शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुजाऱ्यांविरोधात भक्तांचे आंदोलन

By admin | Updated: June 19, 2017 00:51 IST

अंबाबाईला साकडे : गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पाचजणांना रोखले; जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईस घागरा-चोली नेसविण्याचा प्रकार व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान यावरून मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याच्या सर्वपक्षीय आंदोलनास रविवारी प्रारंभ झाला. ‘आई अंबाबाई..तुझा व राजर्षी शाहूराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे घालत शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी आंदोलन केले. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्वाभिमान’च्या सचिन तोडकरसह पाचजणांना पोलिसांनी रोखले. आंदोलकांनी मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंबाबाईला गेल्या शुक्रवारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेले घागरा-चोली नेसविले. या वादाचे पर्यवसान शनिवारी जनप्रक्षोभात झाले. त्यात श्रीपूजकांनी मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड आणि ‘तथाकथित’ भाषेत राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकुमाचाही अवमान केला. याविरोधात आंदोलन म्हणून कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनांमधील भक्त रविवारी सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर एकत्रित आले. यावेळी महिला अग्रभागी होत्या. पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्व भक्तांनी एकत्रितरीत्या मंदिरात जाऊन ‘आई, तुझा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना बाहेर काढ व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी दे,’ असे म्हणत देवीपुढे साकडे घातले. यावेळी भक्तांकडून ‘ उदं गं आई उदं,’ ‘अंबामाता की जय,’ ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं,’ ‘राजर्षी शाहू महाराज की जय,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या दरम्यान परगावाहून आलेल्या भक्तांना पितळी उंबऱ्याच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांना आंदोलन कसे आणि कशासाठी सुरू आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे ते काहीकाळ देवीचे दर्शन मिळत नसल्याने हवालदिल झाले . मात्र, आंदोलनानंतर दर्शन सुरळीत झाल्याने या भाविकांना हायसे वाटले. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ‘साकडे’ आंदोलनानंतर अंबाबाई मंदिर परिसरातील सिद्धिविनायक मंदिराच्या ओवरीवर झालेल्या छोट्याशा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बुधवारी (दि. २१) रोजी दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय संघटना, भक्त यांच्यातर्फे कारवाईबाबतचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली. --------- साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला तसा कायदा संमत करावा लागला. श्रीपूजकांच्या पत्नी, आई, मुलींना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे सर्व जातींच्या महिलांना मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी लवकरच जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे. आई अंबाबाईच्या पूजेचा विधी करण्याचा अधिकारही महिलांना मिळावा. - सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार