शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Kolhapur Circuit Bench: चार लाख खटल्यांच्या कामकाजाला येणार गती

By उद्धव गोडसे | Updated: August 2, 2025 13:45 IST

पक्षकारांना वेळेत अन् सुलभ न्याय मिळणार, मुंबईवरील ताण झाला हलका

उद्धव गोडसे

कोल्हापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील सुमारे चार लाखांहून अधिक खटले मंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरातील खंडपीठामुळे या खटल्यांच्या कामांना गती येणार आहे. यामुळे सहा जिल्ह्यांतील पक्षकारांना वेळेत आणि सुलभ न्याय मिळणे शक्य होणार आहे, तसेच मुंबईतील ताण काहीसा कमी होणार आहे.कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सुमारे चार लाख खटले सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याच्या कामकाजासाठी पक्षकारांसह वकिलांना मुंबईला जावे लागत होते. एका सुनावणीसाठी दोन रात्री आणि एका दिवसाचा वेळ जात होता. याशिवाय प्रवास, जेवणखाणे यासाठी किमान तीन ते पाच हजारांचा खर्च करावा लागत होता. याशिवाय कामानुसार वकिलांची फी वेगळीच. 

वाचा : १९८२ पासून मागणी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा; संपुर्ण घटनाक्रम.. पुढील तारीख मिळाल्यास हेलपाटा वाया जायचा. हजारो पक्षकार वर्षानुवर्ष हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे न्याय विकत घेत असल्याची भावना पक्षकारांच्या मनात होती. कोल्हापुरातील खंडपीठामुळे पक्षकारांची मुंबईची फेरी वाचणार आहे. सोलापूरच्या पक्षकाराला फार तर २०० ते २५० किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात यावे लागेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा कोल्हापूरशी नेहमीच थेट संपर्क असतो. त्या जिल्ह्यातील पक्षकारांना १५० ते २०० किलोमीटरपर्यंत प्रवास करून कोल्हापुरात पोहोचणे सोयीचे आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठीही कोल्हापुरातील खंडपीठ अगदीच सोयीचे आहे. त्यामुळे पक्षकारांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

वाचा : उच्च न्यायालयाचे खंडपीठ-सर्किट बेंचमध्ये फरक काय ?सहा जिल्ह्यांची स्थिती

  • एकूण जिल्हे - ६
  • तालुके - ६२
  • लोकसंख्या - १ कोटी ६४ लाख ७५ हजार
  • प्रलंबित खटले - ४ लाख