शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

‘आयआरबी’ला महिन्याची नोटीस

By admin | Updated: April 3, 2015 01:03 IST

अपूर्ण कामे : ३० एप्रिलनंतर महापालिका करणार कामे; २५ कोटी अनामत रकमेतून होणार वसूल

कोल्हापूर : महापालिका, आयआरबी व एमएसआरडीसी यांच्यात सुकाणू समितीमध्ये ठरल्याप्रमाणे शहरातील विविध अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने आयआरबीला एक महिन्याची नोटीस बजावली आहे. ३० एप्रिलपर्यंत कामे सुरू न झाल्यास ही चालू कामे महापालिका करून घेणार आहे तसेच त्याचे पैसे चालू बाजारभावाप्रमाणे आयआरबीच्या २५ कोटी रुपयांच्या अनामत रकमेतून वसूल करणार असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयआरबीने अपूर्ण ठेवलेल्या कामामुळेच रंकाळा येथील तांबट कमानसमोरील रस्ता गेली चार वर्षे रखडला आहे. रंकाळ्याच्या उत्तरेकडील दारातील डी-मार्टच्या समोरील रस्त्यासह चॅनेल्सचे कामे रखडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. महिन्याभरात ही कामे मार्गी लागणार आहेत. महापालिका ही कामे करून घेऊन त्याचे पैसे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे आयआरबीच्या २५ कोटी रुपयांच्या अनामत रकमेतून बिलेवजा केली जाणार आहेत. गेल्या अडीच वर्षांत ‘आयआरबी’ने शहरातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे केलेली नाहीत. बंद पडलेले दिवे, गटर्स व चॅनेलची दुरुस्ती, अपूर्ण पदपथ, बसथांबे, देखभालीच्या कामांसह अपूर्ण कामे करण्याचा दबाव ‘आयआरबी’वर वाढला आहे. येत्या महिन्यात ही सर्व अपूर्ण कामे सुरू करावी लागतील किंवा महापालिकेला ती करण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे तसेच दर महिन्याला आयआरबी, महापालिका व एमएसआरडीसी यांच्यात होणाऱ्या सुकाणू समितीच्या बैठकीत केलेल्या कामांचा अहवाल सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)