शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अशोक चव्हाण म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. चव्हाण यांना कसलेही स्वातंत्र्य नाही, ते आता पोपटासारखे बोलत आहेत; पण त्यांचा पिंजऱ्यातील पोपट झाला आहे, अशीही टिपणी त्यांनी केली.

आरक्षण मर्यादेवरून मंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी हात-पाय बांधून तलवार हाती दिली तर लढणार कसे, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडताना त्यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवावे अशीही मागणी केली. चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद भूषविलेला पुन्हा कमी दर्जाचे खाते सांभाळताना दिसत आहे. हे म्हणजे तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखे आहे. त्यांची वक्तव्ये पाहता त्यांच्यावर आता वेड्याच्या रुग्णालयात जायची वेळ आली आहे. तुम्ही फार हुशार आहात, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, दोन वर्षे काय करीत होता, अशी टिपणीही खोत यांनी केली.

खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण करंट्या महाविकास सरकारमुळे रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात योग्यरीत्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांनाही सोबत घेतले नाही. वकिलांना मार्गदर्शन केले नाही. गायकवाड समितीतील महत्त्वाचे पुरावे जोडले नाहीत. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले; पण राज्य सरकार का गेले नाही. यावरून सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट होते.

----------------------------------------

तेव्हा तुमचे हात-पाय बांधले होते का

खोत म्हणाले, तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर होतात, तेव्हा तुमचे कोणी हात-पाय बांधले होते का. ज्यांना आरक्षण नको त्या मराठा नेत्यांनी खुराड्यात बसून अंडी घालावीत. हे सरकार मराठ्यांचे शत्रू आहे. सारथी संस्था या सरकारने बंद पाडली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळही राज्य नियोजन मंडळात विलीन केले. नाव मराठ्यांचे घेऊन सरदारकी भोगणारे हे सगळे चोराच्या आळंदीला जायला निघाले आहेत.