शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:27 IST

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने गावी यायचे कसे, या विवंचनेत ते आहेत.

कोल्हापूर : नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेलेले गडहिंग्लज,आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यातील तीस हजारांहून अधिक लोक अजूनही मुंबईत अडकून पडले आहेत. ‘लॉकडाऊन’ आज मंगळवारी उठेल आणि गावी जायचे म्हणून त्यांनी खासगी बसेसचे बुकिंग केले आहे, परंतु तोपर्यंत लॉकडाऊन वाढल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. कधी एकदा गावाला येईन, यासाठी ते आतूर झाले आहेत.

नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील लोक सर्वाधिक गावाबाहेर राहात असल्याचे चित्र आहे. ज्या तालुक्यात औद्योगीकरण फारसे झाले नाही, साखर कारखानदारी किंवा तत्सम उद्योग विकसित झालेला नाही, शेती पिकाऊ नाही, अशा तालुक्यांतील लोक गाव सोडून जास्त बाहेर आहेत. शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड या तालुक्यांचे अर्थकारण हे मुंबईशी जोडलेले आहे. त्यामुळे या तालुक्यांतून कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर आलेल्यांची संख्या ही ४२ हजार ८२२ इतकी आहे. परंतु अजूनही सुमारे ३० हजार लोक तिथे आहेत. हे लोक छोट्या-छोट्या खोल्यांत राहतात. शिफ्टमध्ये काम करतात आणि अनेकजण डबे खात होते. परंतु आता बाहेर पडता येत नसल्याने सगळ््यांनाच छोट्या खोलीत नुसते बसणेही मुश्कील झाले आहे.

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने गावी यायचे कसे, या विवंचनेत ते आहेत. 

मुंबईत ज्या परिसरात कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत, तिथे लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. त्यामुळे तिथून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तुम्ही आहे तिथेच थांबा. गावी येण्याचा प्रयत्न करून अडचणी वाढवू नका, असे निरोप गावांकडील मंडळी त्यांना देऊ लागली आहेत.

 

आम्हाला गावी यायचे आहे, काहीतरी करा म्हणून मुंबईकर लोकांचे रोज फोन येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत संपर्क साधला. खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालावा, असे प्रयत्न सुरू आहेत. गावी येण्यासाठी हे लोक आसुसलेले आहेत.राजेश पाटीलआमदार, चंदगड मतदार संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस