शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Kolhapur News: पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वत:लाही संपविले, सुदैवाने मुलगी बचावली

By विश्वास पाटील | Updated: February 24, 2023 19:17 IST

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?

कागल/गांधीनगर : हालसवडे (ता. करवीर) येथील साउंड सिस्टिम व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह दोन मुलांना कसबा सांगाव (ता. कागल) येथील दूधगंगा डाव्या कालव्यात ढकलून स्वतः भोज (कर्नाटक) येथे झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास घडली.यामध्ये पत्नी व नऊवर्षीय मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला, तर तेरा वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप अण्णासाहेब पाटील (३८), राजश्री संदीप पाटील (३२) आणि सन्मित संदीप पाटील (९) अशी मृत्यू झालेल्यांची, तर श्रेया संदीप पाटील (१३) असे जीव वाचलेल्या मुलीचे नाव आहे. रात्री उशिरा कागल पोलिसांत खून व आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कौटुंबिक कलहातून हे कृत्य केल्याची चर्चा असून, पोलिसांनी अन्य शक्यताही गृहीत धरून तपास सुरू केला आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संदीप पाटील शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी दुचाकीवरून पत्नी, मुलगा आणि मुलगीसह घराबाहेर पडले होते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व कसबा सांगावच्या हद्दीतून जाणाऱ्या कालव्याजवळ आल्यानंतर हा प्रकार घडला. दुपारी २ वाजता मुलगी श्रेया कॅनॉलच्या कठड्यावर जखमी अवस्थेत मदतीची याचना करीत रडत असल्याचे काहींनी पाहिले. कसबा सांगावमधील रियाज कलावंत, मारुती चिखलवाळे, मेहबूब नदाफ, दीपक माने यांनी तिला कॅनॉलमधून बाहेर काढले. जखमी अवस्थेतील भांबावलेल्या या मुलीने वेगवेगळी माहिती दिल्याने खून की आत्महत्या, याबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती. तिने सांगितलेल्या माहितीवरून कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध सुरू केला. सन्मित आणि त्याची आई राजश्री यांचे मृतदेह सापडले. संदीप याचाही मृतदेह याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण रात्री ८ वाजेपर्यंत सापडत नव्हता. घटनास्थळी कोणते वाहनही नव्हते. यामुळे पोलिसांनी इतर ठिकाणीही शोध सुरू केला होता. यादरम्यान कर्नाटकातील भोजजवळ संदीप याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समजली. कालव्याला घासून हा रस्ता गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक पाणीसाठाही आहे. रस्त्यापासून वीस फूट खोल आहे. कोणताही संरक्षक कठडा नाही. याचाच फायदा घेत संशयित आरोपीने पत्नी व मुलांना कालव्यात ढकलले असावे, असे पोलिसांनी प्राथमिक अनुमान काढले आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे करीत आहेत.

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?संदीप हा डीजे व्यवसाय करत शेती सांभाळत होता. मनमिळाऊ स्वभाव असल्याने गावामध्ये त्याचा मित्रपरिवार मोठा प्रमाणात होता. त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. मग त्याने पत्नी, मुलगा आणि मुलगीसह आत्महत्या का केली? याचे कोडे त्याच्या मित्रपरिवाराला उलगडेनासे झाले आहे.वडिलांकडून घेतले दोन लाखसंदीप डीजे व्यवसायात चांगली आर्थिक उलाढाल करत होता. पण गुरुवारी संदीपने वडिलांकडून नवीन व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेतले होते.

भोजमध्ये केली आत्महत्यादुधगंगा कॅनॉलमध्ये संदीपची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह सापडले. मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी सीपीआरला रवाना करण्यात आले. सुदैवाने मुलगी बचावली, पण पत्नी राजश्री आणि मुलगा सन्मित यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. संदीपनेही भोज (ता. चिक्कोडी) येथील अरुण सदाशिव पोवार यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे