शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक; संभ्रमात अधिकच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ‘एक प्रभाग, एक सदस्य’ प्रभागरचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली असताना आता दुसरीकडे ...

कोल्हापूर : एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ‘एक प्रभाग, एक सदस्य’ प्रभागरचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली असताना आता दुसरीकडे राज्य सरकारच्या पातळीवर ‘चौसदस्य’ प्रभाग रचना करण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चेने कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक नेमकी कशी होणार, याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. जर राज्य सरकारने निर्णय घेतला तर आतापर्यंत झालेली अर्धी प्रक्रिया रद्द करणार का, महापौरपदाचे आरक्षण बदलणार का, असे प्रश्न त्यांना पडले असून, इच्छुक धास्तावले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १५ नोव्हेंबर २०२० पूर्वी होणे अपेक्षित होते; परंतु कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारने कोल्हापूर महानगरपालिकेस निवडणूकपूर्व प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने प्रभाग निश्चिती, प्रभागावरील आरक्षण, प्रभागनिहाय कच्ची मतदार यादी, पक्की मतदार यादी तयार केली आहे. मार्चनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस सुरुवात झाली. त्यामुळे ही प्रक्रिया अर्ध्यावर थांबवावी लागली.

आता कुठे कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असताना पुन्हा निवडणुका कधी लागणार, याची उत्कंठा लागली असतानाच ओबीसी आरक्षण आणि आता चौसदस्य प्रभाग चर्चेत आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेसह पाच महापालिकांची सभागृहे अस्तित्वात नाहीत, तर पुढील वर्षीच्या मार्चअखेर आणखी दहा महानगरपालिकांच्या सभागृहांची मुदत संपणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सहा महिने आधी करावी लागते. ती सुरू होण्याची वेळ आली असतानाच ओबीसी आरक्षण आणि चौसदस्य प्रभाग रचना चर्चेत आली आहे.

एकीकडे पाच महापालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना ती थांबविल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच आता चौसदस्य प्रभाग रचना केली जाणार असल्याची चर्चा सुुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

जवळपास अर्धी पूर्ण झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द होईल का, आरक्षणे नव्याने टाकणार का, चौसदस्य प्रभाग रचना अस्तित्वात येणार का, ओबीसी आरक्षण नव्याने टाकणार का, महापौरपदाचे आरक्षण बदलणार का, अशा अनेक प्रश्नांनी इच्छुकांना भंडावून सोडले आहे. या प्रश्नांची नेमकी व खात्रीशीर माहिती कोणाकडे नसल्याने संपूर्ण निवणुकीबाबतच संभ्रम आहे. महापालिका अधिकारीसुद्धा याबाबत संभ्रमात आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांप्रमाणे पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे अधिकारी सांगत आहेत.