शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

मोदींकडून एफसीआयच्याही खासगीकरणाचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:30 IST

NarendraModi, Bjp, FarmarStrike, RajuShetti, Kolhapur भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) ही देशाला अन्नधान्य पुरविणारी यंत्रणा मोडीत काढून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; त्यासाठीच जीवनावश्यक कायद्यासह बाजार समितीच्या अधिनियमांत बदल केला आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.

ठळक मुद्देमोदींकडून एफसीआयच्याही खासगीकरणाचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोपकंत्राटी शेती पूर्वीपासूनच; पण किती भले झाले

कोल्हापूर : भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) ही देशाला अन्नधान्य पुरविणारी यंत्रणा मोडीत काढून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; त्यासाठीच जीवनावश्यक कायद्यासह बाजार समितीच्या अधिनियमांत बदल केला आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे भले करण्याच्या नावाखाली मोदींकडून धनदांडग्यांचे हितसंबंध जपले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योग बंद पडलेले असतानाही शेती सुरू राहिल्याने उद्योगपतींचा डोळा शेतीकडे वळला आहे. त्यांना सोईचे असे कायदेही सरकारने करून देण्यास सुरुवात केली आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करण्यापाठोपाठ बाजार समित्यांच्या बाहेर विक्रीसाठी परवानगी देऊन अब्जावधींची उलाढाल असलेल्या समित्यांसमोर बड्या उद्योगपतींच्या कॉर्पोरेट समित्यांचे आव्हान तयार केले आहे. अन्नधान्य महामंडळ या सरकारी यंत्रणेचे देशभर जाळे आहे. त्यांचे गोडावून, पुरवठ्याची साखळी मोठी आहे.

तोटा वाढत असल्याचे दाखवून त्यँचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एक देश - एक समिती असे म्हणतात; मग एक किंमत का नाही? हा आमचा प्रश्न आहे. सरकारने आधी किमान हमीभाव जाहीर करावा, कंपन्यांवर कारवाईची तरतूद करावी आणि खुशाल कायदे करावेत.फडणवीसांना टोलादेंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर पुस्तक काढणार असे म्हटले आहे, त्यांनी ते जरुर काढावे, त्यांना माझे समर्थनच आहे; पण सिंचन घोटाळ्यावेळी गाडीभर पुरावे देण्याचा अनुभव त्यांनी विसरू नये, असा टोला शेट्टी यांनी लगावला. स्वत:ची गाडी आधी आणावी, उगीच हवेतील गप्पा मारू नयेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.कडकनाथचा अनुभव..कंत्राटी शेतीचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे. स्वीट कॉर्न, स्ट्रॉबेरी, शेळ्या-मेंढ्या पालन, कडकनाथ कोंबड्यांपर्यंत शेतकऱ्यांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. महाग दराने बियाणे माथी मारून शेतकऱ्यांना हातोहात फसवून हे कंत्राटदार गायब झाले, त्यांच्यावर कारवाईचे धाडस तरी सरकारने केले का? असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर