शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागासाठी मुंबई-बंंगळूर कॉरिडॉर : चव्हाण

By admin | Updated: July 27, 2014 22:07 IST

मान्यवरांची उपस्थिती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यशवंतरावांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

कऱ्हाड : ‘राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. तरीही माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतीउत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे. नव्याने होऊ घातलेला मुंबई-बंगळूर कॉरिडॉर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला वरदान ठरणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ उभी केली. त्यामुळे महाराष्ट्र उत्पादनात इतर राज्याच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. राज्याचे औद्योगिक धोरणही विकासात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील शेतीउत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, रजनी पवार, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, धैर्यशील कदम, सभापती दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, ‘औद्योगीकरणामुळे राहणीमान वाढून जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी साखळी बंधारे उभारणे गरजेचे आहे. राज्याला पाणीटंचाईमुक्त करण्याचे आव्हान शासनाने स्वीकारले असून, उद्याचा शेतकरी प्रगतिशील बनण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. गुजरातपेक्षा महाराष्ट्र उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यशासनाने आरोग्य सुविधा दिल्या आहेत. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात ७५ टक्के कापूस पिकतो. त्यामुळे नवीन वस्त्रोद्योग धोरण राबवीत आहोत.’मधुकरराव चव्हाण म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याने राज्याला पारदर्शक कारभार करणारे नेतृत्व दिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारून सत्तेचे विकेंद्रीकरण केले. ग्रामीण भागातील जनतेच्या हातात नेतृत्व करण्याची उमेद त्यांनी दिली. सहकार चळवळीतून कारखानदार, व्यापारीवर्ग उभारून त्यातून ग्रामीण भागाचा विकास साधला.’ यावेळी मदनराव मोहिते, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)