शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पाण्याच्या टाकीत गुडघाभर गाळ : १५ वर्षांपासून स्वच्छता नसल्याने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:02 IST

ज्योती पाटील । पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देआर. के. नगरातील स्थिती

ज्योती पाटील ।पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीची स्वच्छता १५ वर्षांपासून झाली नसल्याने टाकीची सुरक्षितता व लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेकवेळा संबंधित प्रशासनाला लेखी तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांतून केली जात आहे.

गेल्या ४० वर्षांपूर्वी आर. के. नगर सोसायटी नं. ६ येथील महादेवनगर मंदिरानजीक पाण्याची टाकी बांधून कोल्हापूर महापालिकेकडून आर. के. नगरसह जरगनगर परिसराला पाणीपुरवठा केला जातो; परंतु या टाकीच्या स्वच्छतेकडे महापालिकेने पुरते दुर्लक्ष केले असल्याने या टाकीत गुडघाभर गाळ साचून राहिला आहे. तसेच टाकीला टोपण नसल्याने टाकीत बाटल्या व अन्य साहित्य पाहावयास मिळते. टाकीच्या सभोवती भेगा पडल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, तसेच टाकीत साचलेल्या गाळामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे व कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेसाठी विनंती केली असूनसुद्धा त्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे टाकीचे बांधकाम ठिसूळ होऊन टाकी असुरक्षित बनली आहे.

या टाकीशेजारी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशावेळी टाकीचे ढपलेदेखील पडतात. त्यामुळे मुलांचे खेळणेदेखील धोकादायक बनले आहे तसेच टाकीच्या ठिकठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडू लागल्या आहेत तरीदेखील पर्यायी व्यवस्था नसल्याने याच टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता करावी व डागडुजी करावी, अशी मागणी आर. के. नगर परिसर व भागातील नागरिकांतून केली जात आहे. 

 

अनेकवेळा महापालिकेक डे तक्रारी करूनदेखील अद्याप आर. के. नगरमधील पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी टाकीला भेगा पडल्याने त्याची डागडुजी व स्वच्छता लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहेत.- संग्राम पोवाळकर, उपसरपंच पाचगाव.आर. के. नगर परिसराला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ज्या टाकीत पाणी साठवले जाते. ती टाकी अनेक वर्षे स्वच्छ न केल्याने दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या टाकीची स्वच्छता लवकरात लवकर करावी.- प्रवीण कुंभार,ग्रा. पं. सदस्य, पाचगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण