शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पाण्याच्या टाकीत गुडघाभर गाळ : १५ वर्षांपासून स्वच्छता नसल्याने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:02 IST

ज्योती पाटील । पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देआर. के. नगरातील स्थिती

ज्योती पाटील ।पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीची स्वच्छता १५ वर्षांपासून झाली नसल्याने टाकीची सुरक्षितता व लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेकवेळा संबंधित प्रशासनाला लेखी तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांतून केली जात आहे.

गेल्या ४० वर्षांपूर्वी आर. के. नगर सोसायटी नं. ६ येथील महादेवनगर मंदिरानजीक पाण्याची टाकी बांधून कोल्हापूर महापालिकेकडून आर. के. नगरसह जरगनगर परिसराला पाणीपुरवठा केला जातो; परंतु या टाकीच्या स्वच्छतेकडे महापालिकेने पुरते दुर्लक्ष केले असल्याने या टाकीत गुडघाभर गाळ साचून राहिला आहे. तसेच टाकीला टोपण नसल्याने टाकीत बाटल्या व अन्य साहित्य पाहावयास मिळते. टाकीच्या सभोवती भेगा पडल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, तसेच टाकीत साचलेल्या गाळामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे व कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेसाठी विनंती केली असूनसुद्धा त्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे टाकीचे बांधकाम ठिसूळ होऊन टाकी असुरक्षित बनली आहे.

या टाकीशेजारी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशावेळी टाकीचे ढपलेदेखील पडतात. त्यामुळे मुलांचे खेळणेदेखील धोकादायक बनले आहे तसेच टाकीच्या ठिकठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडू लागल्या आहेत तरीदेखील पर्यायी व्यवस्था नसल्याने याच टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता करावी व डागडुजी करावी, अशी मागणी आर. के. नगर परिसर व भागातील नागरिकांतून केली जात आहे. 

 

अनेकवेळा महापालिकेक डे तक्रारी करूनदेखील अद्याप आर. के. नगरमधील पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी टाकीला भेगा पडल्याने त्याची डागडुजी व स्वच्छता लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहेत.- संग्राम पोवाळकर, उपसरपंच पाचगाव.आर. के. नगर परिसराला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ज्या टाकीत पाणी साठवले जाते. ती टाकी अनेक वर्षे स्वच्छ न केल्याने दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या टाकीची स्वच्छता लवकरात लवकर करावी.- प्रवीण कुंभार,ग्रा. पं. सदस्य, पाचगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण