शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

कोल्हापुरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी निदर्शने, रस्ता रोको 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 15:53 IST

भारत बंदचा भाग म्हणून बिंदू चौकात झालेल्या सभेत संपतराव पवार म्हणाले, "आजचा बंद श्रमिकांनी आपल्यातील सर्व भेदभाव विसरून चांगल्या प्रकारे यशस्वी केला. या एकजुटीने भाजप सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यांनी ही दिशा ओळखून गोरगरीब जनतेसाठी पुढील वाटचाल केली पाहिजे."

कोल्हापूर: "भारत बंदसोबत शेतकरी-कामगारांची लढाई संपलेली नाही, ती खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. आजच्या बंदला जनतेने मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने धन्यवाद देतो," असे मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा निमंत्रक माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी म्हटले आहे.

आजच्या बंदला कोल्हापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवून जनतेने प्रतिसाद दिला. इस्पुर्ली, हळदी, बीड फाटा, बीडशेड, कळंबा, सांगरूळ फाटा, कुंभी कासारी, कळे, राधानगरी, आमजाई व्हरवडे, मुदाळ तिट्टा, मुरगूड, भोगावती व्यापार पेठ, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, हलकर्णी फाटा, शिरोली, हातकणंगले, बांबवडे, इचलकरंजी, कुरूंदवाड, जयसिंगपूर, सांगरूळ, उचगाव, रेंदाळ, शिरोळ, चंदगड आदी प्रमुख ठिकाणी निदर्शने, रस्ता रोको करून बंद पाळण्यात आला.

भारत बंदचा भाग म्हणून बिंदू चौकात झालेल्या सभेत संपतराव पवार म्हणाले, "आजचा बंद श्रमिकांनी आपल्यातील सर्व भेदभाव विसरून चांगल्या प्रकारे यशस्वी केला. या एकजुटीने भाजप सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यांनी ही दिशा ओळखून गोरगरीब जनतेसाठी पुढील वाटचाल केली पाहिजे."

उदय नारकर म्हणाले, "आजच्या बंदने मोदी आणि भाजप सरकारला शेतकरी कामगार एकजूट हाच खरा पर्याय आहे, या एकजुटीतूनच भाजपला सत्तेवरून दूर करणारी शक्ती उभी रहात आहे."

अतुल दिघे म्हणाले, "शेतकरी वाचला तरच लोकशाही वाचेल, आणि कामगार जगला तरच देश जगेल, हे आजच्या बंदने दाखवून दिले आहे."

जनता दलाचे रवी जाधव म्हणाले, "तीन काळे शेती कायदे आणि कामगारविरोधी चार संहिता रद्द होत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल पिवडे म्हणाल्या, "या लढ्यात महिला आघाडीवर राहतील. त्या महागाई विरोधात सतत लढत राहतील.

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार,  काँग्रेसचे गुलाबराव घोरपडे, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, प्रा. डी. एन. पाटील, सुटाचे कार्यवाह डॉ. टी. एस. पाटील, सीटूचे विवेक गोडसे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, मावळा युवक ग्रूपचे उमेश पोवार,  बागल विद्यापीठाचे अशोकराव साळोखे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आयटकचे नेते दिलीप पोवार, किसान सभेचे राज्य सचिव  नामदेव गावडे, शेकापचे बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, सरदार पाटील, रिपब्लिकन पक्ष (कवाडे) चे जिल्हा अध्यक्ष दगडू भास्कर, जनता दलाचे राज्य चिटणीस शिवाजीराव परूळेकर, वसंतराव पाटील, सीटूचे  चंद्रकांत यादव, माकपचे शंकर काटाळे, मल्हार सेनेचे बबन रानगे, शेकाप महिला आघाडीच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष वैशाली सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहिरी पोवाड्यांनी झाली. प्रास्ताविक शेकापचे शहर चिटणीस बाबुराव कदम यांनी केले.आयटकचे बाळासाहेब बर्गे यांनी आभार मानले.  सूत्रसंचालन  संभाजीराव जगदाळे यांनी केले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmers Protestशेतकरी आंदोलनkolhapurकोल्हापूर