शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीने नेमली तज्ज्ञांची जाहीरनामा समिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:17 IST

महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार हे खरे असले तरी या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क तज्ज्ञांची जाहीरनामा समिती नेमली आहे.

ठळक मुद्देमहापालिका निवडणूक : राष्ट्रवादीने नेमली तज्ज्ञांची जाहीरनामा समिती प्रश्नांवलीद्वारे घेणार प्रश्नांचा कानोसा

कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार हे खरे असले तरी या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क तज्ज्ञांची जाहीरनामा समिती नेमली आहे.

प्रत्येक प्रभागांतून मोजक्या पन्नास लोकांकडून प्रश्नावली भरून घेऊन त्याचे प्रतिबिंब जाहीरनाम्यामध्ये पडावे, असा पक्षाचा प्रयत्न आहे. नुसता जाहीरनामा द्यायचा आणि सत्ता आली की आपल्याला हवा तसाच कारभार करायचा, याला चाप लावून जाहीरनामा हा आश्वासनपूर्तींचा दस्तऐवज व्हावा, असा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न आहे.पुणे महापालिका निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करत आहे. त्याचा अहवाल थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत जातो. तशाच पद्धतीने कोल्हापुरातही काम व्हावे, असा पवार यांचा आग्रह आहे. त्यामुळेच कुलकर्णी व राज्य अर्बन सेल समितीच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याच शहरांत राष्ट्रवादीला अजून म्हणावे तेवढे पाठबळ मिळत नाही. यापुढील काळात शहरी मतदारांना आकर्षित करायचे असेल तर शहरी लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातले पाहिजे, असे त्यामागील पक्षनेतृत्वाचे नियोजन आहे.जाहीरनाम्यातील आश्वासने पाळायचीच नसतात असाच बहुतेक राजकीय पक्षांचा समज असतो. त्या पार्श्वभूमीवर या विषयाकडे राष्ट्रवादी प्रथमच इतक्या गांभीर्याने पाहत आहे. या जाहीरनाम्याबद्दलची प्राथमिक बैठक झूमच्या माध्यमातून झाली.

ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राजकीय पक्षांचे जाहीरनामे जनता गांभीर्याने घेत नाही. कारण काय आश्वासने दिली होती ते पक्षच विसरतात. लोकांच्या अपेक्षा, गरजा पूर्ण होत नसल्याने लोक जाहीरनाम्यांवर विश्वास ठेवत नाहीत. राष्ट्रवादी त्याला अपवाद ठरावा, असे काम अपेक्षित आहे. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, केवळ निवडणूक जिंकणे हे राष्ट्रवादीचे धोरण नाही. पक्षाचे कोल्हापूरचा विकास हेच खरे मिशन असेल.शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, सध्या महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत असून पक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समन्वयाने काम सुरू आहे. चर्चेत रमेश पोवार,सुनील देसाई, महेश चव्हाण,रशीद मुजावर,जहिदा मुजावर यांनी भाग घेतला.पक्षाचा जाहीरनामा कसा असावा...

  • पक्षाचा जाहीरनामा हा वैचारिक विषय असतो, पुढील पंचवीस वर्षांचे शहर नियोजन त्यात दिसले पाहिजे
  • नुसत्या आकर्षक घोषणा नकोत, त्या पूर्ण करण्याचा अभ्यास हवाच
  • जाहीरनामा ही काय कल्पनाविलास करण्याची जागा नव्हे
  • जाहीरनामा करताना राजकीय कार्यकर्त्यांऐवजी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी
  • सर्वसामान्यांच्या अपेक्षा प्रतिबिंबित होताना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील योजनांचा आणि अर्थसाहाय्याचा विचार केला पाहिजे.
  • जाहीरनाम्यातील कोणती आश्वासने पूर्ण झाली याचा सातत्याने मागोवा घेतला पाहिजे
टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर