शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मीटर नसणारे नळ कनेक्शन होणार बंद

By admin | Updated: March 9, 2017 23:52 IST

जयसिंगपूर पालिकेची मोहीम : नळधारकांची मानसिकता बदलण्याची गरज; जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर

संदीप बावचे --जयसिंगपूर शहरात ७९०० ग्राहकांपैकी यातील ९२ टक्के नळधारकांनी आतापर्यंत नळांना मीटर बसविली आहेत. साडेचार वर्षांपूर्वी जयसिंगपूर पालिकेने शहरात नळांना मीटर बसविण्याची मोहीम सुरू केली होती. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर, अशा या योजनेत शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजूनही आठ टक्के नळधारकांनी नळाला मीटर न बसविल्यामुळे येत्या एप्रिलपासून असे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम पालिका राबविणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी. शिवाय शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने नगरपालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा मीटर पद्धतीने करण्याची अंमलबजावणी १ जूलै २०१२ पासून सुरू झाली होती. सन २०१२-१३ मध्ये ६० टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने ही मोहीम राबविण्यात आली. शहराचा वाढता विस्तार व पाण्याची मुबलकता वाढू लागल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली़ शहरवासीयांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरेशा समान दाबाने देण्याकरिता शहरात नळांना मीटर बसविण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. नळांना मीटर बसविण्याबाबत शहरवासियांत जनजागृती मोहीम राबवून ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथेही टप्प्याटप्प्यांने मीटर बसविण्यात आले. शहरात ७९०० नळ कनेक्शनधारक असून, यापैकी ९२ टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविलेली आहेत. मात्र, उर्वरित नळ कनेक्शनधारकांनी नळाला मीटर बसविले नाहीत. तसेच जे नळधारक नळांना मोटर लावतात, अशा नळधारकांचे येत्या एप्रिलपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा प्रशासनाने दिली. त्यामुळे ज्यांनी मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे़ मोहीम तीव्र करणारपाणी करासाठी ‘कनेक्शन बंद’ची मोहीम पालिका राबवित आहे. प्रशासनाकडून पाणीपट्टी, थकबाकी वसुली अंतर्गत वर्षानुवर्षे जे नळ कनेक्शनधारक पाणीकर भरत नाहीत, अशा सुमारे तीनशेहून अधिक नळधारकांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने केली आहे. कर न भरणाऱ्यांना नोटिसा बजावून ही मोहीम राबविण्यात आली असून, १५ मार्चनंतर ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी प्रयत्न.शहरात आतापर्यंत ९२ टक्के नळधारकांनी नळाला मीटर बसविले आहेत. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर याबाबत टप्पे ठेवण्यात आले आहेत.शहराचा पाणीपुरवठा हायटेक करण्याच्या दृष्टिकोनातून नळ पाणीपुरवठा जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धीकरणाचे नूतनीकरण याचबरोबर नवीन पाण्याची टाकी, असे पालिकेचे धोरण आहे.