शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Updated: February 14, 2017 00:52 IST

चौदा ठिकाणी तिरंगी : चार ठिकाणी दुरंगी; हजारे, जालंदर पाटील यांची ‘तलवार म्यान’

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी तब्बल १००३ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२, तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर सरूड, सातवे, आजरा, पोर्ले तर्फ ठाणे, कबनूर या पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत दुरंगी, तर चौदा ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, बाबगोंडा पाटील, शानूर मुजावर, एम. जे. पाटील, तात्या देसाई, ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील यांनी आपली ‘तलवार म्यान’ केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने गेले आठ दिवस माघारीसाठी नेत्यांना अक्षरश: कसरत करावी लागली. विविध आमिषे दाखवून अनेकांचे बंड थंड करण्यात यश आले असले तरी काही ठिकाणी बंड शमवण्यात अपयश आले आहे. सोमवारी सकाळी अकरापासून माघारीस सुरुवात झाली. शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी इच्छुकांची मनधरणी सुरू असल्याचे चित्र प्रत्येक तालुक्यात दिसत होते. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक पन्हाळा तालुक्यातील ६९ जणांनी, तर पंचायत समितीसाठी राधानगरी तालुक्यातील १०७ जणांनी माघार घेतली. आजरा तालुक्यातील तीन जल्हा परिषद मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथील आजरामध्ये ‘ताराराणी’चे अशोक चराटी व राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांच्यात सरळ लढत होत आहे. चौदा मतदारसंघांत तिरंगी तर उर्वरित ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. पिशवी मतदारसंघातून बांबवडेचे सरपंच विष्णू यादव यांनी माघार घेतली. परितेमधून बाबूराव हजारे, कसबा सागावमधून बाबगोंडा पाटील, माणगावमधून एम. जे. पाटील, चंदगडमधून तात्यासाहेब देसाई, तुर्केवाडीमधून सभापती ज्योती पाटील आदी दिग्गजांनी माघार घेतली. भिलवडे भाजप पुरस्कृतयुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक रावसाहेब भिलवडे यांच्या पत्नी बेबीताई भिलवडे यांनी शेवटच्या क्षणी ‘भाजप पुरस्कृत’ म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ताराराणी’चे चिन्ह प्रत्येक ठिकाणी वेगळेसोमवारी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी माघारीची प्रक्रिया झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३.३० वाजता चिन्हे वाटप करण्यात आली. नोंदणीकृत पक्ष असलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ला ‘नारळ’ व स्वाभिमानी पक्षाला ‘शिट्टी’ हे चिन्ह या पूर्वीच मिळाले आहे. कारण या पक्षाचे गतनिवडणुकीत ५ टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य होते. त्या आधारावरच त्यांना एकसमान चिन्हे मिळाली आहेत तर ताराराणी आघाडी पक्षाला एकसमान चिन्हे मिळू शकली नाहीत. कारण या पक्षाचे गत जि. प. व पं. स. निवडणुकीत सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे या आघाडीला काही ठिकाणी कपबशी तर काही ठिकाणी वेगळे चिन्ह मिळाले आहे.येथे तिरंगी लढतपिशवी , करंजफेण, भादोले, शिरोली पुलाची, उदगाव, सिद्धनेर्ली, कापशी सेनापती, पाचगांव, सडोली खालसा, सरवडे, राधानगरी, उत्तूर, कोळिंद्रे.येथे होणार सरळ लढत-आजरा - अशोक चराटी (ताराराणी) व जयवंत शिंपी (राष्ट्रवादी)सरूड - अक्षय पाटील (जनसुराज्य) व हंबीरराव पाटील (शिवसेना)पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील (जनसुराज्य) व प्रियांका पाटील (राष्ट्रवादी)कबनूर -विजया पाटील (भाजप) व कांता बडवे (आवाडे गट) लक्षवेधी झुंज :शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पाटील-पेरिडकर व रणवीरसिंह गायकवाड.पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील व प्रियांका पाटील कोतोली - शंकर पाटील व अजित नरकेशिरोली पुलाची -शौमिका महाडिक व सुचित्रा खवरेरेंदाळ - तानाजीराव घोडेस्वार व राहुल आवाडेसिद्धनेर्ली - अमरीशसिंह घाटगे , वृषाली पाटीलबोरवडे - वीरेंद्र मंडलिक, मनोज फराकटे व भूषण पाटील परिते - राहुल पाटील व हंबीरराव पाटील आजरा - अशोक चराटी व जयवंत शिंपी माघारीसाठी घालमेलमाघारीसाठी केवळ चार तासांचा कालावधी असल्याने सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच निवडणूक कार्यालयाच्या दारात माघारीसाठी गर्दी दिसत होती. मनधरणी करून माघारीसाठी आणलेल्यांचा माघारीचा अर्ज दाखल करेपर्यंत उमेदवारांची घालमेल दिसत होती.