शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझे कर्तव्यनिष्ठ आजोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST

माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना आपल्यातून कायमचे जाऊन सहा वर्षे पूर्ण झाली. १ एप्रिल २०१५ ...

माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना आपल्यातून कायमचे जाऊन सहा वर्षे पूर्ण झाली. १ एप्रिल २०१५ हा दिवस आमच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद दिवस ठरला. ज्या माणसाच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्याने आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, लाडात वाढविले, तळहातावरील फोडाप्रमाणे जपले तो माणूस आपल्या आयुष्यात कायमचा नसणे म्हणजे किती दु:खदायक आहे आणि ते आपले लाडके असेल तर मग बघायलाच नको.

माणूस मरताना काही घेऊन जात नाही; पण त्यांचे कर्तृत्व त्यांनी केलेली चांगली कामे, अडचणीच्या वेळी माणसाला केलेली मदत मात्र त्या माणसाच्या मरणानंतरही सगळ्यांच्या लक्षात कायमची राहते. त्यांचे चांगले विचार आणि वसा जपला जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि क्षण सार्थकी लावणारे माझे आजोबा असेच प्रत्येकाच्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. त्यांच्या आदर्श विचारांनी ते अजून आपल्या मनात कायम जिवंत आहेत. माणूस स्वत:साठी सगळे करताना पण इतरांसाठी झिजणे, त्यांना मदत करणे यातच खरा मनाचा मोठेपणा आहे.

त्यांनी काढलेल्या संस्थेला ते जिवंत असेपर्यंत स्वत:चे नाव दिले नाही. लोकांनी आग्रह केला तरी त्याला स्पष्ट नकार दिला. आपल्या मतावर ते कायम ठाम राहिले. त्यांच्या पश्चात त्या संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. आम्हालाही या गोष्टीचा अभिमान आहे. प्रत्येक संस्थेतील कामगार, सभासद यांना आजोबांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली. प्रत्येकाला आपुलकीने, मायेने आपलेसे करून माणसे जोडली. ही नाती त्यांनी शेवटपर्यंत जपली.

शेती हा त्यांचा आत्मा होता. शेतीच्या प्रगतीबद्दल ते भरभरून बोलत. शेतात नवनवीन प्रयोग करीत असत. ती आवड त्यांनी माझे पप्पा गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्यात रुजवली. शेती कशी करावी हे फोंड्या माळावर फुललेल्या श्रीवर्धन बायोटेककडे बघितल्यावर लक्षात येईल. त्यासाठी पप्पांनी किती कष्ट घेतले असतील आणि त्यांना आजोबांनी किती साथ दिली याचे उत्तर सापडेल. शेतीला आई मानणाराच शेती चांगल्या रीतीने फुलवू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

आजोबांनी वाचन, नाटक, सिनेमा हे छंद आपल्या कामाच्या व्यापातूनही जोपासले होते. त्यांचे वाचन अफाट होते. पुस्तकातील चांगली व मार्मिक वाक्ये त्यांच्या आठवणीत राहत असत. त्यांनी कधी स्वत:साठी घेतला नाही; पण, सगळ्यांचे फोन नंबर त्यांच्या तोंडपाठ होते. यावरून त्यांची स्मरणशक्ती किती अफाट होती हे लक्षात येईल. भावगीत, नाट्यसंगीत त्यांना फार आवडायचे. आजोबा जेव्हा गाणी गुणगुणत असत त्यावेळी आम्ही ओळखत की, आज आजोबांचा मूड चांगला आहे. या सगळ्या व्यापातूनही आजोबांनी कुटुंबासाठी वेळ देणे ही काही साधी गोष्ट नाही; पण त्यांनी कुटुंबाची पण तेवढीच काळजी घेतली. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांची मन व इच्छा जपण्याचा कसोशीने आणि मनापासून प्रयत्न केला. म्हणूनच ते आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवण्यात यशस्वी झाले. आमचे कुटुंब अजूनही एकसंध आहे आणि शेवटपर्यंत राहणार हीच आमच्या आजोबा आणि आई, पप्पांनी आम्हा कुटुंबाला दिलेली उत्तम विचाराची आणि संस्काराची शिदोरी आहे. कोणतेही काम करताना डगमगून जायचं नाही. प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात करायची, ही शिकवण आजोबांनी आमच्यात रुजवली आहे. आजोबांच्या या शिकवणीमुळे आम्ही आणि आमची पुढची पिढीपण सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनली आहे. त्यांनी आपण स्वत: केलेल्या कामाचा कधी उच्चारही केला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी आम्हाला माणसे भेटायला येत होती, त्यांच्याकडून आम्हाला कळले की, आजोबांनी लोकांसाठी किती केले. ते सांगत की, साहेबांनी आमच्यासाठी किती मदत केली. अडचणीच्या वेळी कसे उपयोगी पडले, हे सगळे ऐकून मन हेलावून जात. त्यामुळे आजोबांविषयी आदर आमच्या मनात अधिकच वाढला आहे. केलेल्या कामाची वाच्यता न करता येणारे काम करीत राहायचे यासाठी मन किती मोठे लागते, हे त्यावेळी आम्हाला कळले. आम्ही कुटुंबीय खरच भाग्यवान आहोत. कारण नि:स्वार्थी आणि प्रेमळ आजोबा एक कुटुंबप्रमुख आम्हाला मिळाले. त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच अवघड आहे. एवढे त्यांचे कर्तृत्व विशाल आहे. अशा माझ्या आजोबांना कोटी कोटी प्रणाम! - अस्मिता रमेश पाटील

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०५-सा. रे. पाटील