शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Updated: February 14, 2017 00:52 IST

चौदा ठिकाणी तिरंगी : चार ठिकाणी दुरंगी; हजारे, जालंदर पाटील यांची ‘तलवार म्यान’

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी तब्बल १००३ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२, तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर सरूड, सातवे, आजरा, पोर्ले तर्फ ठाणे, कबनूर या पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत दुरंगी, तर चौदा ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, बाबगोंडा पाटील, शानूर मुजावर, एम. जे. पाटील, तात्या देसाई, ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील यांनी आपली ‘तलवार म्यान’ केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने गेले आठ दिवस माघारीसाठी नेत्यांना अक्षरश: कसरत करावी लागली. विविध आमिषे दाखवून अनेकांचे बंड थंड करण्यात यश आले असले तरी काही ठिकाणी बंड शमवण्यात अपयश आले आहे. सोमवारी सकाळी अकरापासून माघारीस सुरुवात झाली. शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी इच्छुकांची मनधरणी सुरू असल्याचे चित्र प्रत्येक तालुक्यात दिसत होते. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक पन्हाळा तालुक्यातील ६९ जणांनी, तर पंचायत समितीसाठी राधानगरी तालुक्यातील १०७ जणांनी माघार घेतली. आजरा तालुक्यातील तीन जल्हा परिषद मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथील आजरामध्ये ‘ताराराणी’चे अशोक चराटी व राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांच्यात सरळ लढत होत आहे. चौदा मतदारसंघांत तिरंगी तर उर्वरित ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. पिशवी मतदारसंघातून बांबवडेचे सरपंच विष्णू यादव यांनी माघार घेतली. परितेमधून बाबूराव हजारे, कसबा सागावमधून बाबगोंडा पाटील, माणगावमधून एम. जे. पाटील, चंदगडमधून तात्यासाहेब देसाई, तुर्केवाडीमधून सभापती ज्योती पाटील आदी दिग्गजांनी माघार घेतली. भिलवडे भाजप पुरस्कृतयुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक रावसाहेब भिलवडे यांच्या पत्नी बेबीताई भिलवडे यांनी शेवटच्या क्षणी ‘भाजप पुरस्कृत’ म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ताराराणी’चे चिन्ह प्रत्येक ठिकाणी वेगळेसोमवारी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी माघारीची प्रक्रिया झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३.३० वाजता चिन्हे वाटप करण्यात आली. नोंदणीकृत पक्ष असलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ला ‘नारळ’ व स्वाभिमानी पक्षाला ‘शिट्टी’ हे चिन्ह या पूर्वीच मिळाले आहे. कारण या पक्षाचे गतनिवडणुकीत ५ टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य होते. त्या आधारावरच त्यांना एकसमान चिन्हे मिळाली आहेत तर ताराराणी आघाडी पक्षाला एकसमान चिन्हे मिळू शकली नाहीत. कारण या पक्षाचे गत जि. प. व पं. स. निवडणुकीत सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे या आघाडीला काही ठिकाणी कपबशी तर काही ठिकाणी वेगळे चिन्ह मिळाले आहे.येथे तिरंगी लढतपिशवी , करंजफेण, भादोले, शिरोली पुलाची, उदगाव, सिद्धनेर्ली, कापशी सेनापती, पाचगांव, सडोली खालसा, सरवडे, राधानगरी, उत्तूर, कोळिंद्रे.येथे होणार सरळ लढत-आजरा - अशोक चराटी (ताराराणी) व जयवंत शिंपी (राष्ट्रवादी)सरूड - अक्षय पाटील (जनसुराज्य) व हंबीरराव पाटील (शिवसेना)पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील (जनसुराज्य) व प्रियांका पाटील (राष्ट्रवादी)कबनूर -विजया पाटील (भाजप) व कांता बडवे (आवाडे गट) लक्षवेधी झुंज :शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पाटील-पेरिडकर व रणवीरसिंह गायकवाड.पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील व प्रियांका पाटील कोतोली - शंकर पाटील व अजित नरकेशिरोली पुलाची -शौमिका महाडिक व सुचित्रा खवरेरेंदाळ - तानाजीराव घोडेस्वार व राहुल आवाडेसिद्धनेर्ली - अमरीशसिंह घाटगे , वृषाली पाटीलबोरवडे - वीरेंद्र मंडलिक, मनोज फराकटे व भूषण पाटील परिते - राहुल पाटील व हंबीरराव पाटील आजरा - अशोक चराटी व जयवंत शिंपी माघारीसाठी घालमेलमाघारीसाठी केवळ चार तासांचा कालावधी असल्याने सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच निवडणूक कार्यालयाच्या दारात माघारीसाठी गर्दी दिसत होती. मनधरणी करून माघारीसाठी आणलेल्यांचा माघारीचा अर्ज दाखल करेपर्यंत उमेदवारांची घालमेल दिसत होती.