शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Updated: February 14, 2017 00:52 IST

चौदा ठिकाणी तिरंगी : चार ठिकाणी दुरंगी; हजारे, जालंदर पाटील यांची ‘तलवार म्यान’

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी तब्बल १००३ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२, तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर सरूड, सातवे, आजरा, पोर्ले तर्फ ठाणे, कबनूर या पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत दुरंगी, तर चौदा ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, बाबगोंडा पाटील, शानूर मुजावर, एम. जे. पाटील, तात्या देसाई, ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील यांनी आपली ‘तलवार म्यान’ केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने गेले आठ दिवस माघारीसाठी नेत्यांना अक्षरश: कसरत करावी लागली. विविध आमिषे दाखवून अनेकांचे बंड थंड करण्यात यश आले असले तरी काही ठिकाणी बंड शमवण्यात अपयश आले आहे. सोमवारी सकाळी अकरापासून माघारीस सुरुवात झाली. शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी इच्छुकांची मनधरणी सुरू असल्याचे चित्र प्रत्येक तालुक्यात दिसत होते. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक पन्हाळा तालुक्यातील ६९ जणांनी, तर पंचायत समितीसाठी राधानगरी तालुक्यातील १०७ जणांनी माघार घेतली. आजरा तालुक्यातील तीन जल्हा परिषद मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथील आजरामध्ये ‘ताराराणी’चे अशोक चराटी व राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांच्यात सरळ लढत होत आहे. चौदा मतदारसंघांत तिरंगी तर उर्वरित ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. पिशवी मतदारसंघातून बांबवडेचे सरपंच विष्णू यादव यांनी माघार घेतली. परितेमधून बाबूराव हजारे, कसबा सागावमधून बाबगोंडा पाटील, माणगावमधून एम. जे. पाटील, चंदगडमधून तात्यासाहेब देसाई, तुर्केवाडीमधून सभापती ज्योती पाटील आदी दिग्गजांनी माघार घेतली. भिलवडे भाजप पुरस्कृतयुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक रावसाहेब भिलवडे यांच्या पत्नी बेबीताई भिलवडे यांनी शेवटच्या क्षणी ‘भाजप पुरस्कृत’ म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ताराराणी’चे चिन्ह प्रत्येक ठिकाणी वेगळेसोमवारी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी माघारीची प्रक्रिया झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३.३० वाजता चिन्हे वाटप करण्यात आली. नोंदणीकृत पक्ष असलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ला ‘नारळ’ व स्वाभिमानी पक्षाला ‘शिट्टी’ हे चिन्ह या पूर्वीच मिळाले आहे. कारण या पक्षाचे गतनिवडणुकीत ५ टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य होते. त्या आधारावरच त्यांना एकसमान चिन्हे मिळाली आहेत तर ताराराणी आघाडी पक्षाला एकसमान चिन्हे मिळू शकली नाहीत. कारण या पक्षाचे गत जि. प. व पं. स. निवडणुकीत सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे या आघाडीला काही ठिकाणी कपबशी तर काही ठिकाणी वेगळे चिन्ह मिळाले आहे.येथे तिरंगी लढतपिशवी , करंजफेण, भादोले, शिरोली पुलाची, उदगाव, सिद्धनेर्ली, कापशी सेनापती, पाचगांव, सडोली खालसा, सरवडे, राधानगरी, उत्तूर, कोळिंद्रे.येथे होणार सरळ लढत-आजरा - अशोक चराटी (ताराराणी) व जयवंत शिंपी (राष्ट्रवादी)सरूड - अक्षय पाटील (जनसुराज्य) व हंबीरराव पाटील (शिवसेना)पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील (जनसुराज्य) व प्रियांका पाटील (राष्ट्रवादी)कबनूर -विजया पाटील (भाजप) व कांता बडवे (आवाडे गट) लक्षवेधी झुंज :शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पाटील-पेरिडकर व रणवीरसिंह गायकवाड.पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील व प्रियांका पाटील कोतोली - शंकर पाटील व अजित नरकेशिरोली पुलाची -शौमिका महाडिक व सुचित्रा खवरेरेंदाळ - तानाजीराव घोडेस्वार व राहुल आवाडेसिद्धनेर्ली - अमरीशसिंह घाटगे , वृषाली पाटीलबोरवडे - वीरेंद्र मंडलिक, मनोज फराकटे व भूषण पाटील परिते - राहुल पाटील व हंबीरराव पाटील आजरा - अशोक चराटी व जयवंत शिंपी माघारीसाठी घालमेलमाघारीसाठी केवळ चार तासांचा कालावधी असल्याने सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच निवडणूक कार्यालयाच्या दारात माघारीसाठी गर्दी दिसत होती. मनधरणी करून माघारीसाठी आणलेल्यांचा माघारीचा अर्ज दाखल करेपर्यंत उमेदवारांची घालमेल दिसत होती.