शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

उसापेक्षा दूध व्यवसायानेच वाढवली शेतकऱ्यांची पत, दुधातून वर्षाला 'इतके' कोटी शेतकऱ्यांच्या हातात

By राजाराम लोंढे | Updated: December 27, 2023 12:42 IST

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे ...

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. दुधामुळेच शेतकऱ्याची बाजारात पत निर्माण झाली, दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना बळकटी कशी दिली, याविषयी..राजाराम लोंढेकोल्हापूर : शेतीला जोडव्यवसाय म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने शेतीला मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे ऊस उत्पादन वर्षाला १.४० कोटी टन असून, त्यातून सरासरी सव्वावर्षाने ३९१५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडतात. मात्र, संघाकडून मिळणारे रोजचा दूध दर, दिवाळीचा दूध फरक, संस्थांकडून मिळणारा रिबेट या माध्यमातून वर्षाला तब्बल ३२७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात येतात. विशेेष म्हणजे दुधामुळेच बाजारात शेतकऱ्यांची पत निर्माण झाली आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. जशी साखर कारखान्यांची संख्या वाढत गेली, तसे उसाचे उत्पादन वाढले. महाराष्ट्रात चांगल्या रिकव्हरीचे ऊस उत्पादन कोल्हापुरातच होते. याला येथील कसदार जमीन, पाणी व मेहनती शेतकरी कारणीभूत आहे. इतर पिके कमी होत जाऊन ऊस पिकाकडे शेतकरी वळला. त्यामुळेच एकूण पेरक्षेत्रापैकी १.८६ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे.

ऊस हे नगदी पीक असले तरी त्याच्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक, साखर कारखान्यांकडून ऊस तोड होऊन बिले जमा होण्यास सव्वा ते दीड वर्षाचा लागणारा कालावधी व एकूण उत्पादन खर्च वजा जाता, हातात मिळणारे पैसे याचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे शेतीला भाजीपाला व दूध व्यवसाय जोडधंदा म्हणून पुढे आला. अस्थिर बाजारभाव व लहरी निसर्गामुळे भाजीपाला अडचणीत आला. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्याकडेही पाठ फिरवत दूध व्यवसायाकडे वळले. शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसाय गेल्या पाच-दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय बनला आहे. ऊस व दूध उत्पादन, त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे पैसे पाहिले तर उसाला दुधाने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. एकूणच दुधामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर सुधारला आहे.

लागणीपासून तोडणीपर्यंत पैसे पेरावे लागतातउसाची लागण करण्यापासून त्याची तोड करेपर्यंत शेतकऱ्याला पैसे पेरावे लागतात. मशागत, बियाणे खरेदी, लागण, पाणी बिल, भांगलण, कीटक व तण नाशके, ऊस तोडीसाठी झट्याझोंब्या, तोडणीसाठी पैसे हे सगळे केल्यानंतर कारखाना महिना-दीड महिन्याने पैसे जमा करणार. यामुळे शेतकऱ्याचे उसावरील अर्थकारण विस्कटले आहे.

ऊस शेती न परवडण्यामागील कारणे :

  • सततच्या पिकांमुळे जमिनीची उत्पादकता घटली आहे.
  • पिकाऊ क्षेत्र तेवढेच; पण कुटुंब विभागल्याने जमिनीचे तुकडे पडले
  • रासायनिक खतांच्या दरात झालेली भरमसाठ वाढ
  • मशागत, शेती पंपाच्या विजेच्या दरात झालेली वाढ
  • मजुरांची वानवा
  • उसाचे कांडे जमिनीत लावल्यानंतर सव्वा ते दीड वर्षाने पैसे हातात
टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसmilkदूधFarmerशेतकरी