शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उसापेक्षा दूध व्यवसायानेच वाढवली शेतकऱ्यांची पत, दुधातून वर्षाला 'इतके' कोटी शेतकऱ्यांच्या हातात

By राजाराम लोंढे | Updated: December 27, 2023 12:42 IST

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे ...

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. दुधामुळेच शेतकऱ्याची बाजारात पत निर्माण झाली, दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना बळकटी कशी दिली, याविषयी..राजाराम लोंढेकोल्हापूर : शेतीला जोडव्यवसाय म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने शेतीला मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे ऊस उत्पादन वर्षाला १.४० कोटी टन असून, त्यातून सरासरी सव्वावर्षाने ३९१५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडतात. मात्र, संघाकडून मिळणारे रोजचा दूध दर, दिवाळीचा दूध फरक, संस्थांकडून मिळणारा रिबेट या माध्यमातून वर्षाला तब्बल ३२७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात येतात. विशेेष म्हणजे दुधामुळेच बाजारात शेतकऱ्यांची पत निर्माण झाली आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. जशी साखर कारखान्यांची संख्या वाढत गेली, तसे उसाचे उत्पादन वाढले. महाराष्ट्रात चांगल्या रिकव्हरीचे ऊस उत्पादन कोल्हापुरातच होते. याला येथील कसदार जमीन, पाणी व मेहनती शेतकरी कारणीभूत आहे. इतर पिके कमी होत जाऊन ऊस पिकाकडे शेतकरी वळला. त्यामुळेच एकूण पेरक्षेत्रापैकी १.८६ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे.

ऊस हे नगदी पीक असले तरी त्याच्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक, साखर कारखान्यांकडून ऊस तोड होऊन बिले जमा होण्यास सव्वा ते दीड वर्षाचा लागणारा कालावधी व एकूण उत्पादन खर्च वजा जाता, हातात मिळणारे पैसे याचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे शेतीला भाजीपाला व दूध व्यवसाय जोडधंदा म्हणून पुढे आला. अस्थिर बाजारभाव व लहरी निसर्गामुळे भाजीपाला अडचणीत आला. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्याकडेही पाठ फिरवत दूध व्यवसायाकडे वळले. शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसाय गेल्या पाच-दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय बनला आहे. ऊस व दूध उत्पादन, त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे पैसे पाहिले तर उसाला दुधाने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. एकूणच दुधामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर सुधारला आहे.

लागणीपासून तोडणीपर्यंत पैसे पेरावे लागतातउसाची लागण करण्यापासून त्याची तोड करेपर्यंत शेतकऱ्याला पैसे पेरावे लागतात. मशागत, बियाणे खरेदी, लागण, पाणी बिल, भांगलण, कीटक व तण नाशके, ऊस तोडीसाठी झट्याझोंब्या, तोडणीसाठी पैसे हे सगळे केल्यानंतर कारखाना महिना-दीड महिन्याने पैसे जमा करणार. यामुळे शेतकऱ्याचे उसावरील अर्थकारण विस्कटले आहे.

ऊस शेती न परवडण्यामागील कारणे :

  • सततच्या पिकांमुळे जमिनीची उत्पादकता घटली आहे.
  • पिकाऊ क्षेत्र तेवढेच; पण कुटुंब विभागल्याने जमिनीचे तुकडे पडले
  • रासायनिक खतांच्या दरात झालेली भरमसाठ वाढ
  • मशागत, शेती पंपाच्या विजेच्या दरात झालेली वाढ
  • मजुरांची वानवा
  • उसाचे कांडे जमिनीत लावल्यानंतर सव्वा ते दीड वर्षाने पैसे हातात
टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसmilkदूधFarmerशेतकरी