शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

इचलकरंजीत बहुतांशी यंत्रमाग बंद : कापड उद्योगास अच्छे दिनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:15 IST

इचलकरंजी : दीपावली सणानंतर दोन आठवडे उलटले तरी शहर व परिसरातील ४० टक्के यंत्रमागांची एकच पाळी सुरू झाली आहे

ठळक मुद्देचाळीस टक्के यंत्रमागांवर वीस टक्के कापड उत्पादन, दीपावलीला दोन आठवडे उलटूनही सामसूमचकापडाला गिºहाईक नसल्यामुळे यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये आणि कापड उत्पादन करणाºया कारखानदारांच्या नफ्यामध्ये वाढ उर्वरित यंत्रमाग कारखाने आणखीन आठवडाभर तरी चालू होतील की नाही, याची शंका

इचलकरंजी : दीपावली सणानंतर दोन आठवडे उलटले तरी शहर व परिसरातील ४० टक्के यंत्रमागांची एकच पाळी सुरू झाली आहे. अद्यापही कापडाला मागणी नसल्यामुळे आणखीन आठवडाभर तरी यंत्रमाग कारखाने सुरू होण्याची शक्यता नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांतून व्यक्त होत आहे. दीपावलीनंतर यंत्रमाग कापडाला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा असली तरी ती मात्र अद्याप दूरच राहिली आहे.

यंत्रमाग कापड उद्योग गेल्या अडीच वर्षांपासून आर्थिक मंदीच्या फेºयात अडकला आहे. स्वत:चे कापड उत्पादन करणारे यंत्रमागधारक व कापड व्यापारी यांना फारसा नफा मिळत नसला तरी बहुतांशी कालावधी नुकसानीत गेल्यामुळे यंत्रमागधारक हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑात असलेले जास्त विजेचे दर आणि महागाई यामुळे रोजगाराभिमुख असलेल्या या उद्योगास शासनाने मदत करावी, यासाठी यंत्रमाग केंद्रांमधून विविध प्रकारची आंदोलने झाली.

डिसेंबर २०१५ मध्ये हिवाळी अधिवेशनात वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रमागाच्या वीज दरात सवलत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि त्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये इचलकरंजीत घेतलेल्या यंत्रमाग परिषदेमध्ये, जुलै २०१६ पासून यंत्रमाग उद्योगाला आणखीन प्रतियुनिट एक रुपये वीज दराची सवलत व यंत्रमाग उद्योगासाठी घेतलेल्या अर्थसहायासाठी पाच टक्के व्याजाची सवलत देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. वीजमंत्र्यांच्या आश्वासनाला दोन वर्षे होत आहेत. तर वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या ग्वाहीला सव्वा वर्ष उलटले, तरी अद्याप त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यंत्रमागधारकांना मार्गप्रतीक्षा आहे.

कापडाला गिºहाईक नसल्यामुळे यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये आणि कापड उत्पादन करणाºया कारखानदारांच्या नफ्यामध्ये वाढ होत नाही, अशा स्थितीत हा उद्योग गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ रखडला आहे. दिवाळीनंतर कापडाला गिºहाईक वाढेल आणि पुन्हा यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था येऊन कापड विक्रीसाठी तेजी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीनंतर दोन आठवडे झाले तरी अद्यापही त्याबाबत कोणताही मागमूस नाही. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजी व परिसरातील सुमारे ४० टक्के यंत्रमाग कारखान्यांमध्ये फक्त दिवस पाळी म्हणजे जेमतेम २० ते २५ टक्के कापड उत्पादन सुरू झाले आहे. उर्वरित यंत्रमाग कारखाने आणखीन आठवडाभर तरी चालू होतील की नाही, याची शंका असल्याची येथील वस्त्रोद्योगात चर्चा आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन