शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:50 IST

कोणतेही राजकीय उणेदुणे न काढता गडकरी यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मांडलेल्या व्हिजनची नागरिकांमध्ये चर्चा

कोल्हापूर : कधी नव्हे ते कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी पूरक ठरणाऱ्या घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळणीमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी बास्टेक ब्रिजच्या पायाभरणी समारंभात केल्या आहेत. खा. धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमामध्ये या घोषणा झाल्याने साहजिकच गडकरींच्या घोषणा केवळ आश्वासने ठरू नयेत, यासाठी आता महाडिक यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.मुळात बास्केट ब्रिज हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात टीकेचा विषय झाला होता. खा. संजय मंडलिक यांनी त्याची कबुलीही याच कार्यक्रमात दिली. परंतु, महाडिक यांनी या टीकेला उत्तर देताना बास्केट ब्रिजचे भूमीपूजन दणक्यात केले. गडकरी यांनीदेखील पारंपरिक राजकीय भाषण न करता केवळ विकासविषयक मांडणी केली.हातकणंगले येथील भव्य लॉजिस्टिक पार्क असो किंवा कोल्हापूर- सांगली रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण असो. सांगली रस्त्याने नागरिकांना फार त्रास दिला आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर उत्तम दर्जाचा होणे काळाची गरज आहे. ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पाडतो म्हणाला, तरी पडणार नाही या गडकरींच्या वाक्यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी त्याच आत्मविश्वासाने या रस्त्याचे काम होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी तीन मोठ्या उड्डाणपुलांची मागणी केली आहे. यामध्ये शिवाजी पूल ते सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉनर्र, दाभोळकर चौक, ताराराणी चौक ते मार्केट यार्ड असा पहिला मार्ग आहे. यामुळे पुण्या-मुंबईसह बाहेरून येणारी वाहने थेट उड्डाणपुलावरून पन्हाळा, रत्नागिरी मार्गावर जाऊ शकतील. यासाठी ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.दुसरा उड्डाणपूल फुलेवाडी नाका ते शिवाजी विद्यापीठमार्गे राष्ट्रीय महामार्ग असा मागणी करण्यात आला असून फुलेवाडी चौक, रिंगरोड, क्रशर चौक, संभाजीनगर स्टॅंड, कळंबा फिल्टर हाऊस, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठासमोरून राष्ट्रीय महामार्गाकडे असा आहे. यासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर जुना राष्ट्रीय महामार्ग शिये ते भगवा चौक, पोलिस मुख्यालय, धैर्यप्रसाद चौक, ताराराणी चौक, आर्मी कॅम्प, शिवाजी विद्यापीठ ते उजळाईवाडी राष्ट्रीय महामार्ग असा तिसरा ४०० कोटींचा उड्डाणपूल महाडिक यांनी सूचवला आहे.

एकूण २ हजार कोटींची मागणीहे तीन उड्डाणपूल आणि शहरातील रस्ते यासाठी सीआरआयएफ रस्ते विकास निधीसह एकूण २ हजार कोटी रुपयांची मागणी महाडिक यांनी गडकरी यांच्याकडे केली असून कोल्हापूर महापालिकेला ७५ इलेक्ट्रिकल बसेसचीही मागणी केली आहे. याबाबत गडकरी सकारात्मक दिसले आहेत. मात्र, त्यासाठी महाडिक यांना पाठपुरावा करावा लागणार असून राज्य शासनाचा वाटा देण्यासही तयार करावे लागणार आहे.

गडकरींच्या भाषणाची चर्चाकोणतेही राजकीय उणेदुणे न काढता गडकरी यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मांडलेल्या व्हिजनची नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. कोल्हापूरबद्दल छातीठोकपणे ‘देतो’ असे सांगणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे. कारण शिवाजी विद्यापीठापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंत जाहीर झालेले पैसेही पदरात पडलेले नाहीत. अशा परिस्थितीत गडकरींचे भाषण वास्तवात उतरावे, अशी कोल्हापूरवासियांची अपेक्षा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकNitin Gadkariनितीन गडकरी