शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

शिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:53 IST

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करारविद्यार्थ्यांच्या कल्पनांचे उद्योजकीय परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, डॉ. एस. बी. काळे, डॉ. एस. डी. डेळेकर, समृद्धी फौंडेशनच्या संस्थापक सहसंचालक रेणुका पाटील आणि ज्योती यादव यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि समृद्धी फौंडेशनचे संस्थापक संचालक मनीष पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.या सुविधेमुळे कौशल्य विकास अध्यापनशास्त्राद्वारे रोजगार निर्मिती आणि कुशल उद्योजक निर्माण होणे शक्य होईल. अभियांत्रिकीसह नवसंकल्पनांचे आविष्करण करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही यामुळे संधीचे एक महत्त्वाचे द्वार खुले होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.या कराराअंतर्गत सिंगापूर येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, चीनमधील फुदान विद्यापीठ व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था यांच्या समन्वयातून हा नवसंकल्पनांच्या उद्योजकीय परिवर्तनाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी निर्माण करणारे कुशल तंत्रज्ञ तयार झाले पाहिजेत, या अनुषंगाने ‘जुगाडफंडा डॉट कॉम’ या वेबसाईटमार्फत हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यामध्ये सर्व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देऊन नवउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मनीष पाटील यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. ‘जुगाडफंडा डॉट कॉम’ या आयटी पोर्टल प्लॅटफॉर्ममार्फत विद्यार्थ्यांना अधिकृत केंद्राशी संपर्क साधता येणार आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर