शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

मोदी-काँग्रेस समर्थकांत गळपट्टी धरण्यापर्यंत घमासान, सोशल मीडियावरील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 16:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस समर्थकांत एकमेकांची उणीदुणीच नव्हे, तर एकेरी भाषा वापरून गळपट्टी धरण्यापर्यंतचे वाद सोशल मीडियावर सुरूझाले आहेत. निवडणुका अजून दीड महिना लांब असतानाही कार्यकर्त्यांत मात्र आतापासूनच वाक्युद्ध सुरू झाले आहे. मुख्यत: व्हॉटस् अ‍ॅपवरील विविध ग्रुप हे वादाचे मूळ ठरत असून, त्यावर पोलिसांनी आतापासूनच काहीतरी प्रतिबंध घालण्याची गरज जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देमोदी-काँग्रेस समर्थकांत गळपट्टी धरण्यापर्यंत घमासानसोशल मीडियावरील चित्र : पक्षीय वादातून व्यक्तीगत संबंधात कटुता

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस समर्थकांत एकमेकांची उणीदुणीच नव्हे, तर एकेरी भाषा वापरून गळपट्टी धरण्यापर्यंतचे वाद सोशल मीडियावर सुरू झाले आहेत. निवडणुका अजून दीड महिना लांब असतानाही कार्यकर्त्यांत मात्र आतापासूनच वाक्युद्ध सुरू झाले आहे. मुख्यत: व्हॉटस् अ‍ॅपवरील विविध ग्रुप हे वादाचे मूळ ठरत असून, त्यावर पोलिसांनी आतापासूनच काहीतरी प्रतिबंध घालण्याची गरज जाणवू लागली आहे.भारताने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ले केल्यानंतर मोदी समर्थकांना चांगलाच चेव आला आहे. त्यांच्यादृष्टीने आता निवडणूक अगदीच एकतर्फी झाली असून, भाजपच्या खासदारांची फक्त मतेच मोजायची शिल्लक राहिली आहेत. त्याअनुषंगाने भाजपच्या सोशल मीडिया ब्रिगेडकडून त्याअर्थाचे मेसेजही व्हायरल केले जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचे ब्रँडिंग मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

सोशल मीडियावर विविध समाज घटकांचे व्हॉटस अ‍ॅप ग्रुप आहेत. त्यामध्ये सर्वच स्तरांतील व वेगवेगळ्या पक्षांची विचारधारा मान्य असलेले लोक असतात; त्यामुळे मोदी समर्थकांनी त्यावर काही शेअर केले, की त्यास काँग्रेस समर्थकांकडून लगेच प्रत्युत्तर दिले जाते. जो असे प्रत्युत्तर करतो, त्याला भाजप-मोदी समर्थकांकडून जोरदार ट्रोल केले जात आहे. त्यातून काहीजण ग्रुप सोडून जात आहेत.

सोमवारचीच गोष्ट, कोल्हापुरातील एका ग्रुपवर पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर ‘माकप’ने कारवाई केल्याचे ब्रेकिंग एका वृत्तवाहिनीच्या बातमीदाराने शेअर करताच एका मोदी समर्थकाने लगेच ‘आता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी नव्हे का..? अशी प्रतिक्रिया शेअर केली.

‘भाजप’चे ज्येष्ठ नेते व निष्णात वकील एस. एस. अहुवालिया यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात कोण ठार झालेले नाही, असे विधान केले आहे. ती पोस्ट काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शेअर केली व मोदी समर्थक महिला कार्यकर्तीला आता तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवणार का? अशी विचारणा केली. अशा पोस्ट शेअर होऊ लागल्याने ग्रुपमध्येही कटूता निर्माण होत आहे. राजकीय पोस्टबद्दल राग येणारेही अनेक लोक अशा ग्रुपवर आहेत. त्यांच्यातून याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.हे लोण ग्रामीण भागातही जास्त आहे. आता प्रत्येक गावांचे आपली माणसे, गावांतील माणसे, आपला गाव असे ग्रुप आहेत. गावांतील बऱ्या-वाईट घटना त्यावर शेअर होतात. प्रत्येक गावात प्रत्येक पक्षांचे समर्थक आहेत; त्यामुळे एकाने त्यावर एखादी राजकीय पोस्ट शेअर केली, की ती मोदी किंवा काँग्रेसला नव्हे, तर व्यक्तीगत आपल्यालाच उद्देशून केल्यासारखी त्यास एकेरीवर जाऊन प्रत्युत्तरे दिली जात आहेत. त्यातून शब्दाला शब्द वाढून एकमेकांची उणीदुणीच नव्हे, तर गळपट्टी धरण्याची भाषा केली जात आहे.

एका गावातील आहोत म्हणून एकमेकांची सुखदु:खे कळावीत, यासाठी स्थापन झालेले ग्रुप राजकारणांमुळे एकमेकांचे शत्रू ठरत आहेत. कोणीही जिंकला तरी आपले रोजचे प्रश्न जे आहेत, त्यात फारसा फरक पडत नाही आणि अडीअडचणीला आपलीच माणसे आपल्या मदतीला येणार आहेत, हा विचार न करता कटूता वाढेल, असा व्यवहार या ग्रुपमधून होत आहे.

आता लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत. त्यामध्ये दोनच उमेदवार आहेत. त्यानंतर विधानसभेला तर यापेक्षा जास्त चुरस होणार आहे. सोशल मीडियावरील ही भांडणे त्यावेळी किती टोकाला जातील याबद्दल जाणकारांच्या मनांत आतापासूनच भीतीचे काहूर उठू लागले आहे. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूर