शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत मोदींचा काळा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत ...

कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात भाजपचे सरकार स्थापन केले. त्यांच्या कार्यकालास सात वर्षे पूर्ण झाली, तरी कोणताही घटक समाधानी नाही. देशाची अधोगती झाली. नोटबंदी, जीएसटी, अचानक लॉकडाऊन अशा घातकी निर्णयांमुळे देशाचे नुकसान झाले. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अचानक रात्री १२ वाजता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे कामगारांचे, स्थलांतरितांचे हाल झाले. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. अनेक उद्योग, धंदे अडचणीत आले. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. बेरोजगारी वाढली. हे कमी म्हणून की काय त्यांनी कामगारविरोधी कायदे केले. शेतकरीविरोधी काळे कायदे आणले.

मोदींना कोरोना नियंत्रणात आणता आलेला नाही. देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची टंचाई आहे. सुरुवातीला ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात होती. एके दिवशी मोदींनी ‘मन की बात’मध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना लसीच्या उपलब्धतेचा विचार केला नाही. परिणामी, लसीकरणाची मोहीम विस्कळीत झाली. कोरोनामुळे फटका बसलेल्यांना २० लाख कोटींची घोषणा केली. पण हे पैसे नेमके कोठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्रकार परिषदेस आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बंद

पालकमंत्री पाटील म्हणाले की, विविध सामाजिक संस्था, सीएसआरमधून पाच हजार कोटींपर्यंत पीएम केअर फंड संकलित केला. यातून रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर बंद आहेत. अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी केली जात आहे. जगात सर्वाधिक वेळा भारतातच इंटरनेट बंद करण्याचा पराक्रमही मोदी यांनी केला आहे. मोदींच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होत आहे.

केंद्रामुळेच इंधन दरवाढ

पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. डिझेलचा दरही वाढला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. सामान्य, गरिबांचे जगणे अडचणीचे झाले आहे असे पाटील यांनी सांगितले. सात वर्षांत मोदींनी भाषणबाजी करणे, इव्हेंट करीत इमेज मॅनेजमेंट करण्याचाचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.