शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पुजाऱ्यांविरोधात भक्तांचे आंदोलन

By admin | Updated: June 19, 2017 00:51 IST

अंबाबाईला साकडे : गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पाचजणांना रोखले; जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईस घागरा-चोली नेसविण्याचा प्रकार व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान यावरून मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याच्या सर्वपक्षीय आंदोलनास रविवारी प्रारंभ झाला. ‘आई अंबाबाई..तुझा व राजर्षी शाहूराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे घालत शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी आंदोलन केले. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्वाभिमान’च्या सचिन तोडकरसह पाचजणांना पोलिसांनी रोखले. आंदोलकांनी मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंबाबाईला गेल्या शुक्रवारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेले घागरा-चोली नेसविले. या वादाचे पर्यवसान शनिवारी जनप्रक्षोभात झाले. त्यात श्रीपूजकांनी मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड आणि ‘तथाकथित’ भाषेत राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकुमाचाही अवमान केला. याविरोधात आंदोलन म्हणून कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनांमधील भक्त रविवारी सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर एकत्रित आले. यावेळी महिला अग्रभागी होत्या. पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्व भक्तांनी एकत्रितरीत्या मंदिरात जाऊन ‘आई, तुझा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना बाहेर काढ व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी दे,’ असे म्हणत देवीपुढे साकडे घातले. यावेळी भक्तांकडून ‘ उदं गं आई उदं,’ ‘अंबामाता की जय,’ ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं,’ ‘राजर्षी शाहू महाराज की जय,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या दरम्यान परगावाहून आलेल्या भक्तांना पितळी उंबऱ्याच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांना आंदोलन कसे आणि कशासाठी सुरू आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे ते काहीकाळ देवीचे दर्शन मिळत नसल्याने हवालदिल झाले . मात्र, आंदोलनानंतर दर्शन सुरळीत झाल्याने या भाविकांना हायसे वाटले. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ‘साकडे’ आंदोलनानंतर अंबाबाई मंदिर परिसरातील सिद्धिविनायक मंदिराच्या ओवरीवर झालेल्या छोट्याशा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बुधवारी (दि. २१) रोजी दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय संघटना, भक्त यांच्यातर्फे कारवाईबाबतचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली. --------- साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला तसा कायदा संमत करावा लागला. श्रीपूजकांच्या पत्नी, आई, मुलींना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे सर्व जातींच्या महिलांना मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी लवकरच जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे. आई अंबाबाईच्या पूजेचा विधी करण्याचा अधिकारही महिलांना मिळावा. - सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार