शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यातील ३८ शाळा बंद करण्याच्या हालचाली

By admin | Updated: March 12, 2016 00:34 IST

फेरविचार करण्याची मागणी : २० पटाच्या खालील पाचवीपर्यंतच्या शाळा

नितीन भगवान -- पन्हाळा --आरटीई कायद्यानुसार पन्हाळा तालुक्यातील २० पटाच्या खालील पाचवीपर्यंतच्या एकूण ३८ शाळा बंद करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू आहेत. वाडीवस्तीवरील या शाळांमध्ये ५०५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. तालुक्यात एकूण १९४ प्राथमिक शाळा आहेत. पन्हाळा तालुका हा डोंगराळ, दुर्गम असल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या इतर तालुक्यांपेक्षा मागास आहे. दळणवळणाच्या सोईअभावी वाडीवस्तीवरील मुला-मुलींना इतर ठिकाणी जाऊन शिक्षण घेणे अवघड आहे. अशा परिस्थितीत पोर्ले, यवलूज, कोडोली, कळे, आदी मोठ्या गावांसह ३८ प्राथमिक शाळा आवश्यक पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षण विभागाने त्याची तयारी केली आहे. तालुक्यात एकूण १९४ प्राथमिक शाळा आहेत. त्यातील राक्षी येथील दोन शाळा, वाघवे येथील एक शाळा, पडळमधील एक, कोलोलीमधील एक, चव्हाणवाडी येथील तीन शाळा, दळवेवाडी येथील सहा शाळा, कळे, वाघुर्डे प्रत्येकी एक शाळा, पोहाळे, बोरगाव, सातवे, वेतवडे, काळजवडे येथील प्रत्येकी तीन शाळा, पैजारवाडी येथील चार शाळा, पन्हाळ्यातील पाच शाळा व कोडोलीमधील एक शाळा, अशा ३८ शाळा नव्या आर.टी.ई. नियमानुसार २० पटाखालील असल्याने पहिली ते पाचवीपर्यंतची शिक्षण व्यवस्था बंद होणार आहे. पर्यायाने या शाळांत शिकणारी ५०६ मुले वाडीवस्तीवरून मोठ्या शाळेत जातील अथवा शिक्षणापासून कायमची बंद होतील. याचबरोबर या सर्वच गावांतील नव्या पिढीला शिक्षणासाठी आपले गाव सोडावे लागणार आहे. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता २० पटाखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनेही या शाळा बंद होऊ नयेत म्हणून विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असून, ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा निर्णय पन्हाळा सरपंच संघटनेच्या अध्यक्षांनी घेतला आहे.मुलांचे भवितव्य काय : कोट्यवधी रुपये खर्च बंद होणाऱ्या या शाळांमधील खोल्या, किचन शेड व स्वच्छतागृहे यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. याला संलग्न माध्यान्ह भोजन, स्वयंपाकी, मदतनीस व दुकानदार यांना दुसरा रोजगार शोधावा लागणार आहे. २० पटाखालील शाळा बंद करण्याचा फेरविचार झाला नाही तर किती शिक्षक अतिरिक्त होतात, यापेक्षा या शाळांतील मुलांच्या शिक्षणाचे कोणते भवितव्य ठरणार व कितीजण अजून शिक्षणापासून वंचित राहणार, याचा विचार होणे गरजेचे आहे.