शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साखर विक्रीचे किमान दर ठरणार-: साखर उद्योग सरकारी नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:53 IST

घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकार आणखी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकार आणखी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. साखरेचा शिलकी साठा (बफर स्टॉक) करणे, इथेनॉलचे दर वाढविणे, दर महिन्याला साखर खुली करण्याची यंत्रणा निर्माण करणे, कारखान्यांनी साखरेची विक्री करताना तिचा राज्यनिहाय किमान दर ठरविणे यासारख्या उपायांचा त्यामध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते. असे झाल्यास अंशत: नियंत्रणमुक्त असलेला साखर उद्योग पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली येणार आहे.

साखर उद्योग २०१३ पूर्वी सरकारच्या नियंत्रणाखाली होता. त्यावेळी लेव्ही साखरेचा कोटा केंद्राकडून ठरवून देण्यासह विविध निर्बंध होते. हा उद्योग अंशत: नियंत्रणमुक्त केल्यानंतर एफआरपी वगळता बहुतांशी निर्बंध शिथिल केले आहेत. अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्राने २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. कारखान्यांना त्याचा कोटा ठरवून दिला आहे. तसेच ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल ५५ रुपये अनुदान देऊन कारखान्यांवरील एफआरपीचा तेवढाच भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

एवढे करूनही बाजारातील साखरेचे दर २४५० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. ते वाढायला तयार नाहीत. दर वाढले नाहीत तर कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट होणार आहे. २० हजार कोटी रुपये ऊस उत्पादकांचे एफआरपीपोटी कारखान्यांकडे देणे आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणखी उपाययोजना आवश्यक आहेत. त्याचाच भाग म्हणून साखरेचा बफर स्टॉक करणे, इथेनॉलचे दर वाढविणे, साखर विक्रीचा किमान दर ठरविणे, यासारख्या उपाययोजना सरकारच्या विचाराधीन आहेत.पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणार!केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय बहुइंधन धोरण २०१८ मंजूर केले आहे. त्यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी कोट्यवधी रुपयांची खासगी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. हे इथेनॉल दुसऱ्या पिढीतील म्हणजे अपारंपरिक कृषी आधारित कच्च्या मालापासून तयार करणार आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत पेट्रोलियम पदार्थांमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याला केंद्र अनुमती देण्याची शक्यता आहे. सध्या पाच टक्के इथेनॉल मिसळले जाते.३0 लाख टन साखरेचा बफर स्टॉक?यंदा मात्र साखरेचे ३१० लाख टन उत्पादन झाले आहे. आरंभीची शिल्लक साखर ४० लाख टन होती. देशाची मागणी २५० लाख टन असल्यामुळे सुमारे एक लाख टन साखर अतिरिक्त आहे. यातील पुढील हंगामापर्यंत ४० लाख टन साखरेची गरज गृहित धरली, तर ६० लाख टन साखरेची निर्र्गत होणे आवश्यक आहे.यातील २० लाख टन साखर देशभरातील व्यापाºयांकडे असेल, असे गृहित धरले, तर किमान ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाgovernment schemeसरकारी योजना