शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

संगीत पंढरपूर उदासिन

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

मांडणीत असमर्थता : स्त्री भूमिकेसाठी म्हणून...राज्य नाट्य स्पर्धा

संगीत पंढरपूर हे महाराष्ट्र संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर झालेले आठवे नाटक. हे नाटक, बृहन्मुंबई महानगरपालीकेच्या प्रमुख कामगार अधिकारी वर्गाकडून सादर करण्यात आले. शैव आणि वैष्णव यांच्यातील द्वंद्व या नाटकात दाखवले आहे.‘लिंबराज’ हे या नाटकातील प्रमुख पात्र आहे. बाकीच्या भूमिका धरुन जवळजवळ २५ कलाकार नाटकात होते. पुरुष कलाकारांचा समावेश जास्त होता. नंदिनी नावाचे पात्र, एखादी स्त्री कलाकार नाटकात हवी म्हणून घेतल्याचे जाणवले. नाटकाचा विषय चांगला व वेगळा होता. सर्व कलाकारांनी अभिनयनसुद्धा चांगला केला. पण तरीही नाटक रंगले नाही. कथेची मांडणी, बांधणी कंटाळवाणी वाटली.उदय देसाई (लिंबराज) यांनी नाटकाचे संगीत दिग्दर्शन करुन स्वत: नाटकामध्ये भूमिका केली. तबला साथ अतूल ताडे यांनी केली. परंतु अरुण पुराणिक (आॅर्गन) आॅर्गन वाजवताना कसरत होत होती. बरेचसे स्वर त्यांना सापडत नव्हते. इतर तालवादकांनी चांगली साथ केली. लींबराज (उदय देसाई) यांनी पदे रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु त्यांचा आवाज काहीवेळा सुरांपासून वेगळा होत होता. नांदी व काहीच पदे चांगली रंगली. संजीव बर्वे (नारद) यांनीही काही पदे चांगली गायली. दोन गीते नृत्यासहित सादर झाली. त्या गाण्यांवर व नृत्यावर मेहनत घेतल्याचे जाणवले. नृत्यदिग्दर्शन उत्कृष्ट होते. बालकलाकार शर्वरी तळाशिलकर (माधवी) हिनेही आपली भूमिका चांगली निभावली.राजेंद्र पोतदार (विठ्ठल) यांनी चेहऱ्यावर कायम हास्य ठेवून विठ्ठल साकारला. संजय गडद ( कार्तिक स्वामी) यांनी दक्षिण भारतातील व्यक्तीमत्व चांगले रंगविले. भाषा, देहबोली यावरील त्यांचा अभ्यास चांगला वाटला.सुजाता धुतेनवरु (नंदिनी) यांची नाटकातील भूमिका फारशी महत्त्वाची वाटली नाही. एखादे कृ त्रीम आवाजात गायले जात होते. शब्द कळत नव्हते. इतर पात्रांनीसुद्धा आपापल्या भूमिका चांगल्या पार पाडल्या. नारदाची भूमिका अधिक मजेदार व्हायला हवी होती. वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य सारे मन सुखावणारे होते.नाटकामध्ये नाटक रंगण्यासाठी कथानकाची दर्जेदार मांडणी असावी लागते. या नाटकामध्ये विषय चांगला असूनही कथानकाची मांडणी आकर्षक झाली नाही, असे वाटले व त्यामुळेच नाटक रंगले नाही. मात्र, स्पर्धेतील नाटक सादर करताना त्यात प्रयोगशीलता हवी, मात्र तीही पहायला मिळाली नसल्याने एकंदर नाटक रसिकांसाठी उदासिनच. संगीत पंढरपूर हे नाटक कथेच्या आघाडीवर अडखळले असले, तरी त्यातून महत्त्वाचे कथाभाग कंटाळवाणा वाटला. महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कलाकार असले पाहिजेत, मात्र त्यातही या नाटकाचे सादरीकरण करताना यश आले नाही. मात्र अशा सर्व आघाड्यांवर नाट्यकलावंतांनी आपला प्रभाव दाखवणे गरजेचे होते, मात्र, ते झाले नसल्याने नाटक रसिकांच्या दृष्टीने कंटाळवाणे झाले. स्पर्धेत उतरताना अशा मंडळांनी हे भान ठेवले पाहिजे.संध्या सुर्वे