शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Kolhapur Circuit Bench: चार लाख खटल्यांच्या कामकाजाला येणार गती

By उद्धव गोडसे | Updated: August 2, 2025 13:45 IST

पक्षकारांना वेळेत अन् सुलभ न्याय मिळणार, मुंबईवरील ताण झाला हलका

उद्धव गोडसे

कोल्हापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील सुमारे चार लाखांहून अधिक खटले मंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरातील खंडपीठामुळे या खटल्यांच्या कामांना गती येणार आहे. यामुळे सहा जिल्ह्यांतील पक्षकारांना वेळेत आणि सुलभ न्याय मिळणे शक्य होणार आहे, तसेच मुंबईतील ताण काहीसा कमी होणार आहे.कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सुमारे चार लाख खटले सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याच्या कामकाजासाठी पक्षकारांसह वकिलांना मुंबईला जावे लागत होते. एका सुनावणीसाठी दोन रात्री आणि एका दिवसाचा वेळ जात होता. याशिवाय प्रवास, जेवणखाणे यासाठी किमान तीन ते पाच हजारांचा खर्च करावा लागत होता. याशिवाय कामानुसार वकिलांची फी वेगळीच. 

वाचा : १९८२ पासून मागणी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा; संपुर्ण घटनाक्रम.. पुढील तारीख मिळाल्यास हेलपाटा वाया जायचा. हजारो पक्षकार वर्षानुवर्ष हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे न्याय विकत घेत असल्याची भावना पक्षकारांच्या मनात होती. कोल्हापुरातील खंडपीठामुळे पक्षकारांची मुंबईची फेरी वाचणार आहे. सोलापूरच्या पक्षकाराला फार तर २०० ते २५० किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात यावे लागेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा कोल्हापूरशी नेहमीच थेट संपर्क असतो. त्या जिल्ह्यातील पक्षकारांना १५० ते २०० किलोमीटरपर्यंत प्रवास करून कोल्हापुरात पोहोचणे सोयीचे आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठीही कोल्हापुरातील खंडपीठ अगदीच सोयीचे आहे. त्यामुळे पक्षकारांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

वाचा : उच्च न्यायालयाचे खंडपीठ-सर्किट बेंचमध्ये फरक काय ?सहा जिल्ह्यांची स्थिती

  • एकूण जिल्हे - ६
  • तालुके - ६२
  • लोकसंख्या - १ कोटी ६४ लाख ७५ हजार
  • प्रलंबित खटले - ४ लाख