शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जयसिंगपूरच्या जॅकवेलला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:28 IST

जयसिंगपूर : तब्बल पाच महिन्यांनंतर शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णवेळ सक्षम करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची सुधारणा व बळकटीकरण करण्यासाठी

ठळक मुद्दे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा मानस दाखवून पदाधिकाºयांनी योजनेसाठी निधी मंजूर उशिरा का होईना निधी निघाल्यामुळे शहराच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा निधी मार्गी लागावा तब्बल पाच महिन्यांनंतर या कामाची प्रत्यक्षात निविदा निघाली

संदीप बावचे ।जयसिंगपूर : तब्बल पाच महिन्यांनंतर शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णवेळ सक्षम करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची सुधारणा व बळकटीकरण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी ५१ लाख रुपयांची निविदा अखेर निघाली. नवीन जॅकवेल बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून हा निधी कागदावरच राहिल्याचे चित्र होते. प्रशासकीय मंजुरीअभावी आणि तांत्रिक अडचणीमुळे या कामाची निविदा निघालेली नव्हती. उशिरा का होईना निधी निघाल्यामुळे शहराच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा निधी मार्गी लागावा, ही अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त केली जात आहे.

शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ११ मे २०१७ ला शासनाने निधी मंजूर केला होता. या निधीतून नवीन जॅकवेल बांधणे, त्याचबरोबर कनेक्टिंग पाईप यासह अन्य कामांसाठी हा निधी मंजूर झाला होता. पन्नास वर्षांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा मानस दाखवून पदाधिकाºयांनी योजनेसाठी निधी मंजूर केल्याचे सांगितले होते. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांचा हा निधी कागदावरच राहिल्याचे चित्र होते.

प्रशासकीय मंजुरीअभावी अंतिम प्रस्ताव मंजुरीचे काम रखडल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान,दोन कोटी दहा लाख रुपयांचानिधी वैशिष्टपूर्ण योजनेतून मंजूर झाला असला तरी कामाच्या तांत्रिक माहितीनुसार एक कोटी ५१ लाखांची निविदा या कामासाठी निघाली आहे.‘लोकमत’चा पाठपुरावाजयसिंगपूरमध्ये नवीन जॅकवेलचा निधी कागदावरच या मथळ्याखाली ‘लोकमत’ने जुलै २०१७ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. शासनाकडून निधी मिळतो. मात्र, त्याचा पाठपुरावा होत नाही. असाच प्रकार पालिकेत दिसून येत होता. याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. अखेर जॅकवेलच्या कामाची निविदा निघाली आहे. येणाºया काळात ही योजना पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’चा पाठपुरावा निश्चितच राहणार आहे.आघाड्यांची जबाबदारीनवीन जॅकवेलच्या निधीवरून शाहू व ताराराणी आघाडीत श्रेयवाद रंगला होता. दोन्ही आघाड्यांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप रंगले होते. तब्बल पाच महिन्यांनंतर या कामाची प्रत्यक्षात निविदा निघाली आहे. त्यामुळे येणाºया काळात दोन्ही आघाड्यांकडून पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यासाठी व या निधीतून हे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा व्हावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.शहरवासीयांच्या अपेक्षानगरपालिकेत नवीन सभागृह अस्तित्वात आल्यापासून सुमारे ५७ कोटी रुपयांची भुयारी गटर योजना, त्यानंतर आता पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे वर्षपूर्तीअगोदरच विकासकामांसाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक