शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
2
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
3
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
4
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
5
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
6
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
7
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
8
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
9
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
10
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
11
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
12
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
13
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
14
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
15
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
16
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
17
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
18
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
19
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
20
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा किमान दर ३३०० रुपये, केंद्र सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:17 IST

खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा दिलासा मानला जात असला तरी वाढीव ह्यएफआरपीह्णमुळे साखरेचा किमान दर ३६०० रुपये करावा, यावर साखर कारखानदार आग्रही आहेत.

ठळक मुद्दे साखरेचा किमान दर ३३०० रुपये, केंद्र सरकारचा निर्णयप्रतिक्विंटल ३६०० रूपयांसाठी साखर कारखानदार आग्रही

कोल्हापूर : खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा दिलासा मानला जात असला तरी वाढीव ह्यएफआरपीह्णमुळे साखरेचा किमान दर ३६०० रुपये करावा, यावर साखर कारखानदार आग्रही आहेत.आंतराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी आणि देशांतर्गत बाजारपेठेत उठाव नसल्याने गेली दोन वर्षे साखर उद्योगासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. दोन वर्षांची साखर गोडावूनमध्ये पडून राहिल्याने आर्थिक फटका बसत असून शेतकऱ्यांची एफआरपी देता आलेली नाही; तसेच अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करावी, या मागणीचा रेटा गेली वर्षभर सुरू आहे.

खुल्या बाजारात साखरेचा किमान दर बारीक साखरेसाठी प्रतिक्विंटल ३४५०, तर मध्यम साखरेसाठी ३६५० रुपये असावा, असे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू होते. याबाबत नितीन आयोगाच्या टास्क फोर्सने प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर चर्चा होऊन अखेर शिक्कामोर्तब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.साखरेच्या दरात प्रतिकिलो पाच ते सहा रुपये वाढ झाली तर सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फारसा फटका बसत नाही. मात्र क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये कारखान्यांना मिळाले तर तेवढी तरलता तयार होऊन कारखान्यांना फायदा होऊ शकतो.देशात २२ हजार कोटी एफआरपी थकीतसाखरेचा दर आणि एफआरपी यांचा ताळमेळ न बसल्याने सर्वच राज्यांत उसाची एफआरपी थकीत राहिली आहे. देशातील शेतकऱ्यांची २२ हजार कोटी एफआरपी थकीत आहे. त्यात एकट्या उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे १७ हजार कोटी अडकून पडले आहेत.पगार, महागाई भत्त्यावर साखरेचा दर द्याउसाला देण्यात येणारी एफआरपी, साखर कामगारांचे पगार, महागाई भत्ता यांवर आधारित साखरेचा दर निश्चित करावा, अशी मागणी राज्य साखर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

गेली तीन वर्षे साखर कारखानदारी तोट्यात आहे. बँका नवीन कर्जे देत नसल्याने हा उद्योग चालवायचा कसा? या पेचात आम्ही आहोत. यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे साखरेचा किमान दर प्रतीनुसार ३४५० व ३६५० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्राने ३३०० रुपये दर केला. त्यातून कारखानदारी वाचणार नाही.- जयप्रकाश दांडेगावकर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर