शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

मोकाट कुत्र्यांची झुंडशाही! . नागरिकांत दहशत : अनेकजण जखमी; प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तच-कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:13 IST

जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीचा वेध घेणारी मालिका आजपासून...

जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीचा वेध घेणारी मालिका आजपासून...चंंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : शिरोलीत (ता. हातकणंगले) मंगळवारी २७ जणांना कुत्र्याने चावा घेतला. सोमवारी हळदीत (ता. करवीर) कुत्र्याने दोघाजणांना जखमी केले. कोल्हापूर शहरातही पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेवून जखमी केले आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी जयसिंंगपूर येथे सलग तीन दिवस पिसाळलेले कुत्रे धुमाकूळ घालत होते. येथे रेबीजची लागण होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. अशा घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्या परिसरात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली जाते. त्यानंतर सारे काही शांत होते.

भटक्या कुत्र्यांची समस्या इतकी गंभीर असूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. नागरिकांना रात्री शहरात जीव मुठीत धरूनच फिरावे लागते. कारण कोपऱ्या-कोपºयावर विशेषत: चिकन, मटनाची दुकाने, चायनीजचे गाडे जिथे आहेत. त्या परिसरात ही कुत्री टोळीने असतात. मुले किंवा माणूस दिसला की हल्ला करतात.गेल्या आठ वर्षांत नसबंदीच नाहीमोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याला किंवा त्यांना ठार मारण्याला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांची नसबंदी करुन त्यांचे प्रजोत्पादन होवू न देणे हाच एकमेव उपाय आहे. पण हा उपाय खर्चिक असल्याने त्याचा अवलंब केला जात असल्याचे अपवादानेच दिसते. महापालिकेने तर २००९-१० मध्ये कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षे याकडे दुर्लक्ष केले आहे. या आठ वर्षात कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमारात वाढली आहे.२० हजारांवर कुत्री; महापलिकेला पत्ताच नाहीकेवळ कोल्हापूर शहरात २० हजारांवर भटकी कुत्री असल्याचे पशुसंवर्धन विभागाची २०१५ ची आकडेवारी सांगते. महापालिकेकडे मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. २०१२ च्या पशूगणनेनुसार कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मिळून एकूर ४३ हजार ७६७ कुत्री आहेत. गेल्या सहा वर्षात या कुत्र्यांची संख्या किमान दुप्पट झाली असावी असा स्वयंसेवी संस्थांचा अंदाज आहे. यावरुन या प्रकरणाचे गांभीर्य समजते.निधीचा अडसर : मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, स्वतंत्र डॉक्टर आणि त्यांना सहाय्यक कर्मचारी तसेच कुत्री पकडण्यासाठी डॉगव्हॅनची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी लागतात. महापालिकेने गेल्या आठ वर्षात यातले काही केले नाही. नाही म्हणायला कुत्री पकडण्यासाठी कर्मचाºयांचे एक पथक आणि एक डॉग व्हॅन होती. मात्र ती ही चांगल्या दर्जाची नव्हती. या पथकासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसणे ंहेच यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. अखेर जीवरक्षा अ‍ॅनिमल ट्रस्ट केअर या स्वयंसेवी संस्थेने मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापलिकेने जून महिन्यापासून नसबंदीस सुरुवात केली आहे. (क्रमश:)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राgovernment schemeसरकारी योजना