शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Cabinet expansion: मुश्रीफ, आबीटकर यांना निष्ठेचे फळ; क्षीरसागर, कोरे यांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:00 IST

भाजपची मदार चंद्रकांत पाटील यांच्यावरच : महामंडळावर होणार काही जणांची बोळवण

कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर रविवारी पार पडला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ व तरुण आमदार प्रकाश आबीटकर यांना संधी मिळाली आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडून आले असले, तरी ते मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या निमित्ताने कोल्हापूर तिसरे मंत्रिपद मिळाले. पाटील, मुश्रीफ व आबीटकर यांना त्यांच्या पक्षांनी निष्ठेचे फळ दिले असले, तरी मंत्रिपदासाठी निकराचे प्रयत्न करणारे राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे व चंद्रदीप नरके यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहा पैकी दहा जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला. त्यामुळे मंत्री पदासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, निकाल लागल्यापासून एक-दोन आमदार वगळता सर्वांनीच मंत्रिपदासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती. जनसुराज्य पक्षाचे नेते विनय काेरे हे भाजपसोबत राहिले, त्यात त्यांच्यासह दोन आमदार असल्याने ते पहिल्यापासूनच मंत्री पदाचे दावेदार होते. कॅबिनेट मंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांना संधी मिळाली नाही.हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित होते. शिंदेसेनेमध्ये मंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. राजेश क्षीरसागर, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निकराचे प्रयत्न केले. यामध्ये आबीटकर यांनी मुसंडी मारली.विद्यमान मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा राहील, असे पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्याने इच्छुकांना अडीच वर्षे थांबावे लागणार आहे, तर काहींची महामंडळावर बोळवण होण्याची शक्यता आहे.

शिंदे यांनी शब्द खरा केलागारगोटी येथील भुदरगड तहसीलदार कार्यालय भूमी पूजनासह विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तुम्ही प्रकाश आबीटकर यांना पुन्हा निवडून द्या, मंत्रिपदाचा बॅकलाॅग भरून काढला जाईल, अशी ग्वाही दिली होती. शिंदे यांनी तो शब्द खरा केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.क्षीरसागर यांची कोंडी..विधानसभा निवडणुकीत माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्याचा शब्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. निवडणुकीनंतर आपणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, म्हणून ते देण्यास राजेश क्षीरसागर ही तयार झाले. पण, आता त्यांची कोंडी झाली आहे.‘राधानगरी’ला पहिल्यांदाच संधी, भुदरगडला दोन मंत्री‘राधानगरी’ मतदारसंघाला आतापर्यंत मंत्रिपदाची कधीच संधी मिळाली नव्हती. प्रकाश आबीटकर यांच्या रूपाने पहिल्यांदा संधी मिळाल्याने मतदारसंघात कमालीचा उत्साह पहावयास मिळतो. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील व आबीटकर यांच्या रूपाने भुदरगड तालुक्याला दोन मंत्री मिळाले आहेत.मुश्रीफ नवव्यांदा झाले मंत्रीहसन मुश्रीफ हे ‘कागल’मधून सहाव्यांदा निवडून आले, तर मंत्रिपदाची त्यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. पंचायत समिती सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. काेल्हापूर जिल्हा बँकेचे ते गेली नऊ वर्षे अध्यक्ष आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारHasan Mushrifहसन मुश्रीफPrakash abitkarप्रकाश आबिटकर