शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

ग्रामीण भागातही नळांना बसणार मीटर

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

शासनाच्या निधीतूनच मीटर मिळणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्याला वरदान ठरलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेनंतर आता तालुक्यातील नृसिंहवाडी, शिरढोण व टाकवडे या गावांमध्ये नळांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या तीन गावांतील नळ पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प शासनाच्या निधीतूनच राबविला जाणार आहे. नागरी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय पेयजल योजना प्रामुख्याने ग्रामीण भागात पुढे आली आहे. शुद्धिकरणासह पाणी नागरिकांना मिळावे, हा उदात्त हेतू पुढे घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी, शिवाय गावाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने शासनाने आणखी एक विकासात्मक पाऊल पुढे टाकले आहे. नळांना मीटर बसविण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे या गावांत प्रथम नळांना मीटर बसविण्याचा ग्रामीण भागातील एकमेव प्रकल्प राबविला जाणार आहे. नृसिंहवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे, तर शिरढोण-टाकवडे येथेही पेयजल योजनेचे काम सुरू आहे. या तीनही गावांत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नळांना मीटर बसविण्यात येणार आहे. शासनानेच याबाबत धोरण निश्चित केले आहे. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. जयसिंगपूर नगरपालिकेनंतर शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नळांना मीटर बसविण्याचा पहिलाच प्रकल्प नावारूपास येणार आहे. शासनाची संकल्पनाशासनाच्या पेयजल योजनेमुळे शुद्ध व मुबलक पाणी नागरिकांना मिळणार आहे. योजना मंजूर करीत असतानाच नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे या गावांतील नळांना मीटर बसविण्याच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नळ ग्राहक तेथे मीटर अशी संकल्पना निश्चित राबविली जाणार असून, यामुळे पाण्याचा योग्य वापर नागरिकांना करणे गरजेचे बनणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.