शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर परिक्षेत्रात १०० टोळ्यांवर मोक्का, ६७६ गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:54 IST

परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर परिक्षेत्रात १०० टोळ्यांवर मोक्का, ६७६ गुन्हेगारांना अटकविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती

कोल्हापूर : परिक्षेत्रात कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण हे विकसनशील जिल्हे येतात. वाढते औद्योगीकरण, बांधकाम क्षेत्र, जमिनींचा वाढता भाव यांमुळे विकासाबरोबरच वर्चस्ववादामुळे संघटित गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ थोपविणे भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याने खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सावकारीसारखे गंभीर व सामाजिक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.परिक्षेत्रात गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार घेऊन गुन्हे दाखल केले जात आहेत. कोणत्याही गुन्ह्यामध्ये तक्रार टाळाटाळ किंवा परस्पर मिटविण्याचा प्रयत्न करू नका, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गुन्ह्यांची संख्या वाढती असली तरी त्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे कमी करण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी परिक्षेत्रातून १३२ सराईत गुन्हेगारी टोळ्यांतील ८३० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच कलम ५७ नुसार परिक्षेत्रातील ५४ गुन्हेगारांवर न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली आहे. त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

न्यायालयीन कामकाजावेळी जे आरोपी हजर राहत नाहीत, अशा ४३३ आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरोडे, चोरी गुन्ह्यातील ४४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ‘निर्भया’ पथकाद्वारे परिक्षेत्रात ६७ हजार २३९ कारवाया केल्या असून ११९ गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे ६५ हजार ४१० तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

२१२ फरार व १४८४ पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यात आले आहे. मटका, जुगारामध्ये ८४६८ खटले दाखल करून १७८९ आरोपींवर कारवाई केली आहे. १५ कोटी २५ लाख १९ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदीमध्ये २० हजार ४९३ खटले दाखल करून १७ हजार ६१० आरोपींवर कारवाई केली आहे.

१९ कोटी ६३ लाख १० हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खासगी सावकारीमध्ये २५४ गुन्हे दाखल करून ५८२ आरोपींवर कारवाई केल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.जिल्हावार मोक्का कारवाईकोल्हापूर-२०, सांगली- ८, सातारा-१९, सोलापूर ग्रामीण-१२, पुणे ग्रामीण-४१ 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलkolhapurकोल्हापूर