शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या फस्त जागांची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:48 IST

कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाची जागा बळकावून कुणी हॉस्पिटले उभा केली; महापालिकेत करार करून कुणी तलावात पार्क उभा केला, कुणाच्या हॉटेलचे पार्किंग कोणत्या जागेत आहे, कुणाच्या मंगल कार्यालयाचे किती ...

कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाची जागा बळकावून कुणी हॉस्पिटले उभा केली; महापालिकेत करार करून कुणी तलावात पार्क उभा केला, कुणाच्या हॉटेलचे पार्किंग कोणत्या जागेत आहे, कुणाच्या मंगल कार्यालयाचे किती मजले उभे राहिले याची नक्की चौकशी करणार आहे. मी काही चौकशीची मागणी करून गप्प बसायला नुसता विरोधी पक्षनेता नाही. मी स्वत:च या राज्य मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान असलेला मंत्री असल्याने थेट चौकशीच सुरू करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.त्याचबरोबर तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण कारवाई रोखण्यामध्ये आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तावडे हॉटेल परिसर बांधकाम प्रकरणावर भाजप व दोन्ही काँग्रेसमध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत. यावेळी आमदार अमल महाडिक, बाबा इंदुलकर उपस्थित होते.मी आजपर्यंत फक्त सकारात्मक कामांची माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषद घेत होतो; परंतु आज वेगळ्या विषयांवर बोलणार असल्याचे सुरुवातीलाच सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘उचगावमधील इमारती वाचविण्याच्या मागे मी उभा उसल्याचे चुकीचे चित्र तयार केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे व मी त्या इमारती पाडू देत नाही, असेही सांगण्यात येत आहे; परंतु या जागेवर महापालिकेने मालकी सांगण्यापूर्वी उचगाव ग्रामपंचायतीकडून एका व्यक्तीने ही जागा घेऊन त्याचे भूखंड पाडले व त्यावर ग्रामपंचायतीकडून परवानगी घेऊन बांधकामे झाली. हद्दवाढीत आलेली बांधकामे त्यांच्याकडून दंड भरून नियमित केली जातात. राज्य सरकारचे धोरण हे पूरक निर्णय घेणारे असते.बगलबच्च्यांना घेऊन नव्हे...स्वत: पुढे येऊन टीका करामहापालिकेत काँग्रेसवाले सत्ता मिळवत होते, ते या शहराचा विकास करायचा म्हणून नव्हे; तर आरक्षणे उठवून जागा लाटण्यासाठीच त्यांना सत्ता हवी होती. हे कोण करीत होते, त्यांचे कुणाचेही नाव मी घेणार नाही. हे कुणी केले आहे, त्याला ती टोपी बसेल. तुमच्यात हिंमत असेल तर बगलबच्च्यांना नव्हे, तर तुम्ही स्वत: नाव घेऊन टीका करा. चिल्ल्यापिल्ल्यांना पुढे करू नका. मी त्या सगळ्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.येडा आहे का...?‘नेता म्हणून तुमची प्रतिमा शांत, संयमी असताना आज अचानक इतके आक्रमक व संतप्त का झाला आहात?’ अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर मंत्री पाटील म्हणाले, ‘जेव्हा गोष्टी साचत जातात तेव्हा त्यांचा स्फोट होतो. ऊठसूट कुणीही आरोप करून ते खपवून घ्यायला मी येडा आहे का...?’