शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

रस्त्यांचा निधी वाढवण्यासाठी सदस्य आक्रमक

By admin | Updated: December 27, 2016 01:00 IST

आबिटकर, सरुडकर आग्रही : पुढील वर्षीचा नियोजन आराखडा ३०१ कोटींचा; नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता

कोल्हापूर : ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी मोठी असूून त्यांची सद्य:स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी मिळणाऱ्या निधीचे जिल्हा नियोजन समितीचे नेमके सूत्र काय, अशी विचारणा करत रस्त्यांसाठी आम्हाला निधी वाढवून द्यावा, या मागणीसाठी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर व आमदार चंद्रदीप नरके सोमवारी आक्रमक झाले;तर अद्यापही निधी खर्च न केलेल्या शासकीय विभागांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कडक शब्दांत कानउघाडणी करून आचारसंहितेपूर्वी निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. प्रमुख उपस्थिती खासदार संभाजीराजे छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, सतेज पाटील, अमल महाडिक, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील-सरूडकर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आदींची होती.बैठकीत जिल्हा नियोजन समितीमधून २०१६-१७ साठी जिल्ह्याकरिता मंजूर झालेल्या २२६ कोटी ५० लाख रुपयांपैकी १८९ कोटी ४६ लाख निधी वितरित होऊन नोव्हेंबरअखेर ११३ कोटी ६४ लाख रुपये म्हणजे ६६.७२ टक्के निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले. तसेच २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याच्या ३०१ कोटी ६५ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. त्यामध्ये आराखड्याची कमाल वित्तीय मर्यादा २२८ कोटी ३७ लाख असून त्यात अतिरिक्त ७३.२८ कोटींची मागणी करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विषयावरून बहुतांश आमदार आक्रमक झाले. यावरून बरीच टोलेबाजी रंगली. आ. आबिटकर यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अद्याप पैसे मिळाले नसल्याचे सांगून यामुळे मतदारसंघातील साडेतेराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली. रस्त्यांसाठी नियोजन समितीचे नेमके सूत्र काय? याची विचारणा करून निधी वाढवून देण्याची मागणी केली. त्यांचाच धागा पकडत आ. सरूडकर व आ. नरके यांनीही आमचे मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठे व डोंगरी असल्याने रस्त्यांची लांबी मोठी आहे. त्यामुळे जादा निधीची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३४ कोटी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नियोजन समितीमधून वितरित झालेल्या निधीचा आढावा घेताना काही शासकीय विभागांनी अद्याप एक रुपयाही खर्च न केल्याचे निदर्शनास आले. त्यावर पालकमंत्री यांनी समज देत हा निधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शंभर टक्के खर्च करा, अशा सूचना दिल्या. शहरात अग्निशमन मोटारसायकलसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी द्यावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेतील बहुतांश कामे झाली आहेत. त्यामुळे दोन प्रस्ताव वगळल्यास उरणारी रक्कम त्याकरिता वापरता येईल, असा पर्याय त्यांनी सुचविला. पालकमंत्र्यांनी या पर्यायानुसार निधी देता येईल, असे सांगितले....तर आमदार निधीतील पैसे परत जातीलआमदार निधीतून जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात विविध कामांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे; परंतु अद्याप त्यातील काही कामांच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या नाहीत. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे, असे आमदार हाळवणकर यांनी सांगितले. त्यावर बहुतांश प्रकरणांना मान्यता देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जादा निधीसाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी करूयाजिल्हा नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी आमदार व उपस्थित सदस्यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी पुणे येथे होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीला आपण सर्वजण जाऊन जिल्ह्यासाठी जादा निधीची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करू, असे सांगितले.‘नगरोत्थान’साठी प्रस्तावच नाही‘नगरोत्थान’च्या निधीबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा केल्यावर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांनी ‘नगरोत्थान’साठी ६ कोटी रुपये मंजूर असून, त्यातील २ कोटी ८६ लाखांच्या कामाचे प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेकडून अद्याप आले नसल्याचा खुलासा केला, तर नगरपालिकांकडे या संदर्भातील प्रस्ताव आल्याचे त्यांनी सांगितले.