शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाजाचा झुंजार कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पुरोगामी चळवळीत सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशीच दादासाहेब जगताप यांची ओळख आहे. बहुजन समाज ...

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पुरोगामी चळवळीत सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशीच दादासाहेब जगताप यांची ओळख आहे. बहुजन समाज जातीपातीच्या उतरंडीमधून बाहेर पडून त्याने फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा जोपासली पाहिजे, यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत राहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून ते अनेक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात व्हायला हवे, यासाठी धडपड करणारी ती व्यक्ती आहे. त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथीदिवशी २ जानेवारी १९६९ला ‘बहुजन समाज’ साप्ताहिकाचे प्रकाशन केले व या साप्ताहिकाचे सतत १९ वर्षे संस्थापक संपादक म्हणून काम केले. या साप्ताहिकात भाई माधवराव बागल; तत्कालीन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पी. बी. सावंत, बापूसाहेब घोरपडे, वीर उत्तमराव मोहिते, प्रा. मा. म. देशमुख व भाई केशवराव घोंगडे यांनी लेखन केले. या साप्ताहिकात ‘गोडसे : हुतात्मा की भुुतात्मा’ ही ३२ लेखांची लेखमालिका पी. बी. पोवार यांनी प्रसिद्ध केली. त्यावेळी महाराष्ट्रात फार मोठी खळबळ उडाली होती.

बहुजन समाजाला जागे करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या (२७ नोव्हेंबर १९७०) पुण्यतिथीला ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच’ची स्थापना केली. संघटनेच्या अध्यक्षपदी जगताप यांची निवड झाली व ज्येष्ठ पत्रकार शांताराम बोकील यांची उपाध्यक्ष, चिटणीस म्हणून माजी महापौर भिकशेठ पाटील यांची निवड झाली होती.. या विचार मंच संघटनेतर्फे बहुजन समाज विचार जागरण सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जगताप यांना दोन महिने शिक्षा झाली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या गव्हर्निंग कौन्सिल कार्यकारिणीवर त्यांची संचालक म्हणून निवड झाली. त्यावेळी प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संस्थेत न्यू कॉलेजची स्थापना करावी म्हणून जगताप यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकरराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन करावे म्हणून जगताप व भाई शामराव माळी यांनी सायकलवरून फिरून प्रमुख नागरिकांच्या सह्या घेतल्या. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा बोलावून ठराव पास केला आणि शिक्षणतज्ज्ञ सी. रा. तावडे, आमदार पी. बी. साळोखे, ‘पुढारी’चे संपादक ग. गो. जाधव, नगराध्यक्ष बी. बी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. मुंबई शहरातील क्रॉफर्ड मार्केटला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यातही त्यांचा वाटा होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकासमोरील पुतळा व्हावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

महापालिका व्हावी यासाठी...

सीमाभाग महाराष्ट्राला मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन चळवळ केली. कोल्हापूर शहरात नगरपालिका होती. कोल्हापूर शहर मोठे शहर असताना महानगरपालिका नाही, यासाठी जगताप व भाई दिनकरराव पाटील यांनी महानगरपालिका करावी म्हणून त्यावेळचे नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांच्यामार्फत प्रयत्न केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसचे काम निष्ठेने केले. ही पक्षीय बांधिलकी त्यांनी आजही जपली आहे.

फोटो : २९०४२०२१-कोल-दादासाहेब जगताप-वाढदिवस