शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तसे वातावरण तयार होऊ लागले आहे. सकाळी दहापर्यंत सगळीकडे ढगाळ वातावरणासह वाहणारे वारे मान्सूनची चाहूल देत असल्याने बळिराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. खरीप मशागतीसह पेरणीसाठी शिवारे माणसांनी अक्षरश: फुलून गेली असून, जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भाताच्या धूळवाफ पेरण्यांचे काम जोरात सुरू झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन यांसह कडधान्ये घेतली जातात. साधारणत: अडीच लाख हेक्टरमध्ये खरिपाची लागवड होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरनी वाढ झाली आहे. यावर्षी सगळीकडेच वळीव पावसाने चांगली हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला काढून खरीप पेरणीसाठी जमिनी तयार करण्यात शेतकरी मग्न झाला आहे. त्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आणि त्यानुसार मान्सूनचे मार्गाक्रमण सुरू आहे. अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असून, त्याची केरळकडे गतीने वाटचाल सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी दोन दिवस झाले वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जसे वातावरण असते, तसे वातावरण जिल्ह्यात सकाळी पाहावयास मिळत आहे. उन्हाअगोदर मशागत करून पेरणीसाठी जमिनी तयार करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो; त्यामुळे सकाळी सहा वाजताच शिवारे माणसांनी फुलून जात आहेत. करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत भाताच्या धूळवाफ पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. भाताचे १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४ हजार हेक्टरपेक्षा अधिक भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरमाथ्यावर भात व नागली रोपांच्या लागणीसाठी तरवा टाकण्याची तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तिथे भाताच्या पेरणीनंतर पाणी दिले जात आहे.