शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत गुडघाभर गाळ : १५ वर्षांपासून स्वच्छता नसल्याने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:02 IST

ज्योती पाटील । पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देआर. के. नगरातील स्थिती

ज्योती पाटील ।पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीची स्वच्छता १५ वर्षांपासून झाली नसल्याने टाकीची सुरक्षितता व लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेकवेळा संबंधित प्रशासनाला लेखी तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांतून केली जात आहे.

गेल्या ४० वर्षांपूर्वी आर. के. नगर सोसायटी नं. ६ येथील महादेवनगर मंदिरानजीक पाण्याची टाकी बांधून कोल्हापूर महापालिकेकडून आर. के. नगरसह जरगनगर परिसराला पाणीपुरवठा केला जातो; परंतु या टाकीच्या स्वच्छतेकडे महापालिकेने पुरते दुर्लक्ष केले असल्याने या टाकीत गुडघाभर गाळ साचून राहिला आहे. तसेच टाकीला टोपण नसल्याने टाकीत बाटल्या व अन्य साहित्य पाहावयास मिळते. टाकीच्या सभोवती भेगा पडल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, तसेच टाकीत साचलेल्या गाळामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे व कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेसाठी विनंती केली असूनसुद्धा त्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे टाकीचे बांधकाम ठिसूळ होऊन टाकी असुरक्षित बनली आहे.

या टाकीशेजारी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशावेळी टाकीचे ढपलेदेखील पडतात. त्यामुळे मुलांचे खेळणेदेखील धोकादायक बनले आहे तसेच टाकीच्या ठिकठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडू लागल्या आहेत तरीदेखील पर्यायी व्यवस्था नसल्याने याच टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता करावी व डागडुजी करावी, अशी मागणी आर. के. नगर परिसर व भागातील नागरिकांतून केली जात आहे. 

 

अनेकवेळा महापालिकेक डे तक्रारी करूनदेखील अद्याप आर. के. नगरमधील पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी टाकीला भेगा पडल्याने त्याची डागडुजी व स्वच्छता लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहेत.- संग्राम पोवाळकर, उपसरपंच पाचगाव.आर. के. नगर परिसराला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ज्या टाकीत पाणी साठवले जाते. ती टाकी अनेक वर्षे स्वच्छ न केल्याने दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या टाकीची स्वच्छता लवकरात लवकर करावी.- प्रवीण कुंभार,ग्रा. पं. सदस्य, पाचगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण