शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

संगीत पंढरपूर उदासिन

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

मांडणीत असमर्थता : स्त्री भूमिकेसाठी म्हणून...राज्य नाट्य स्पर्धा

संगीत पंढरपूर हे महाराष्ट्र संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर झालेले आठवे नाटक. हे नाटक, बृहन्मुंबई महानगरपालीकेच्या प्रमुख कामगार अधिकारी वर्गाकडून सादर करण्यात आले. शैव आणि वैष्णव यांच्यातील द्वंद्व या नाटकात दाखवले आहे.‘लिंबराज’ हे या नाटकातील प्रमुख पात्र आहे. बाकीच्या भूमिका धरुन जवळजवळ २५ कलाकार नाटकात होते. पुरुष कलाकारांचा समावेश जास्त होता. नंदिनी नावाचे पात्र, एखादी स्त्री कलाकार नाटकात हवी म्हणून घेतल्याचे जाणवले. नाटकाचा विषय चांगला व वेगळा होता. सर्व कलाकारांनी अभिनयनसुद्धा चांगला केला. पण तरीही नाटक रंगले नाही. कथेची मांडणी, बांधणी कंटाळवाणी वाटली.उदय देसाई (लिंबराज) यांनी नाटकाचे संगीत दिग्दर्शन करुन स्वत: नाटकामध्ये भूमिका केली. तबला साथ अतूल ताडे यांनी केली. परंतु अरुण पुराणिक (आॅर्गन) आॅर्गन वाजवताना कसरत होत होती. बरेचसे स्वर त्यांना सापडत नव्हते. इतर तालवादकांनी चांगली साथ केली. लींबराज (उदय देसाई) यांनी पदे रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु त्यांचा आवाज काहीवेळा सुरांपासून वेगळा होत होता. नांदी व काहीच पदे चांगली रंगली. संजीव बर्वे (नारद) यांनीही काही पदे चांगली गायली. दोन गीते नृत्यासहित सादर झाली. त्या गाण्यांवर व नृत्यावर मेहनत घेतल्याचे जाणवले. नृत्यदिग्दर्शन उत्कृष्ट होते. बालकलाकार शर्वरी तळाशिलकर (माधवी) हिनेही आपली भूमिका चांगली निभावली.राजेंद्र पोतदार (विठ्ठल) यांनी चेहऱ्यावर कायम हास्य ठेवून विठ्ठल साकारला. संजय गडद ( कार्तिक स्वामी) यांनी दक्षिण भारतातील व्यक्तीमत्व चांगले रंगविले. भाषा, देहबोली यावरील त्यांचा अभ्यास चांगला वाटला.सुजाता धुतेनवरु (नंदिनी) यांची नाटकातील भूमिका फारशी महत्त्वाची वाटली नाही. एखादे कृ त्रीम आवाजात गायले जात होते. शब्द कळत नव्हते. इतर पात्रांनीसुद्धा आपापल्या भूमिका चांगल्या पार पाडल्या. नारदाची भूमिका अधिक मजेदार व्हायला हवी होती. वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य सारे मन सुखावणारे होते.नाटकामध्ये नाटक रंगण्यासाठी कथानकाची दर्जेदार मांडणी असावी लागते. या नाटकामध्ये विषय चांगला असूनही कथानकाची मांडणी आकर्षक झाली नाही, असे वाटले व त्यामुळेच नाटक रंगले नाही. मात्र, स्पर्धेतील नाटक सादर करताना त्यात प्रयोगशीलता हवी, मात्र तीही पहायला मिळाली नसल्याने एकंदर नाटक रसिकांसाठी उदासिनच. संगीत पंढरपूर हे नाटक कथेच्या आघाडीवर अडखळले असले, तरी त्यातून महत्त्वाचे कथाभाग कंटाळवाणा वाटला. महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कलाकार असले पाहिजेत, मात्र त्यातही या नाटकाचे सादरीकरण करताना यश आले नाही. मात्र अशा सर्व आघाड्यांवर नाट्यकलावंतांनी आपला प्रभाव दाखवणे गरजेचे होते, मात्र, ते झाले नसल्याने नाटक रसिकांच्या दृष्टीने कंटाळवाणे झाले. स्पर्धेत उतरताना अशा मंडळांनी हे भान ठेवले पाहिजे.संध्या सुर्वे