शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

महापालिका निवडणूक; संभ्रमात अधिकच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ‘एक प्रभाग, एक सदस्य’ प्रभागरचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली असताना आता दुसरीकडे ...

कोल्हापूर : एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ‘एक प्रभाग, एक सदस्य’ प्रभागरचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली असताना आता दुसरीकडे राज्य सरकारच्या पातळीवर ‘चौसदस्य’ प्रभाग रचना करण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चेने कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक नेमकी कशी होणार, याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. जर राज्य सरकारने निर्णय घेतला तर आतापर्यंत झालेली अर्धी प्रक्रिया रद्द करणार का, महापौरपदाचे आरक्षण बदलणार का, असे प्रश्न त्यांना पडले असून, इच्छुक धास्तावले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १५ नोव्हेंबर २०२० पूर्वी होणे अपेक्षित होते; परंतु कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारने कोल्हापूर महानगरपालिकेस निवडणूकपूर्व प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने प्रभाग निश्चिती, प्रभागावरील आरक्षण, प्रभागनिहाय कच्ची मतदार यादी, पक्की मतदार यादी तयार केली आहे. मार्चनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस सुरुवात झाली. त्यामुळे ही प्रक्रिया अर्ध्यावर थांबवावी लागली.

आता कुठे कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असताना पुन्हा निवडणुका कधी लागणार, याची उत्कंठा लागली असतानाच ओबीसी आरक्षण आणि आता चौसदस्य प्रभाग चर्चेत आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेसह पाच महापालिकांची सभागृहे अस्तित्वात नाहीत, तर पुढील वर्षीच्या मार्चअखेर आणखी दहा महानगरपालिकांच्या सभागृहांची मुदत संपणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सहा महिने आधी करावी लागते. ती सुरू होण्याची वेळ आली असतानाच ओबीसी आरक्षण आणि चौसदस्य प्रभाग रचना चर्चेत आली आहे.

एकीकडे पाच महापालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना ती थांबविल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच आता चौसदस्य प्रभाग रचना केली जाणार असल्याची चर्चा सुुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

जवळपास अर्धी पूर्ण झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द होईल का, आरक्षणे नव्याने टाकणार का, चौसदस्य प्रभाग रचना अस्तित्वात येणार का, ओबीसी आरक्षण नव्याने टाकणार का, महापौरपदाचे आरक्षण बदलणार का, अशा अनेक प्रश्नांनी इच्छुकांना भंडावून सोडले आहे. या प्रश्नांची नेमकी व खात्रीशीर माहिती कोणाकडे नसल्याने संपूर्ण निवणुकीबाबतच संभ्रम आहे. महापालिका अधिकारीसुद्धा याबाबत संभ्रमात आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांप्रमाणे पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे अधिकारी सांगत आहेत.