शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

सात वर्षांत मोदींचा काळा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत ...

कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात भाजपचे सरकार स्थापन केले. त्यांच्या कार्यकालास सात वर्षे पूर्ण झाली, तरी कोणताही घटक समाधानी नाही. देशाची अधोगती झाली. नोटबंदी, जीएसटी, अचानक लॉकडाऊन अशा घातकी निर्णयांमुळे देशाचे नुकसान झाले. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अचानक रात्री १२ वाजता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे कामगारांचे, स्थलांतरितांचे हाल झाले. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. अनेक उद्योग, धंदे अडचणीत आले. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. बेरोजगारी वाढली. हे कमी म्हणून की काय त्यांनी कामगारविरोधी कायदे केले. शेतकरीविरोधी काळे कायदे आणले.

मोदींना कोरोना नियंत्रणात आणता आलेला नाही. देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची टंचाई आहे. सुरुवातीला ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात होती. एके दिवशी मोदींनी ‘मन की बात’मध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना लसीच्या उपलब्धतेचा विचार केला नाही. परिणामी, लसीकरणाची मोहीम विस्कळीत झाली. कोरोनामुळे फटका बसलेल्यांना २० लाख कोटींची घोषणा केली. पण हे पैसे नेमके कोठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्रकार परिषदेस आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बंद

पालकमंत्री पाटील म्हणाले की, विविध सामाजिक संस्था, सीएसआरमधून पाच हजार कोटींपर्यंत पीएम केअर फंड संकलित केला. यातून रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर बंद आहेत. अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी केली जात आहे. जगात सर्वाधिक वेळा भारतातच इंटरनेट बंद करण्याचा पराक्रमही मोदी यांनी केला आहे. मोदींच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होत आहे.

केंद्रामुळेच इंधन दरवाढ

पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. डिझेलचा दरही वाढला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. सामान्य, गरिबांचे जगणे अडचणीचे झाले आहे असे पाटील यांनी सांगितले. सात वर्षांत मोदींनी भाषणबाजी करणे, इव्हेंट करीत इमेज मॅनेजमेंट करण्याचाचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.