शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तसे वातावरण तयार होऊ लागले आहे. सकाळी दहापर्यंत सगळीकडे ढगाळ वातावरणासह वाहणारे वारे मान्सूनची चाहूल देत असल्याने बळिराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. खरीप मशागतीसह पेरणीसाठी शिवारे माणसांनी अक्षरश: फुलून गेली असून, जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भाताच्या धूळवाफ पेरण्यांचे काम जोरात सुरू झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन यांसह कडधान्ये घेतली जातात. साधारणत: अडीच लाख हेक्टरमध्ये खरिपाची लागवड होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरनी वाढ झाली आहे. यावर्षी सगळीकडेच वळीव पावसाने चांगली हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला काढून खरीप पेरणीसाठी जमिनी तयार करण्यात शेतकरी मग्न झाला आहे. त्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आणि त्यानुसार मान्सूनचे मार्गाक्रमण सुरू आहे. अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असून, त्याची केरळकडे गतीने वाटचाल सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी दोन दिवस झाले वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जसे वातावरण असते, तसे वातावरण जिल्ह्यात सकाळी पाहावयास मिळत आहे. उन्हाअगोदर मशागत करून पेरणीसाठी जमिनी तयार करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो; त्यामुळे सकाळी सहा वाजताच शिवारे माणसांनी फुलून जात आहेत. करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत भाताच्या धूळवाफ पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. भाताचे १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४ हजार हेक्टरपेक्षा अधिक भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरमाथ्यावर भात व नागली रोपांच्या लागणीसाठी तरवा टाकण्याची तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तिथे भाताच्या पेरणीनंतर पाणी दिले जात आहे.