शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साखर विक्रीचे किमान दर ठरणार-: साखर उद्योग सरकारी नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:53 IST

घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकार आणखी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकार आणखी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. साखरेचा शिलकी साठा (बफर स्टॉक) करणे, इथेनॉलचे दर वाढविणे, दर महिन्याला साखर खुली करण्याची यंत्रणा निर्माण करणे, कारखान्यांनी साखरेची विक्री करताना तिचा राज्यनिहाय किमान दर ठरविणे यासारख्या उपायांचा त्यामध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते. असे झाल्यास अंशत: नियंत्रणमुक्त असलेला साखर उद्योग पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली येणार आहे.

साखर उद्योग २०१३ पूर्वी सरकारच्या नियंत्रणाखाली होता. त्यावेळी लेव्ही साखरेचा कोटा केंद्राकडून ठरवून देण्यासह विविध निर्बंध होते. हा उद्योग अंशत: नियंत्रणमुक्त केल्यानंतर एफआरपी वगळता बहुतांशी निर्बंध शिथिल केले आहेत. अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्राने २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. कारखान्यांना त्याचा कोटा ठरवून दिला आहे. तसेच ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल ५५ रुपये अनुदान देऊन कारखान्यांवरील एफआरपीचा तेवढाच भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

एवढे करूनही बाजारातील साखरेचे दर २४५० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. ते वाढायला तयार नाहीत. दर वाढले नाहीत तर कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट होणार आहे. २० हजार कोटी रुपये ऊस उत्पादकांचे एफआरपीपोटी कारखान्यांकडे देणे आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणखी उपाययोजना आवश्यक आहेत. त्याचाच भाग म्हणून साखरेचा बफर स्टॉक करणे, इथेनॉलचे दर वाढविणे, साखर विक्रीचा किमान दर ठरविणे, यासारख्या उपाययोजना सरकारच्या विचाराधीन आहेत.पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणार!केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय बहुइंधन धोरण २०१८ मंजूर केले आहे. त्यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी कोट्यवधी रुपयांची खासगी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. हे इथेनॉल दुसऱ्या पिढीतील म्हणजे अपारंपरिक कृषी आधारित कच्च्या मालापासून तयार करणार आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत पेट्रोलियम पदार्थांमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याला केंद्र अनुमती देण्याची शक्यता आहे. सध्या पाच टक्के इथेनॉल मिसळले जाते.३0 लाख टन साखरेचा बफर स्टॉक?यंदा मात्र साखरेचे ३१० लाख टन उत्पादन झाले आहे. आरंभीची शिल्लक साखर ४० लाख टन होती. देशाची मागणी २५० लाख टन असल्यामुळे सुमारे एक लाख टन साखर अतिरिक्त आहे. यातील पुढील हंगामापर्यंत ४० लाख टन साखरेची गरज गृहित धरली, तर ६० लाख टन साखरेची निर्र्गत होणे आवश्यक आहे.यातील २० लाख टन साखर देशभरातील व्यापाºयांकडे असेल, असे गृहित धरले, तर किमान ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाgovernment schemeसरकारी योजना