शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

महापालिकेच्या फस्त जागांची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:48 IST

कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाची जागा बळकावून कुणी हॉस्पिटले उभा केली; महापालिकेत करार करून कुणी तलावात पार्क उभा केला, कुणाच्या हॉटेलचे पार्किंग कोणत्या जागेत आहे, कुणाच्या मंगल कार्यालयाचे किती ...

कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाची जागा बळकावून कुणी हॉस्पिटले उभा केली; महापालिकेत करार करून कुणी तलावात पार्क उभा केला, कुणाच्या हॉटेलचे पार्किंग कोणत्या जागेत आहे, कुणाच्या मंगल कार्यालयाचे किती मजले उभे राहिले याची नक्की चौकशी करणार आहे. मी काही चौकशीची मागणी करून गप्प बसायला नुसता विरोधी पक्षनेता नाही. मी स्वत:च या राज्य मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान असलेला मंत्री असल्याने थेट चौकशीच सुरू करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.त्याचबरोबर तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण कारवाई रोखण्यामध्ये आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तावडे हॉटेल परिसर बांधकाम प्रकरणावर भाजप व दोन्ही काँग्रेसमध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत. यावेळी आमदार अमल महाडिक, बाबा इंदुलकर उपस्थित होते.मी आजपर्यंत फक्त सकारात्मक कामांची माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषद घेत होतो; परंतु आज वेगळ्या विषयांवर बोलणार असल्याचे सुरुवातीलाच सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘उचगावमधील इमारती वाचविण्याच्या मागे मी उभा उसल्याचे चुकीचे चित्र तयार केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे व मी त्या इमारती पाडू देत नाही, असेही सांगण्यात येत आहे; परंतु या जागेवर महापालिकेने मालकी सांगण्यापूर्वी उचगाव ग्रामपंचायतीकडून एका व्यक्तीने ही जागा घेऊन त्याचे भूखंड पाडले व त्यावर ग्रामपंचायतीकडून परवानगी घेऊन बांधकामे झाली. हद्दवाढीत आलेली बांधकामे त्यांच्याकडून दंड भरून नियमित केली जातात. राज्य सरकारचे धोरण हे पूरक निर्णय घेणारे असते.बगलबच्च्यांना घेऊन नव्हे...स्वत: पुढे येऊन टीका करामहापालिकेत काँग्रेसवाले सत्ता मिळवत होते, ते या शहराचा विकास करायचा म्हणून नव्हे; तर आरक्षणे उठवून जागा लाटण्यासाठीच त्यांना सत्ता हवी होती. हे कोण करीत होते, त्यांचे कुणाचेही नाव मी घेणार नाही. हे कुणी केले आहे, त्याला ती टोपी बसेल. तुमच्यात हिंमत असेल तर बगलबच्च्यांना नव्हे, तर तुम्ही स्वत: नाव घेऊन टीका करा. चिल्ल्यापिल्ल्यांना पुढे करू नका. मी त्या सगळ्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.येडा आहे का...?‘नेता म्हणून तुमची प्रतिमा शांत, संयमी असताना आज अचानक इतके आक्रमक व संतप्त का झाला आहात?’ अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर मंत्री पाटील म्हणाले, ‘जेव्हा गोष्टी साचत जातात तेव्हा त्यांचा स्फोट होतो. ऊठसूट कुणीही आरोप करून ते खपवून घ्यायला मी येडा आहे का...?’