शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष अन् बेफिकिरीच नडते..!, सदोष रस्तेही अपघातांचे मुख्य कारण 

By उद्धव गोडसे | Updated: May 11, 2024 12:13 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट..जाणून घ्या

उध्दव गोडसेकोल्हापूर : वाहनधारकांच्या चुकांमुळेच बहुतांश अपघात होतात. सुरक्षा साधनांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन केल्यास सुमारे ८० टक्के अपघात टाळता येतात. यासाठी वाहनधारकांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपघातात गेलेला जीव आणि झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे पश्चात्ताप होऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घेणे हिताचे ठरते.अपघात झाल्यानंतर अनेकदा रस्त्यांना दोष दिला जातो. रस्त्यात खड्डे आहेत, धोकादायक वळणे आहेत, सूचनाफलक नाहीत, संरक्षक कठडे नाहीत अशी कारणे सांगून वाहनचालकांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळेच होतात ही वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान नसते. वळण घेताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. भरधाव वाहने चालवतात. ओव्हरटेक करतात. गर्दीतही यू- टर्न घेणारे महाभागही कमी नाहीत. दुचाकींना आरसे नसतात. मोजकेच दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. महामार्गावरील प्रवास तर रामभरोसे असतो. महामार्गाच्या लगतच बाजार भरतात. विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. वाहनांचे धोकादायक पार्किंग असते. कागल ते सातारा यादरम्यान महामार्गावर या समस्या गंभीर आहेत. सामूहिक प्रयत्नाने यात सुधारणा करणे शक्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन यांचे प्रयत्न आणि वाहनचालकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळून प्रवास सुरक्षित होऊ शकतो. 

बायपास, उड्डाणपूल असावेतराष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गांचे रुंदीकरण होत आहे. वाढती वाहतूक लक्षात घेऊन हे मार्ग गावाबाहेरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी बायपास किंवा उड्डाणपुलांचा पर्याय अवलंबावा लागेल. तरच अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल.

अशी घ्यावी दक्षता

  • परवाना सोबत असावा
  • वाहनाचा विमा आवश्यक
  • दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे
  • चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करावा
  • गतीच्या सूचनांचे पालन करावे
  • महामार्गावर लेन क्रॉसिंगवेळी इंडिकेटरचा वापर करावा
  • रस्त्याकडेला वाहन थांबवू नये
  • पार्किंग लाइटचा वापर करावा
  • वेळोवेळी वाहनांची देखभाल दुरुस्ती करावी

या सुधारणा आवश्यक

  • वाहतूक नियमांचे पालन व्हावे
  • ब्लॅक स्पॉटवर सुधारणा व्हाव्यात
  • रस्त्याच्या कडेला सूचनाफलक लावावेत
  • सर्व्हिस रोड अत्यावश्यक
  • महामार्गांवर दुचाकींना प्रवेशबंदी करावी
  • उलट्या दिशेने होणारी वाहतूक पूर्ण बंद व्हावी
  • ऊस वाहतुकीची वाहने रस्त्याकडेला थांबवू नयेत
  • वाहनांना रिफ्लेक्टर असावेत

जीव महत्त्वाचा की घाई?बहुतांश अपघात वाहनचालकांच्या घाईगडबडीतून होतात. वेळेत पोहोचण्यासाठी घाईत वाहने चालवून अपघातांना निमंत्रण दिले जाते. पाच-दहा मिनिटे उशिराने पोहोचल्यास काम होण्यास थोडा उशीर होईल. मात्र, अपघातात होणारे नुकसान भरून येत नाही. घाई टाळण्यासाठी पाच-दहा मिनिटे आधीच घराबाहेर पडावे. विशेषतः तरुणांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट

  • कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर केरली फाटा, शिवाजी पूल ते वडणगे फाटा, आंबेवाडी ते रेडेडोह.
  • पुणे-बंगळुरू महामार्गावरील कणेरीवाडी फाटा, लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव, किणी टोलनाका, वाठार उड्डाणपूल, अंबप फाटा, टोप, नागाव.
  • सांगली मार्गावरील हालोंडी ते अतिग्रे फाटा, कबनूर फाटा, गारगोटी मार्गावरील कळंबा ते कत्यायनी वळण.
  • तसेच मुरगूड नाका हे जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात