शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

फसवणूक करणारे मोदी सरकार हटवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:51 AM

मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देमालगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा, शाखेचे उद्घाटन

मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सात-बारा कोरा करण्याचे केवळ आश्वासन देणाºया व स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू न करणाºया मोदी सरकारला सत्तेवरून हटविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले. शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचीही मागणी केली.

मालगाव येथे स्वाभिमानी विद्यार्थी व वाहतूक संघटनेच्या शाखा उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यावेळी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, देशात भाजपची सत्ता येण्यापूर्वी पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांच्या शेतजमिनीवर असलेला कर्जाचा बोजा कमी करून सात-बारा कोरा करण्याबरोबरच शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याची आश्वासने दिली होती. मात्र सत्ता मिळताच मोदी सरकाने शेतकºयांना वाºयावर सोडले.

खा. शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व दुटप्पी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनाला हमीभाव नाही. शेतकºयांना कर्ज देतानाही दुटप्पीपणा सुरू केला आहे. उद्योगपतींना ४० हजार कोटीचे कर्ज विनातारण दिले जाते, मात्र शेतकºयांना दहा हजार रूपयांच्या कर्जासाठी लाखो रूपये किमतीची जमीन तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळू शकत नाही. हे अन्यायकारक धोरण बदलण्यासाठी व केवळ शेतकºयांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे. देशातील २१ संघटनांनी एकत्र येऊन शेतकºयांच्या प्रश्नासाठी संसदेचे एक आठवड्याचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी राष्टपतींकडे केली आहे. मोदी सरकारला सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा व शेतकºयांचा विसर पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना सत्तेवरून हटविण्याची गरज आहे.शेतकºयांच्या न्यायासाठी लढा सुरू ठेवणारदेशातील उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांनी करोडो रूपयांचे घोटाळे करून देश सोडला. मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. उद्योगपतींना दिलेली कोट्यवधीची कर्जे सरकार माफ करते; मात्र सर्वसामान्य शेतकºयांना कर्जमाफी देताना निकष लावले जातात. कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते. सरकारचा हा दुटप्पी अन्याय सहन न होणारा असल्याने आम्ही सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू केला आहे. शेतकºयांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण