शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक खून माफ ?--दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:04 IST

चंद्रकांत कित्तुरे -मोबाईलमधील कॅमेराचा ज्याने शोध लावला आहे, त्याचा मला खून करायचा आहे. हा खून मला माफ करावा, अशी विनंती आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याची टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे. त्यांची ही टिप्पणी मिष्कील असली तरी सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. कारण ...

चंद्रकांत कित्तुरे -

मोबाईलमधील कॅमेराचा ज्याने शोध लावला आहे, त्याचा मला खून करायचा आहे. हा खून मला माफ करावा, अशी विनंती आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याची टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे. त्यांची ही टिप्पणी मिष्कील असली तरी सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. कारण आधुनिक युगातील मोबाईलचा शोध आणि त्यातील कॅमेऱ्याच्या शोधाने तंत्रज्ञानात तसेच मानवी जीवनात क्रांती घडवून आणली आहे. त्याचे फायदे अनेक असले तरी तोटेही बरेच आहेत. राज ठाकरे यांना आपल्या मोबाईल कॅमेºयात टिपण्यासाठी धडपडणारी गर्दी पाहून त्यांनी ही टिप्पणी केली. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात कोणत्याही कार्यक्रमात असते.

विशेषत: एखादा सेलिब्रिटी पाहुणा असेल तर ही गर्दी अधिकच असते. प्रत्येकाला सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढायचा असतो किंवा त्या कार्यक्रमाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून ठेवायची असते. तो क्षण त्याच्यासाठी आयुष्यातील एक अनमोल ठेवाही असू शकतो. मात्र, हे सर्व करताना आपण त्या कार्यक्रमाच्या रंगाचा बेरंग तर करत नाही ना? किंवा वेळ वाया घालवून कार्यक्रम लांबवत तर नाही ना? याचा विचार या मोबाईलधारकांनी करायला हवा, हेच राज ठाकरे यांना आपल्या या टिप्पणीतून सुचवायचे आहे. त्यांचा हा संकेत कितीजण विचारात घेतील हा प्रश्नच आहे शिवाय मनाला संताप आणणाºया इतर अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल असा विचार करायचा का? समाजाची मानसिकता कशी बदलणार?

मोबाईलबद्दलच बोलायचे झाले तर या मोबाईलने जगाला अक्षरश: वेड लावले आहे. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. एका आकडेवारीनुसार भारतात कोट्यवधी मोबाईलधारक आहेत. त्यातील बहुतेकांचा सोशल मीडियावर अनिर्बंध संचार असतो. भारताची लोकसंख्या एक अब्ज २० कोटी आहे. त्याच्या तिप्पट म्हणजेच तीन अब्ज ३० कोटी लोक जगभरात सोशल मीडियाचा वापर करतात. यातील दोन अब्ज २० कोटी लोक फेसबुक युजर आहेत तर एक अब्ज ५० कोटी लोक युट्यूब तितकेच लोक व्हॉटस् अ‍ॅपवरही सक्रिय आहेत तर ३३ कोटी लोक टिष्ट्वटरवर टिवटिवाट करत असतात. टिष्ट्वटरवरील लोकांची ही संख्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, त्रिपुराच्या लोकसंख्येएवढी आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांचा सर्व्हे एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आला त्याचा हा निष्कर्ष आहे. याचाच अर्थ सोशल मीडियाने मानवी विश्व किती व्यापले आहे हे दिसते.

मोबाईल आणि सोशल मीडियाने व्यक्ती-व्यक्तींमधील, नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. कुठेही गेलात तरी प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलेला आपल्याला दिसतो. या मोबाईल सर्फिंगमुळे आपला कितीवेळ वाया जातो याचे भान कुणालाही नसते. असे असले तरी हाच सोशल मीडिया सध्या दुधारी शस्त्र बनला आहे. त्याचा जसा चांगल्या कामांसाठी वापर केला जातो तसाच एखादी अफवा किंवा गैरसमज पसरवण्यासाठीही वापर होतो. दोन वर्षांपूर्वी दोन देशांमध्ये क्रांती घडवून आणण्याची किमयाही याच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती.

एवढेच काय सन २०१४ च्या भारतातील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यातही या सोशल मीडियाचे मोठे योगदान होते. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी याचा मोठ्या प्रमाणात आधार घेतला आहे. कारण जनमत बनवण्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी हत्यार नाही. याचवेळी जातीय द्वेष पसरविण्यासाठीही याचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणाºयांविरुद्ध कडक कारवाईची तरतूद असणारा कायदा सरकारने केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘सायबर क्राईम’खाली गुन्हे नोंदवून खटले भरले जात आहेत तरीही सोशल मीडियाचा गैरवापर कमी होत असल्याचे दिसत नाही. मोबाईल कॅमेºयाने तर छायाचित्रकाराची गरजच जणू संपुष्टात आणल्यासारखे चित्र आहे शिवाय मोबाईलने काढलेल्या छायाचित्रांशी छेडछाड करून त्याचाही गैरवापर होत असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे मोठे आव्हान आहे. तरुणपिढीसह सर्वांनीच मोबाईल आणि सोशल मीडियाचा विधायक कामासाठीच वापर करावा, यासाठी प्रबोधन आणि कडक कायदा हेच खरे उपाय आहेत.(लेखक लोकमतचे उपवृत्त संपादक आहेत)

(kollokmatpratisad@gmail.com)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMobileमोबाइल