शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:27 IST

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने गावी यायचे कसे, या विवंचनेत ते आहेत.

कोल्हापूर : नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेलेले गडहिंग्लज,आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यातील तीस हजारांहून अधिक लोक अजूनही मुंबईत अडकून पडले आहेत. ‘लॉकडाऊन’ आज मंगळवारी उठेल आणि गावी जायचे म्हणून त्यांनी खासगी बसेसचे बुकिंग केले आहे, परंतु तोपर्यंत लॉकडाऊन वाढल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. कधी एकदा गावाला येईन, यासाठी ते आतूर झाले आहेत.

नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील लोक सर्वाधिक गावाबाहेर राहात असल्याचे चित्र आहे. ज्या तालुक्यात औद्योगीकरण फारसे झाले नाही, साखर कारखानदारी किंवा तत्सम उद्योग विकसित झालेला नाही, शेती पिकाऊ नाही, अशा तालुक्यांतील लोक गाव सोडून जास्त बाहेर आहेत. शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड या तालुक्यांचे अर्थकारण हे मुंबईशी जोडलेले आहे. त्यामुळे या तालुक्यांतून कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर आलेल्यांची संख्या ही ४२ हजार ८२२ इतकी आहे. परंतु अजूनही सुमारे ३० हजार लोक तिथे आहेत. हे लोक छोट्या-छोट्या खोल्यांत राहतात. शिफ्टमध्ये काम करतात आणि अनेकजण डबे खात होते. परंतु आता बाहेर पडता येत नसल्याने सगळ््यांनाच छोट्या खोलीत नुसते बसणेही मुश्कील झाले आहे.

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने गावी यायचे कसे, या विवंचनेत ते आहेत. 

मुंबईत ज्या परिसरात कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत, तिथे लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. त्यामुळे तिथून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तुम्ही आहे तिथेच थांबा. गावी येण्याचा प्रयत्न करून अडचणी वाढवू नका, असे निरोप गावांकडील मंडळी त्यांना देऊ लागली आहेत.

 

आम्हाला गावी यायचे आहे, काहीतरी करा म्हणून मुंबईकर लोकांचे रोज फोन येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत संपर्क साधला. खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालावा, असे प्रयत्न सुरू आहेत. गावी येण्यासाठी हे लोक आसुसलेले आहेत.राजेश पाटीलआमदार, चंदगड मतदार संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस