शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

ऊस टोळ्यांना उचल देण्याची पद्धत बंद व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठवाड्यातील ऊसटोळ्यांकडून साखर कारखानदारीस अलीकडील काही वर्षांत अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. उचल घेऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठवाड्यातील ऊसटोळ्यांकडून साखर कारखानदारीस अलीकडील काही वर्षांत अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. उचल घेऊन तोडणीसाठीच न येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे यापुढे सहकारी व खासगी कारखान्यांनी उचल देण्याची पद्धतच सामूहिकरीत्या बंद करावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी एकमुखी मागणी गुुरुवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत करण्यात आली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हुपरी येथील जवाहर कारखान्याच्या मुख्यालयात ही बैठक झाली. बैठकीत यंदा ऊस जास्त असल्याने हंगाम मार्चअखेरपर्यंत लांबणार असून, राज्य व केंद्र सरकारकडील कारखान्यांचे आर्थिक प्रश्न सोडविले नाहीत तर एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

आयुक्त गायकवाड दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी हंगामाचा आढावा घेतला. त्यामध्ये कार्यकारी संचालक सर्वश्री मनोहर जोशी (जवाहर), पी. जी. मेढे (साखरतज्ज्ञ), शरद कदम (सोनहिरा-सांगली), माहुली (राजारामबापू, वाळवा), एम. व्ही. पाटील (दत्त, शिरोळ), एन. वाय. पाटील (मंडलिक), जितेंद्र चव्हाण (शाहू), उदय पाटील (गुरुदत्त), आर. डी. देसाई (बिद्री), अशोक पाटील (कुंभी-कासारी), के. एस. चौगले (भोगावती), जयदीप पाटील (डी. वाय.) आदींनी चर्चेत भाग घेतला. मेढे यांनी केंद्र सरकारकडील प्रश्र्नांची सुरुवातीलाच विस्ताराने मांडणी केली.

ऊसटोळ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल देताना कारखान्यांची फारच ओढाताण होते तरीही उचल दिली जाते आणि नंतर टोळ्याच येत नाहीत. त्यांच्याकडील पैसे वसूल करणे हे देखील जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे काम झाल्यावर पगार या धोरणानुसार कुणीच उचल न देता सर्वांनीच हंगाम सुरू झाल्यावर दर दहा दिवसाला त्यांची बिले देण्याची पद्धत सुरू केली पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला. त्यासाठी साखर आयुक्तालयाने पुढाकार घ्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त झाली.

--------------------------

पुढील महिन्यात बैठक

देशातील साखर आयुक्तांची केंद्र सरकारने बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत प्रलंबित प्रश्नांबाबत व येणे रकमेबाबत पाठपुरावा करू, असे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. मराठवाड्यातील तरुण आता शिक्षणास प्राधान्य देत आहे. त्यामुळे यापुढील काळात टोळ्या कमीच होणार असल्याने यांत्रिकीकरणावर भर द्या, असेही त्यांनी सुचविले.

--------------------------

चर्चेतील महत्त्वाचे प्रश्न

१.राज्य सरकारने कर्जावरील व्याजाची रक्कम अदा करावी

२.केंद्र सरकारडील बफर स्टॉक व निर्यात अनुदानाचे सुमारे १३०० कोटी रुपये येणेबाकी आहेत. ती रक्कम तातडीने मिळावी

३.यंदा साखर उत्पादन दुप्पट होणार असल्याने यावर्षीही ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी मिळावी

४.साखरेची किमान खरेदी किंमत ३८ करावी. इस्मा व साखर संघानेही तशी मागणी केली आहे.

५.साखरेचा ४० लाखांचा बफर स्टॉक यंदाही करावा