शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दुष्काळी भागासाठी मुंबई-बंंगळूर कॉरिडॉर : चव्हाण

By admin | Updated: July 27, 2014 22:07 IST

मान्यवरांची उपस्थिती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यशवंतरावांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

कऱ्हाड : ‘राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. तरीही माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतीउत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे. नव्याने होऊ घातलेला मुंबई-बंगळूर कॉरिडॉर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला वरदान ठरणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ उभी केली. त्यामुळे महाराष्ट्र उत्पादनात इतर राज्याच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. राज्याचे औद्योगिक धोरणही विकासात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील शेतीउत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, रजनी पवार, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, धैर्यशील कदम, सभापती दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, ‘औद्योगीकरणामुळे राहणीमान वाढून जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी साखळी बंधारे उभारणे गरजेचे आहे. राज्याला पाणीटंचाईमुक्त करण्याचे आव्हान शासनाने स्वीकारले असून, उद्याचा शेतकरी प्रगतिशील बनण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. गुजरातपेक्षा महाराष्ट्र उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यशासनाने आरोग्य सुविधा दिल्या आहेत. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात ७५ टक्के कापूस पिकतो. त्यामुळे नवीन वस्त्रोद्योग धोरण राबवीत आहोत.’मधुकरराव चव्हाण म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याने राज्याला पारदर्शक कारभार करणारे नेतृत्व दिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारून सत्तेचे विकेंद्रीकरण केले. ग्रामीण भागातील जनतेच्या हातात नेतृत्व करण्याची उमेद त्यांनी दिली. सहकार चळवळीतून कारखानदार, व्यापारीवर्ग उभारून त्यातून ग्रामीण भागाचा विकास साधला.’ यावेळी मदनराव मोहिते, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)