शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वत:लाही संपविले, सुदैवाने मुलगी बचावली

By विश्वास पाटील | Updated: February 24, 2023 19:17 IST

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?

कागल/गांधीनगर : हालसवडे (ता. करवीर) येथील साउंड सिस्टिम व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह दोन मुलांना कसबा सांगाव (ता. कागल) येथील दूधगंगा डाव्या कालव्यात ढकलून स्वतः भोज (कर्नाटक) येथे झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास घडली.यामध्ये पत्नी व नऊवर्षीय मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला, तर तेरा वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप अण्णासाहेब पाटील (३८), राजश्री संदीप पाटील (३२) आणि सन्मित संदीप पाटील (९) अशी मृत्यू झालेल्यांची, तर श्रेया संदीप पाटील (१३) असे जीव वाचलेल्या मुलीचे नाव आहे. रात्री उशिरा कागल पोलिसांत खून व आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कौटुंबिक कलहातून हे कृत्य केल्याची चर्चा असून, पोलिसांनी अन्य शक्यताही गृहीत धरून तपास सुरू केला आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संदीप पाटील शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी दुचाकीवरून पत्नी, मुलगा आणि मुलगीसह घराबाहेर पडले होते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व कसबा सांगावच्या हद्दीतून जाणाऱ्या कालव्याजवळ आल्यानंतर हा प्रकार घडला. दुपारी २ वाजता मुलगी श्रेया कॅनॉलच्या कठड्यावर जखमी अवस्थेत मदतीची याचना करीत रडत असल्याचे काहींनी पाहिले. कसबा सांगावमधील रियाज कलावंत, मारुती चिखलवाळे, मेहबूब नदाफ, दीपक माने यांनी तिला कॅनॉलमधून बाहेर काढले. जखमी अवस्थेतील भांबावलेल्या या मुलीने वेगवेगळी माहिती दिल्याने खून की आत्महत्या, याबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती. तिने सांगितलेल्या माहितीवरून कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध सुरू केला. सन्मित आणि त्याची आई राजश्री यांचे मृतदेह सापडले. संदीप याचाही मृतदेह याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण रात्री ८ वाजेपर्यंत सापडत नव्हता. घटनास्थळी कोणते वाहनही नव्हते. यामुळे पोलिसांनी इतर ठिकाणीही शोध सुरू केला होता. यादरम्यान कर्नाटकातील भोजजवळ संदीप याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समजली. कालव्याला घासून हा रस्ता गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक पाणीसाठाही आहे. रस्त्यापासून वीस फूट खोल आहे. कोणताही संरक्षक कठडा नाही. याचाच फायदा घेत संशयित आरोपीने पत्नी व मुलांना कालव्यात ढकलले असावे, असे पोलिसांनी प्राथमिक अनुमान काढले आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे करीत आहेत.

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?संदीप हा डीजे व्यवसाय करत शेती सांभाळत होता. मनमिळाऊ स्वभाव असल्याने गावामध्ये त्याचा मित्रपरिवार मोठा प्रमाणात होता. त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. मग त्याने पत्नी, मुलगा आणि मुलगीसह आत्महत्या का केली? याचे कोडे त्याच्या मित्रपरिवाराला उलगडेनासे झाले आहे.वडिलांकडून घेतले दोन लाखसंदीप डीजे व्यवसायात चांगली आर्थिक उलाढाल करत होता. पण गुरुवारी संदीपने वडिलांकडून नवीन व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेतले होते.

भोजमध्ये केली आत्महत्यादुधगंगा कॅनॉलमध्ये संदीपची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह सापडले. मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी सीपीआरला रवाना करण्यात आले. सुदैवाने मुलगी बचावली, पण पत्नी राजश्री आणि मुलगा सन्मित यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. संदीपनेही भोज (ता. चिक्कोडी) येथील अरुण सदाशिव पोवार यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे