शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

माझे कर्तव्यनिष्ठ आजोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST

माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना आपल्यातून कायमचे जाऊन सहा वर्षे पूर्ण झाली. १ एप्रिल २०१५ ...

माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना आपल्यातून कायमचे जाऊन सहा वर्षे पूर्ण झाली. १ एप्रिल २०१५ हा दिवस आमच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद दिवस ठरला. ज्या माणसाच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्याने आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, लाडात वाढविले, तळहातावरील फोडाप्रमाणे जपले तो माणूस आपल्या आयुष्यात कायमचा नसणे म्हणजे किती दु:खदायक आहे आणि ते आपले लाडके असेल तर मग बघायलाच नको.

माणूस मरताना काही घेऊन जात नाही; पण त्यांचे कर्तृत्व त्यांनी केलेली चांगली कामे, अडचणीच्या वेळी माणसाला केलेली मदत मात्र त्या माणसाच्या मरणानंतरही सगळ्यांच्या लक्षात कायमची राहते. त्यांचे चांगले विचार आणि वसा जपला जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि क्षण सार्थकी लावणारे माझे आजोबा असेच प्रत्येकाच्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. त्यांच्या आदर्श विचारांनी ते अजून आपल्या मनात कायम जिवंत आहेत. माणूस स्वत:साठी सगळे करताना पण इतरांसाठी झिजणे, त्यांना मदत करणे यातच खरा मनाचा मोठेपणा आहे.

त्यांनी काढलेल्या संस्थेला ते जिवंत असेपर्यंत स्वत:चे नाव दिले नाही. लोकांनी आग्रह केला तरी त्याला स्पष्ट नकार दिला. आपल्या मतावर ते कायम ठाम राहिले. त्यांच्या पश्चात त्या संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. आम्हालाही या गोष्टीचा अभिमान आहे. प्रत्येक संस्थेतील कामगार, सभासद यांना आजोबांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली. प्रत्येकाला आपुलकीने, मायेने आपलेसे करून माणसे जोडली. ही नाती त्यांनी शेवटपर्यंत जपली.

शेती हा त्यांचा आत्मा होता. शेतीच्या प्रगतीबद्दल ते भरभरून बोलत. शेतात नवनवीन प्रयोग करीत असत. ती आवड त्यांनी माझे पप्पा गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्यात रुजवली. शेती कशी करावी हे फोंड्या माळावर फुललेल्या श्रीवर्धन बायोटेककडे बघितल्यावर लक्षात येईल. त्यासाठी पप्पांनी किती कष्ट घेतले असतील आणि त्यांना आजोबांनी किती साथ दिली याचे उत्तर सापडेल. शेतीला आई मानणाराच शेती चांगल्या रीतीने फुलवू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

आजोबांनी वाचन, नाटक, सिनेमा हे छंद आपल्या कामाच्या व्यापातूनही जोपासले होते. त्यांचे वाचन अफाट होते. पुस्तकातील चांगली व मार्मिक वाक्ये त्यांच्या आठवणीत राहत असत. त्यांनी कधी स्वत:साठी घेतला नाही; पण, सगळ्यांचे फोन नंबर त्यांच्या तोंडपाठ होते. यावरून त्यांची स्मरणशक्ती किती अफाट होती हे लक्षात येईल. भावगीत, नाट्यसंगीत त्यांना फार आवडायचे. आजोबा जेव्हा गाणी गुणगुणत असत त्यावेळी आम्ही ओळखत की, आज आजोबांचा मूड चांगला आहे. या सगळ्या व्यापातूनही आजोबांनी कुटुंबासाठी वेळ देणे ही काही साधी गोष्ट नाही; पण त्यांनी कुटुंबाची पण तेवढीच काळजी घेतली. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांची मन व इच्छा जपण्याचा कसोशीने आणि मनापासून प्रयत्न केला. म्हणूनच ते आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवण्यात यशस्वी झाले. आमचे कुटुंब अजूनही एकसंध आहे आणि शेवटपर्यंत राहणार हीच आमच्या आजोबा आणि आई, पप्पांनी आम्हा कुटुंबाला दिलेली उत्तम विचाराची आणि संस्काराची शिदोरी आहे. कोणतेही काम करताना डगमगून जायचं नाही. प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात करायची, ही शिकवण आजोबांनी आमच्यात रुजवली आहे. आजोबांच्या या शिकवणीमुळे आम्ही आणि आमची पुढची पिढीपण सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनली आहे. त्यांनी आपण स्वत: केलेल्या कामाचा कधी उच्चारही केला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी आम्हाला माणसे भेटायला येत होती, त्यांच्याकडून आम्हाला कळले की, आजोबांनी लोकांसाठी किती केले. ते सांगत की, साहेबांनी आमच्यासाठी किती मदत केली. अडचणीच्या वेळी कसे उपयोगी पडले, हे सगळे ऐकून मन हेलावून जात. त्यामुळे आजोबांविषयी आदर आमच्या मनात अधिकच वाढला आहे. केलेल्या कामाची वाच्यता न करता येणारे काम करीत राहायचे यासाठी मन किती मोठे लागते, हे त्यावेळी आम्हाला कळले. आम्ही कुटुंबीय खरच भाग्यवान आहोत. कारण नि:स्वार्थी आणि प्रेमळ आजोबा एक कुटुंबप्रमुख आम्हाला मिळाले. त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच अवघड आहे. एवढे त्यांचे कर्तृत्व विशाल आहे. अशा माझ्या आजोबांना कोटी कोटी प्रणाम! - अस्मिता रमेश पाटील

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०५-सा. रे. पाटील