शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: सतेज यांनी ‘राहुल’ यांना अपशकुन तरी करू नये; मंत्री हसन मुश्रीफांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:17 IST

कदाचित ‘राहुल’, ‘चंद्रदीप’ स्वतंत्र लढतील

कोल्हापूर : ‘दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी कोल्हापुरात काॅंग्रेस जिवंत ठेवण्याचे काम इमाने-इतबारे केले. आता त्यांची मुले राजकीय भवितव्याचा विचार करून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर किमान अपशकुन करून अडथळा आणू नये, त्यांना आशीर्वाद द्यावेत’, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हाणला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘पाटील बंधूंच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसला हत्तीचे बळ मिळणार असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा होईल. शक्तिपीठबाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लपवून ठेवलेली नाही. शेतकऱ्यांवर न लादता त्यांना विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्गाची वाटचाल करणार आहोत. या भूमिकेवर आजही ठाम असून, १५ ऑगस्ट रोजी शेतशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खर्डा-भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशीही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली.कदाचित ‘राहुल’, ‘चंद्रदीप’ स्वतंत्र लढतीलविधानसभेच्या २०२९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात तीन मतदारसंघ वाढणार आहेत. कोल्हापूर शहरातील लोकसंख्या तुलनेत अधिक वाढल्याने ‘करवीर’चे विभाजन होऊ शकते. यामध्ये कदाचित राहुल पाटील व चंद्रदीप नरके स्वतंत्र मतदारसंघातून लढू शकतील, असे संकेतही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

जाजम, घड्याळ खरेदीबाबत स्पष्टीकरण दिले‘गोकुळ’ने खरेदी केलेल्या जाजम व घड्याळ खरेदीबाबत संघाने यापूर्वीच योग्य तो खुलासा केलेला आहे. संघाच्या निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, त्यांची पूर्तता करत असताना आतापर्यंतचा सर्वाधिक दूध दर शेतकऱ्यांना दिल्याचे समाधान वाटत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूरचा २० टक्के जीडीपी वाढणारसरन्यायाधीश भूषण गवई यांच्या माध्यमातून लवकरच खंडपीठही साकारत आहे. यामुळे कोल्हापुरात विकासाचे महाद्वार उघडले जाणार असून, जिल्ह्याचा २० टक्के जीडीपी वाढणार आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करणे, शेंडा पार्क येथील जागेत इमारत, यासह आयटी पार्क निर्माण करण्याची गरज असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.