शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार?

By राजाराम लोंढे | Updated: July 18, 2022 18:26 IST

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही

राजाराम लोंढेकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कमकुवत झालेली शिवसेना, त्यामुळे ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील बदललेली समीकरणे, देश पातळीवर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली ‘क्रेझ’ व जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेऊन खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी बंडाचे निशाण हातात घेतले आहे. हे जरी खरे असले तरी राजकीय बंड कोल्हापूरच्या जनतेला फारसे पचनी पडत नसल्याचा इतिहासही आहे. त्यामुळे हे बंड यशस्वी होईल की नाही, हा येणारा काळच सांगेल.तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही. गेल्या अडीच वर्षांत राज्यात महाविकास आघाडीबाबत कुरबुरी असल्या तरी कोल्हापुरात मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकदिलाने कारभार करत असल्याचे दिसले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कोल्हापुरात फारसे हादरे बसायचे नाहीत, असेच वाटत होते.मात्र आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर व राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. या कालावधीत संजय मंडलिक, धैर्यशील माने, चंद्रदीप नरके यांनी सावधच भूमिका घेतली. आता मंडलिक व माने यांनी उध्दव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ केल्याने शिवसेनेला जोरात धक्का बसला असला तरी हे बंड कोल्हापूरकरांच्या पचनी किती पडणार, यावरच फलित अवलंबून आहे.

सरुडकर, उल्हास पाटील का थांबले...?शिवसेनेच्या सहा माजी आमदारांपैकी राजेश क्षीरसागर हे उघड शिंदे गटात गेले. चंद्रदीप नरके हेही त्यांच्याच वाटेवर आहेत. डॉ. सुजित मिणचेकर हे शिवसेनेच्या बैठकीला येतात. संजय घाटगे यांचे अद्याप तळ्यात-मळ्यात आहे. सत्यजित पाटील-सरुडकर यांचे विरोधक आमदार विनय कोरे हे भाजपसोबत, तर उल्हास पाटील यांचे विरोधक राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटासोबत असल्याने त्यांना मूळ शिवसेनेसोबत राहण्याशिवाय पर्याय नाही.

हातकणंगलेचे गणित दिसते तितके सोपे नाहीपेठ वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे व विनय कोरे यांनी मोट बांधली आहे. जिल्हा बँकेत तर ही मोट अधिक घट्ट झाली. या तीन नेत्यांच्या जोडीला राजेंद्र पाटील-यड्रावकर असले तर हातकणंगले लोकसभेचे गणित सोडवणे अधिक सोपे जाईल, असे धैर्यशील माने यांना वाटत असले तरी हे गणित सोडवणे तितकेसे सोपेही नाही.

‘कोल्हापुरातून’ संजयबाबा की ‘के. पी.’संजय मंडलिक यांनी जय महाराष्ट्र केल्याने ‘कोल्हापूर’मधून कोण, असा प्रश्न आहे. महाविकास आघाडी अशीच एकसंध राहिली तर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे नाव पुढे येऊ शकते. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे सख्य चांगले आहे. त्यात घाटगे यांचे इतर पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याशिवाय माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. ‘बिद्री’ साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. या कारखान्याचा प्रभाव कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांवर पडतो.

धैर्यशील यांच्या विरोधात शेट्टीच

हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी बंड केल्याने महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी सध्यातरी चेहरा दिसत नाही. राजू शेट्टी यांनी आघाडीशी फारकत घेतली आहे. मात्र, ऐनवेळी माने यांना रोखण्यासाठी शेट्टींना पाठिंबा देऊ शकतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे