शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:01 IST

Kolhapur : विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी हिसेंच्या घटनेचा निषेध केला.

Vishalgad Encroachment : कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे  हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन  केले होते. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यावरुनच खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपती हे विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी हे हे प्रशासनानचे अपयश असल्याचे म्हटलं. 

रविवारी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले होते. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. काही वेळाने संभाजीराजे छत्रपती गडाखाली आल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हिंसक जमावाने घरं पेटवून देत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या सगळ्या प्रकारावरुन खासदार शाहू छत्रपती यांना नाराजी व्यक्त केली.  हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असल्याचा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यानंतर प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच असल्याचे शाहू छत्रपती यांनी म्हटलं.

"शाहू महाराजांच्या नगरीत अशा प्रकारची घटना दुसऱ्यांदा होणे म्हणजे यात काही षडयंत्र नक्की आहे. त्याला आपल्याला यापुढे तोंड द्यावे लागणार आहे. हे प्रशासनानचे अपयश आहे. शासनाने आधीच आदेश दिला असता तर ही घटना घडली नसती. सरकारने तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे. प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच आहे. अतिक्रम हटवण्याच्या नावाखाली जी हिंसा झाली त्याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या संवाद व्हायला उशीर झाला," असे खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

"विशाळगडवर झालेला हिंसाचार म्हणजे प्रशासनाचे अपयश आहे , असं सांगत संभाजीराजेंनीही यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही, हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होतं का?," असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती