शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

बहुतांश तालुक्यांत दिव्यांग साहित्य जुळणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:37 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.

ठळक मुद्देबहुतांश तालुक्यांत दिव्यांग साहित्य जुळणीला वेगनव्या साहित्याचे ट्रक दाखल, जिल्हा परिषदेत युद्धपातळीवर तयारी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यादिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले आणि रतनलाल कटारिया यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजामाता पदवीदान सभागृहामध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेचच अ‍ॅल्मिको कंपनीचे सात तंत्रज्ञ कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून विविध पंचायत समित्यांमध्ये ठेवलेल्या साहित्याची जुळणी करण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ, हातकणंगले, चंदगड, आजरा येथील साहित्य जुळविण्यात आले आहे; तर कागल येथे हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपयांचे साहित्य आले होते आणि सहा कोटी रुपयांचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे.कोल्हापूरशेजारील करवीर, कागल, हातकणंगले येथून अधिकाधिक दिव्यांगांना या कार्यक्रमासाठी आणण्यात येणार असून, उर्वरित तालुक्यांमधूनही दिव्यांग येणार आहेत. त्यांच्यासाठी एस. टी. बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रत्यक्ष व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते २५ दिव्यांगांना साहित्य वितरित केले जाणार आहे. याच परिसरात १२ स्टॉलवरून दिव्यांगांना साहित्य दिले जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात कार्यक्रमया मुख्य कार्यक्रमामध्ये सर्वांनाच साहित्य देता येणार नसल्याने २६ फेब्रुवारी ते पुढे १० दिवस प्रत्येक तालुक्यात हे साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यासाठीही नंतर लगेचच पंचायत समित्यांकडून नियोजन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमाआधी दिव्यांग मुलामुलींचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.विविध समित्यांची स्थापनाहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने १२ समित्यांची स्थापना केली आहे. कार्यक्रम संनियंत्रण समितीपासून भोजन, वाहतूक, बैठक, आरोग्य अशा या समित्या असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाकडे यातील जबाबदारी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याकडे प्रमुख संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDivyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर