शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

मे महिन्याचा दणका, तब्बल ५० हजार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून जेवढे कोरोना पॉझिटिव्ह आले त्यापैकी ४४ टक्के म्हणजेच ५० ...

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून जेवढे कोरोना पॉझिटिव्ह आले त्यापैकी ४४ टक्के म्हणजेच ५० हजार ६७ रुग्ण एका सरलेल्या मे महिन्यात नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २० हजार ६३२ रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यांच्या अडीचपट मे महिन्यात पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १३ हजार २६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२१ या तीन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. मात्र एप्रिलपासून रुग्णवाढीला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी होणारी प्रचंड गर्दी, हेच नागरिक दिवसभरात घरात थांबणे, ‘गाेकूळ’ निवडणूक, कडक लाॅकडाऊनबाबतचे धरसोड धाेरण, गृह अलगीकरण आणि जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी गेल्या वर्षी या तुलनेत घेतलेली बचावात्मक भूमिका या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मे महिन्यामध्ये रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येते.

केवळ रुग्णसंख्या नव्हे तर एप्रिल आणि मे महिन्यात मृत्यूचाही आकडा असाच वाढत राहिला आहे. मे महिन्यामध्ये चार दिवस रुग्णसंख्या ही दोन हजाराच्या वर गेली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या ही २५ मे रोजी २ हजार ८९८ इतकी झाली. तर १६ दिवस रुग्णसंख्या १५०० च्या वर आहे. संपूर्ण मे महिन्यात केवळ एकच दिवस म्हणजे ३ मे रोजी सर्वात कमी रुग्णसंख्या म्हणजे ८८८ इतकी नोंदवण्यात आली आहे.

मे महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात ऑक्सिजनसाठी जी धावपळ करावी लागली ती दुसऱ्या पंधरवड्यात थोडी कमी झाली. रेमडेसिविर इंजक्शन्सची मागणी असताना पुरवठाही वाढला. या दिलासादायक बाबी असल्या तरी म्यूकरमायकोसिसचे रुग्णसंख्या १०० वर पोहोचली आहे, हे चिंताजनक आहे.

जिल्ह्यातील कोल्हापूर शहराबरोबरच करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या हा देखील प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच आता जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने या तीन तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूर महापालिकेनेही कठोरपणे संजीवनी अभियान राबवण्यास सुरूवात केली आहे. चाचण्या वाढवण्यात येत आहेत.

चौकट

नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज

आरोग्य विभाग आणि प्रशासन यांनी शक्य त्या गोष्टी केल्या आहेत. नवे ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. कोविड केअर सेंटर वाढवली जात आहेत. याला मर्यादा आहेत. नियोजनमधून औषधांसाठी निधी दिला जात आहे. रुग्णवाहिका, मोबाईल व्हॅन मंजूर केल्या जात आहेत. त्यामुळे केवळ शासन आणि प्रशासनाच्या नावाने बोटे मोडून काहीही होणार नाही. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकीकडे डॉक्टर्स, नर्स, सर्व आरोग्य कर्मचारी रात्रीचा दिवस करत असताना आता विनाकारण फिरायचे टाळून नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.