यंत अरुंद असल्याने त्याचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्याची अवघी १५ फूट रुंदी व त्यावरील वाहतुकीची गर्दी पाहता हा रस्ता चौपदरीकरण केल्यास वाहतूक कोंडीचा काहीअंशी प्रश्न मार्गी लागेल. शहरातील या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस