शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

महानगरपालिका निवडणूक कडक निर्बंधांच्या कचाट्यात, काय आहेत निर्बंध? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:02 IST

उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिकेच्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडून निर्बंधांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर कारवाईसुध्दा होणार आहे.महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची तयारी पालिका प्रशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. पालिका प्रशासनाने प्रभागांचे प्रारूप आराखडे तयार करून आयोगास सादर केले आहेत. आता आयोगाकडून प्रारूप आराखडे जाहीर केले जाण्याची प्रतीक्षा आहे.एकीकडे प्रारूप आराखडे, आरक्षण प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची यावर ठोस निर्णय होत असताना त्याही पुढे जाऊन आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणते नियम पाळायचे आहेत, कशाप्रकारे पाळायचे आहेत याचे सविस्तर पत्र महानगरपालिकेला पाठविले आहे.सर्वसाधारण नियम असे - निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्ती, कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे. 

- मतदान कक्षात काम करणाऱ्या सर्वांना दोन डोस घेणे आवश्यक. दोन डोस झाले नसतील तर ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक. 

- मतदान केंद्रात प्रवेश करणाऱ्यांचे तापमान तपासणार. मतदान केंद्रात सामाजिक अंतर राखणे आवश्यक. 

- शक्यतो मोठ्या हॉलमध्ये केंद्र सुरू करावीत. मतदान यंत्र हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोज आवश्यक.

नामनिर्देशन प्रक्रियाउमेदवारी अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यानंतर त्याची प्रिंट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहेत. यावेळी दोन व्यक्तींनाच प्रवेश देणार. बहुसदस्य प्रभाग असल्यास एका केंद्रावर मतदार संख्या ७०० ते ८०० असणार, एक सदस्य प्रभाग असल्याच एक हजार मतदार संख्या असणार.मतदारांचा थर्मल स्कॅनिंग होणार. मास्क नसल्यास केंद्रातून देण्याची सोय. पॉझिटिव्ह रुग्णांना शेवटच्या एक तासात मतदानाची परवानगी. मतमोजणी केंद्रातही हीच नियमावली असेल.प्रचार कसा करायचा? -राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार कसा करावा याचेही नियम केले आहेत. पहाटे पाच ते रात्री ११ जमावबंदी असल्याने पाच लोकांना येण्यास प्रतिबंध असेल.मोठ्या जागेत ५० लाेकांच्या उपस्थितीत सभा घेण्यासाठी परवानगी आवश्यक. पदयात्रा, घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा कमी लोकांना परवानगी. मतमोजणीनंतर मिरवणूक काढण्यास बंदी असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक