शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:01 IST

Kolhapur : विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी हिसेंच्या घटनेचा निषेध केला.

Vishalgad Encroachment : कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे  हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन  केले होते. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यावरुनच खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपती हे विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी हे हे प्रशासनानचे अपयश असल्याचे म्हटलं. 

रविवारी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले होते. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. काही वेळाने संभाजीराजे छत्रपती गडाखाली आल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हिंसक जमावाने घरं पेटवून देत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या सगळ्या प्रकारावरुन खासदार शाहू छत्रपती यांना नाराजी व्यक्त केली.  हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असल्याचा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यानंतर प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच असल्याचे शाहू छत्रपती यांनी म्हटलं.

"शाहू महाराजांच्या नगरीत अशा प्रकारची घटना दुसऱ्यांदा होणे म्हणजे यात काही षडयंत्र नक्की आहे. त्याला आपल्याला यापुढे तोंड द्यावे लागणार आहे. हे प्रशासनानचे अपयश आहे. शासनाने आधीच आदेश दिला असता तर ही घटना घडली नसती. सरकारने तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे. प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच आहे. अतिक्रम हटवण्याच्या नावाखाली जी हिंसा झाली त्याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या संवाद व्हायला उशीर झाला," असे खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

"विशाळगडवर झालेला हिंसाचार म्हणजे प्रशासनाचे अपयश आहे , असं सांगत संभाजीराजेंनीही यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही, हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होतं का?," असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती