शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अरुंद रस्ते, तुडुंब वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 13:23 IST

तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा मार्ग पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडताना तो कोल्हापूर शहरातून जातो. त्यामुळे त्यावरील वाहतुकीचा प्रचंड भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. परिणामी, शहराला वाहतुकीच्या प्रचंड कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील आसपासच्या सुमारे २६ हून अधिक गावांतील बहुतांश नागरिकांचा राबता हा कोल्हापूर शहरात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताणही पडत आहे. शहरात प्रवेश करणारा मार्ग हा शिवाजी पुलावरून येतो. अरुंद पुलावरून एकाचवेळी मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गावरून प्रवेश करणे म्हणजे जीवावर संकट ओढविण्याचा प्रकार होय.शहरात प्रवेशणाºया प्रमुख १२ मार्गांपैकी कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रमुख राज्य महामार्ग होय. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला गोवा, कोकण व पूर्वेकडे कर्नाटक राज्याकडे जाणाºया सर्व अवजड वाहनांची वाहतूक कोल्हापूर शहरातूनच होते. याशिवाय रोज किमान २६ ते २८ हजार वेगवेगळ्या वाहनांची ये-जा शिवाजी पूल मार्गे कोल्हापूर शहरातून होते. पन्हाळा ते कोल्हापूर या मार्गाच्या परिसरातील सुमारे २५ हून अधिक गावांतील नागरिकांचा नोकरीसह विविध निमित्ताने कोल्हापूर शहरात रोजचा राबता आहे. त्यामुळे त्यांचा दैनंदिन भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. मलकापूर ते कोल्हापूरपर्यंतचा मार्ग अवघा १५ फूट रुंदीचा अरुंद असल्याने त्यामानाने त्यावर वाहतुकीचा भार अधिक असल्याने रस्ता रुंदीकरण होणे काळाची गरज बनली आहे.या मार्गावरील वाहतूक कोल्हापुरात प्रवेश केल्यानंतर तिचा परिणाम शहरातील वाहतुकीवर पावलोपावली वाहतुकीच्या कोंडीने दिसून येतो. शिवाजी पूल मार्गे शहरात वाहनांनी प्रवेश केल्यानंतर तोरस्कर चौक, शनिवार पेठ चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, तसेच गंगावेश चौकात त्याचा प्रमुख परिणाम दिसून येतो. अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे लोंढे यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.स्टेशन रोडवर अतिरिक्त भारकोकणची वाहतूक शहरात आल्यानंतर ताण पडणारे तोरस्कर चौक, गंगावेश चौक, सीपीआर चौक व दसरा चौक हे मोठे करून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. दसरा चौकात वाहने आल्यानंतर ती कसबा बावडामार्गे राष्टÑीय महामार्गाकडे वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील स्टेशन रोडवरील भारही कमी होण्यास मदत होईल. चौकाचौकांत दिशादर्शक फलकही लावल्यास वाहतूक रेंगाळून वाहतुकीची कोंडी होणार नाही.रस्ता चौपदरी हवारत्नागिरीहून येणारा मार्ग कोल्हापूर शहरापर्यंत, शिवाजी पूल ते तावडे हॉटेलपर्यंत (राष्टÑीय महामार्गापर्यंत) शहरांतर्गत मार्ग अत्यंत अरुंद असल्याने त्याचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्याची अवघी १५ फूट रुंदी व त्यावरील वाहतुकीची गर्दी पाहता हा रस्ता चौपदरीकरण केल्यास वाहतूक कोंडीचा काहीअंशी प्रश्न मार्गी लागेल. शहरातील या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस