शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:01 IST

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले..

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी विषारी प्राण्यांबरोबर खेळणं सर्पमित्रांच्या जीवावर बेतत असताना पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील सर्पमित्र दिनकर कृष्णा चौगुले यांना ११ वेळा सर्पदंश हाेऊनही ४७ वर्षे सापांना पकडून अधिवासात सोडण्याची सेवा आजही सुरूच ठेवली आहे. त्यांनी जिल्ह्यात १०० हून अधिक सर्पमित्रांना तयार केले आहे तर २० हजारहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे.७० च्या दशकात पोर्ले येथे एक व्यक्ती सापांच्या शेपटीला धरून दगडावर आपटून मारतानाचे पाहून दिनकर यांना वाईट वाटले. वयाच्या १७ व्या वर्षी शेतात उसाचा पाला काढताना सापाच्या डोक्यावर पाय ठेवून शेपटीला पकडलेला साप बाजूच्या शेतात भिरकावला. दरम्यान, बत्तीस शिराळा येथे सापाच्या डोक्यावर काठी ठेवून सापाला पकडले जात असल्याचे माहितीवरून त्यांनी सापांना पकडायला सुरुवात केली. १९७९ मध्ये पहिल्यांदा घोणस तर त्यानंतर दहावेळा नागाचा सर्पदंश झाला. त्यांनी वेळेत उपचार घेतल्याने जीवावर बेतले नाही. विरूळासारख्या बिनविषारी सापापासून अजगरासारखे भले मोठे साप पकडून अधिवासात सोडले आहेत.सापाबद्दल त्यांच्याकडे अगाध ज्ञान आहे. दिनकराव आणि साप असे एक समीकरण बनले आहे. साप चावला की तो विषारी आहे बिनविषारी ते दंश बघून सांगतात. सर्पदंश होऊन जीवावर बेतलेल्या अनेक सर्पमित्र असो शेतकरी त्यांना आधार देऊन वाचविण्याची काम ते आजही करतात. सापाबद्दल लोकाच्या मनात असणारे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी त्यांची प्रबोधनात्मक चळवळ सुरू आहे.

सापाबरोबर बिबट्याही..दिनकरावांनी पन्हाळ्याच्या डोंगरात दोन बिबट्यांना सापळे लावून पकडले होते. तीन दरवाजाजवळील गुढे गावात महिलेला जखमी करून नरभक्षक बनलेल्या बिबट्याला १९८५ मध्ये पकडले होते. घुंघूर बांदिवडे येथील शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या बिबट्यालासुद्धअ त्यांनी पकडून दाजीपूरच्या अरण्यात सोडले होते.

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले..१९८३ ला दिलीप कामत या सर्पमित्राने त्यांना पुण्यात साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी १०० हून अधिक सर्पमित्र तयार केले आहेत. शिवाय एखादा सर्पमित्र आणि शेतकऱ्याला सर्पदंशामुळे जीवावर बेतत असेल तर त्याला वाचविण्यासाठी ते धावून जातात. १९८१ मध्ये पोर्लेत एका खोलीत सर्पालय सुरू केले. या परिसरात अज्ञानपणामुळे बळी जाणाऱ्या सापांना पकडून संगोपन करून, त्यांना वनक्षेत्रात सोडण्याचा त्यांचा उपक्रम आजही सुरू आहे.

साप हा प्राणी विषारी आहे, हे माहीत असतानासुद्धा काही सर्पमित्र त्याच्याबरोबर खेळ करून जीव गमावत आहेत. साप पकडताना स्टंटबाजी करू नका. साप पकडताना स्टिकचा वापर करणे आणि साप चावला तर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, सर्पमित्र पोर्ले तर्फ ठाणे