शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

मीटर नसणारे नळ कनेक्शन होणार बंद

By admin | Updated: March 9, 2017 23:52 IST

जयसिंगपूर पालिकेची मोहीम : नळधारकांची मानसिकता बदलण्याची गरज; जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर

संदीप बावचे --जयसिंगपूर शहरात ७९०० ग्राहकांपैकी यातील ९२ टक्के नळधारकांनी आतापर्यंत नळांना मीटर बसविली आहेत. साडेचार वर्षांपूर्वी जयसिंगपूर पालिकेने शहरात नळांना मीटर बसविण्याची मोहीम सुरू केली होती. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर, अशा या योजनेत शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजूनही आठ टक्के नळधारकांनी नळाला मीटर न बसविल्यामुळे येत्या एप्रिलपासून असे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम पालिका राबविणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी. शिवाय शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने नगरपालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा मीटर पद्धतीने करण्याची अंमलबजावणी १ जूलै २०१२ पासून सुरू झाली होती. सन २०१२-१३ मध्ये ६० टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने ही मोहीम राबविण्यात आली. शहराचा वाढता विस्तार व पाण्याची मुबलकता वाढू लागल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली़ शहरवासीयांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरेशा समान दाबाने देण्याकरिता शहरात नळांना मीटर बसविण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. नळांना मीटर बसविण्याबाबत शहरवासियांत जनजागृती मोहीम राबवून ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथेही टप्प्याटप्प्यांने मीटर बसविण्यात आले. शहरात ७९०० नळ कनेक्शनधारक असून, यापैकी ९२ टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविलेली आहेत. मात्र, उर्वरित नळ कनेक्शनधारकांनी नळाला मीटर बसविले नाहीत. तसेच जे नळधारक नळांना मोटर लावतात, अशा नळधारकांचे येत्या एप्रिलपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा प्रशासनाने दिली. त्यामुळे ज्यांनी मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे़ मोहीम तीव्र करणारपाणी करासाठी ‘कनेक्शन बंद’ची मोहीम पालिका राबवित आहे. प्रशासनाकडून पाणीपट्टी, थकबाकी वसुली अंतर्गत वर्षानुवर्षे जे नळ कनेक्शनधारक पाणीकर भरत नाहीत, अशा सुमारे तीनशेहून अधिक नळधारकांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने केली आहे. कर न भरणाऱ्यांना नोटिसा बजावून ही मोहीम राबविण्यात आली असून, १५ मार्चनंतर ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी प्रयत्न.शहरात आतापर्यंत ९२ टक्के नळधारकांनी नळाला मीटर बसविले आहेत. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर याबाबत टप्पे ठेवण्यात आले आहेत.शहराचा पाणीपुरवठा हायटेक करण्याच्या दृष्टिकोनातून नळ पाणीपुरवठा जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धीकरणाचे नूतनीकरण याचबरोबर नवीन पाण्याची टाकी, असे पालिकेचे धोरण आहे.