शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:01 IST

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले..

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी विषारी प्राण्यांबरोबर खेळणं सर्पमित्रांच्या जीवावर बेतत असताना पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील सर्पमित्र दिनकर कृष्णा चौगुले यांना ११ वेळा सर्पदंश हाेऊनही ४७ वर्षे सापांना पकडून अधिवासात सोडण्याची सेवा आजही सुरूच ठेवली आहे. त्यांनी जिल्ह्यात १०० हून अधिक सर्पमित्रांना तयार केले आहे तर २० हजारहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे.७० च्या दशकात पोर्ले येथे एक व्यक्ती सापांच्या शेपटीला धरून दगडावर आपटून मारतानाचे पाहून दिनकर यांना वाईट वाटले. वयाच्या १७ व्या वर्षी शेतात उसाचा पाला काढताना सापाच्या डोक्यावर पाय ठेवून शेपटीला पकडलेला साप बाजूच्या शेतात भिरकावला. दरम्यान, बत्तीस शिराळा येथे सापाच्या डोक्यावर काठी ठेवून सापाला पकडले जात असल्याचे माहितीवरून त्यांनी सापांना पकडायला सुरुवात केली. १९७९ मध्ये पहिल्यांदा घोणस तर त्यानंतर दहावेळा नागाचा सर्पदंश झाला. त्यांनी वेळेत उपचार घेतल्याने जीवावर बेतले नाही. विरूळासारख्या बिनविषारी सापापासून अजगरासारखे भले मोठे साप पकडून अधिवासात सोडले आहेत.सापाबद्दल त्यांच्याकडे अगाध ज्ञान आहे. दिनकराव आणि साप असे एक समीकरण बनले आहे. साप चावला की तो विषारी आहे बिनविषारी ते दंश बघून सांगतात. सर्पदंश होऊन जीवावर बेतलेल्या अनेक सर्पमित्र असो शेतकरी त्यांना आधार देऊन वाचविण्याची काम ते आजही करतात. सापाबद्दल लोकाच्या मनात असणारे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी त्यांची प्रबोधनात्मक चळवळ सुरू आहे.

सापाबरोबर बिबट्याही..दिनकरावांनी पन्हाळ्याच्या डोंगरात दोन बिबट्यांना सापळे लावून पकडले होते. तीन दरवाजाजवळील गुढे गावात महिलेला जखमी करून नरभक्षक बनलेल्या बिबट्याला १९८५ मध्ये पकडले होते. घुंघूर बांदिवडे येथील शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या बिबट्यालासुद्धअ त्यांनी पकडून दाजीपूरच्या अरण्यात सोडले होते.

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले..१९८३ ला दिलीप कामत या सर्पमित्राने त्यांना पुण्यात साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी १०० हून अधिक सर्पमित्र तयार केले आहेत. शिवाय एखादा सर्पमित्र आणि शेतकऱ्याला सर्पदंशामुळे जीवावर बेतत असेल तर त्याला वाचविण्यासाठी ते धावून जातात. १९८१ मध्ये पोर्लेत एका खोलीत सर्पालय सुरू केले. या परिसरात अज्ञानपणामुळे बळी जाणाऱ्या सापांना पकडून संगोपन करून, त्यांना वनक्षेत्रात सोडण्याचा त्यांचा उपक्रम आजही सुरू आहे.

साप हा प्राणी विषारी आहे, हे माहीत असतानासुद्धा काही सर्पमित्र त्याच्याबरोबर खेळ करून जीव गमावत आहेत. साप पकडताना स्टंटबाजी करू नका. साप पकडताना स्टिकचा वापर करणे आणि साप चावला तर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, सर्पमित्र पोर्ले तर्फ ठाणे