शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Cabinet expansion: मुश्रीफ, आबीटकर यांना निष्ठेचे फळ; क्षीरसागर, कोरे यांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:00 IST

भाजपची मदार चंद्रकांत पाटील यांच्यावरच : महामंडळावर होणार काही जणांची बोळवण

कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर रविवारी पार पडला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ व तरुण आमदार प्रकाश आबीटकर यांना संधी मिळाली आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडून आले असले, तरी ते मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या निमित्ताने कोल्हापूर तिसरे मंत्रिपद मिळाले. पाटील, मुश्रीफ व आबीटकर यांना त्यांच्या पक्षांनी निष्ठेचे फळ दिले असले, तरी मंत्रिपदासाठी निकराचे प्रयत्न करणारे राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे व चंद्रदीप नरके यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहा पैकी दहा जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला. त्यामुळे मंत्री पदासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, निकाल लागल्यापासून एक-दोन आमदार वगळता सर्वांनीच मंत्रिपदासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती. जनसुराज्य पक्षाचे नेते विनय काेरे हे भाजपसोबत राहिले, त्यात त्यांच्यासह दोन आमदार असल्याने ते पहिल्यापासूनच मंत्री पदाचे दावेदार होते. कॅबिनेट मंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांना संधी मिळाली नाही.हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित होते. शिंदेसेनेमध्ये मंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. राजेश क्षीरसागर, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निकराचे प्रयत्न केले. यामध्ये आबीटकर यांनी मुसंडी मारली.विद्यमान मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा राहील, असे पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्याने इच्छुकांना अडीच वर्षे थांबावे लागणार आहे, तर काहींची महामंडळावर बोळवण होण्याची शक्यता आहे.

शिंदे यांनी शब्द खरा केलागारगोटी येथील भुदरगड तहसीलदार कार्यालय भूमी पूजनासह विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तुम्ही प्रकाश आबीटकर यांना पुन्हा निवडून द्या, मंत्रिपदाचा बॅकलाॅग भरून काढला जाईल, अशी ग्वाही दिली होती. शिंदे यांनी तो शब्द खरा केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.क्षीरसागर यांची कोंडी..विधानसभा निवडणुकीत माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्याचा शब्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. निवडणुकीनंतर आपणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, म्हणून ते देण्यास राजेश क्षीरसागर ही तयार झाले. पण, आता त्यांची कोंडी झाली आहे.‘राधानगरी’ला पहिल्यांदाच संधी, भुदरगडला दोन मंत्री‘राधानगरी’ मतदारसंघाला आतापर्यंत मंत्रिपदाची कधीच संधी मिळाली नव्हती. प्रकाश आबीटकर यांच्या रूपाने पहिल्यांदा संधी मिळाल्याने मतदारसंघात कमालीचा उत्साह पहावयास मिळतो. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील व आबीटकर यांच्या रूपाने भुदरगड तालुक्याला दोन मंत्री मिळाले आहेत.मुश्रीफ नवव्यांदा झाले मंत्रीहसन मुश्रीफ हे ‘कागल’मधून सहाव्यांदा निवडून आले, तर मंत्रिपदाची त्यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. पंचायत समिती सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. काेल्हापूर जिल्हा बँकेचे ते गेली नऊ वर्षे अध्यक्ष आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारHasan Mushrifहसन मुश्रीफPrakash abitkarप्रकाश आबिटकर