शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:01 IST

Kolhapur : विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी हिसेंच्या घटनेचा निषेध केला.

Vishalgad Encroachment : कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे  हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन  केले होते. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यावरुनच खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपती हे विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी हे हे प्रशासनानचे अपयश असल्याचे म्हटलं. 

रविवारी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले होते. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. काही वेळाने संभाजीराजे छत्रपती गडाखाली आल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हिंसक जमावाने घरं पेटवून देत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या सगळ्या प्रकारावरुन खासदार शाहू छत्रपती यांना नाराजी व्यक्त केली.  हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असल्याचा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यानंतर प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच असल्याचे शाहू छत्रपती यांनी म्हटलं.

"शाहू महाराजांच्या नगरीत अशा प्रकारची घटना दुसऱ्यांदा होणे म्हणजे यात काही षडयंत्र नक्की आहे. त्याला आपल्याला यापुढे तोंड द्यावे लागणार आहे. हे प्रशासनानचे अपयश आहे. शासनाने आधीच आदेश दिला असता तर ही घटना घडली नसती. सरकारने तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे. प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच आहे. अतिक्रम हटवण्याच्या नावाखाली जी हिंसा झाली त्याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या संवाद व्हायला उशीर झाला," असे खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

"विशाळगडवर झालेला हिंसाचार म्हणजे प्रशासनाचे अपयश आहे , असं सांगत संभाजीराजेंनीही यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही, हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होतं का?," असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती