शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश तालुक्यांत दिव्यांग साहित्य जुळणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:37 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.

ठळक मुद्देबहुतांश तालुक्यांत दिव्यांग साहित्य जुळणीला वेगनव्या साहित्याचे ट्रक दाखल, जिल्हा परिषदेत युद्धपातळीवर तयारी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यादिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले आणि रतनलाल कटारिया यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजामाता पदवीदान सभागृहामध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेचच अ‍ॅल्मिको कंपनीचे सात तंत्रज्ञ कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून विविध पंचायत समित्यांमध्ये ठेवलेल्या साहित्याची जुळणी करण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ, हातकणंगले, चंदगड, आजरा येथील साहित्य जुळविण्यात आले आहे; तर कागल येथे हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपयांचे साहित्य आले होते आणि सहा कोटी रुपयांचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे.कोल्हापूरशेजारील करवीर, कागल, हातकणंगले येथून अधिकाधिक दिव्यांगांना या कार्यक्रमासाठी आणण्यात येणार असून, उर्वरित तालुक्यांमधूनही दिव्यांग येणार आहेत. त्यांच्यासाठी एस. टी. बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रत्यक्ष व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते २५ दिव्यांगांना साहित्य वितरित केले जाणार आहे. याच परिसरात १२ स्टॉलवरून दिव्यांगांना साहित्य दिले जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात कार्यक्रमया मुख्य कार्यक्रमामध्ये सर्वांनाच साहित्य देता येणार नसल्याने २६ फेब्रुवारी ते पुढे १० दिवस प्रत्येक तालुक्यात हे साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यासाठीही नंतर लगेचच पंचायत समित्यांकडून नियोजन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमाआधी दिव्यांग मुलामुलींचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.विविध समित्यांची स्थापनाहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने १२ समित्यांची स्थापना केली आहे. कार्यक्रम संनियंत्रण समितीपासून भोजन, वाहतूक, बैठक, आरोग्य अशा या समित्या असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाकडे यातील जबाबदारी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याकडे प्रमुख संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDivyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर