शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिक चे कसबा बावडा येथील ‘एसटीपी’ पावसाळ्यात बंद

By admin | Updated: September 11, 2014 00:13 IST

ड्रेनेज लाईन नसल्याचा परिणाम : पावसाळ्यात ६० लाखांची बचत

कोल्हापूर : महापालिक चे कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू होऊन तीन महिने झाले. यानंतर चाचणी परीक्षणादरम्यान, उच्च न्यायालयास अहवाल देण्यापूर्वी तसेच उद्घाटनापूर्वी एक दिवस असे एकूण तीन दिवसच प्लँट सुरू झाला. शहरातील सांडपाणी उघड्या नाल्यातून वाहत असल्याने पावसाळी पाण्यावरही प्रक्रियेचे जादा पैसे मोजावे लागतात. पावसाळ्यात पाण्याचा ‘बीओडी’स्तरही चांगला असतो. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात प्लँट बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट) सध्या ४८ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेला दोनवेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) ३१ मार्चपर्यंत सुरू करण्याचे निर्देष न्यायालयाने दिले होते. मात्र, ठेकेदाराची आर्थिक अडचण व तांत्रिक बाबींमुळे प्लँट सुरू होण्यास विलंब लागला. जुलै महिन्यात वाजत-गाजत महापालिकेने प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, यानंतरही प्लँट बंदच राहिल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)पुनर्वापराचे आव्हानप्रक्रिया केलेल्या पाण्याचा बी.ओ.डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक) १० एम.जी. प्रती लिटरपेक्षा कमी असण्याचा दावा महापालिकेने केला. या वर्षाअखेरपर्यंत ७६ एमएलडी पाण्यावर प्रक्रियाची शक्यता आहे. केंद्रातून बाहेर पडणारे हे पाणी किमान शंभर एकर शेतीसह, बागा, बांधकाम आदींसाठी वापरण्याची योजना आहे. या पाण्याच्या पुनर्वापराचे आव्हान आहे.६० लाखांची बचतकोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते. एक एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रूपये खर्च येतो. प्रक्रिया केंद्राची सध्याची क्षमता ४८ एमएलडी आहे.प्रतिदिन ६७ हजार ७२८ रुपये सांडपाण्यावर प्रक्रियाचा खर्च करावे लागतील. पावसाळ्यात केंद्र बंद ठेवल्याने ६० लाख ९५ हजार रुपयांची बचत होते.