शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष अन् बेफिकिरीच नडते..!, सदोष रस्तेही अपघातांचे मुख्य कारण 

By उद्धव गोडसे | Updated: May 11, 2024 12:13 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट..जाणून घ्या

उध्दव गोडसेकोल्हापूर : वाहनधारकांच्या चुकांमुळेच बहुतांश अपघात होतात. सुरक्षा साधनांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन केल्यास सुमारे ८० टक्के अपघात टाळता येतात. यासाठी वाहनधारकांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपघातात गेलेला जीव आणि झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे पश्चात्ताप होऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घेणे हिताचे ठरते.अपघात झाल्यानंतर अनेकदा रस्त्यांना दोष दिला जातो. रस्त्यात खड्डे आहेत, धोकादायक वळणे आहेत, सूचनाफलक नाहीत, संरक्षक कठडे नाहीत अशी कारणे सांगून वाहनचालकांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळेच होतात ही वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान नसते. वळण घेताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. भरधाव वाहने चालवतात. ओव्हरटेक करतात. गर्दीतही यू- टर्न घेणारे महाभागही कमी नाहीत. दुचाकींना आरसे नसतात. मोजकेच दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. महामार्गावरील प्रवास तर रामभरोसे असतो. महामार्गाच्या लगतच बाजार भरतात. विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. वाहनांचे धोकादायक पार्किंग असते. कागल ते सातारा यादरम्यान महामार्गावर या समस्या गंभीर आहेत. सामूहिक प्रयत्नाने यात सुधारणा करणे शक्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन यांचे प्रयत्न आणि वाहनचालकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळून प्रवास सुरक्षित होऊ शकतो. 

बायपास, उड्डाणपूल असावेतराष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गांचे रुंदीकरण होत आहे. वाढती वाहतूक लक्षात घेऊन हे मार्ग गावाबाहेरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी बायपास किंवा उड्डाणपुलांचा पर्याय अवलंबावा लागेल. तरच अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल.

अशी घ्यावी दक्षता

  • परवाना सोबत असावा
  • वाहनाचा विमा आवश्यक
  • दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे
  • चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करावा
  • गतीच्या सूचनांचे पालन करावे
  • महामार्गावर लेन क्रॉसिंगवेळी इंडिकेटरचा वापर करावा
  • रस्त्याकडेला वाहन थांबवू नये
  • पार्किंग लाइटचा वापर करावा
  • वेळोवेळी वाहनांची देखभाल दुरुस्ती करावी

या सुधारणा आवश्यक

  • वाहतूक नियमांचे पालन व्हावे
  • ब्लॅक स्पॉटवर सुधारणा व्हाव्यात
  • रस्त्याच्या कडेला सूचनाफलक लावावेत
  • सर्व्हिस रोड अत्यावश्यक
  • महामार्गांवर दुचाकींना प्रवेशबंदी करावी
  • उलट्या दिशेने होणारी वाहतूक पूर्ण बंद व्हावी
  • ऊस वाहतुकीची वाहने रस्त्याकडेला थांबवू नयेत
  • वाहनांना रिफ्लेक्टर असावेत

जीव महत्त्वाचा की घाई?बहुतांश अपघात वाहनचालकांच्या घाईगडबडीतून होतात. वेळेत पोहोचण्यासाठी घाईत वाहने चालवून अपघातांना निमंत्रण दिले जाते. पाच-दहा मिनिटे उशिराने पोहोचल्यास काम होण्यास थोडा उशीर होईल. मात्र, अपघातात होणारे नुकसान भरून येत नाही. घाई टाळण्यासाठी पाच-दहा मिनिटे आधीच घराबाहेर पडावे. विशेषतः तरुणांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट

  • कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर केरली फाटा, शिवाजी पूल ते वडणगे फाटा, आंबेवाडी ते रेडेडोह.
  • पुणे-बंगळुरू महामार्गावरील कणेरीवाडी फाटा, लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव, किणी टोलनाका, वाठार उड्डाणपूल, अंबप फाटा, टोप, नागाव.
  • सांगली मार्गावरील हालोंडी ते अतिग्रे फाटा, कबनूर फाटा, गारगोटी मार्गावरील कळंबा ते कत्यायनी वळण.
  • तसेच मुरगूड नाका हे जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात